शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
4
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
5
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
6
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
7
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
8
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
9
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
10
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
11
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
12
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
13
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
14
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
15
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
16
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
17
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
18
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
19
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
20
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल

आगामी विधानसभेत २८८ जागा लढविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 22:12 IST

अलीकडच्या काळात राजकीय घडामोडी बघता लोकशाहीचे अस्तित्त्व धोक्यात आल्याचे दिसते. शेतकरी व कष्टकऱ्यांच्या प्रश्नाकडे पूर्वीच्या व आताच्या सरकारने दुर्लक्षच केले. परिणामी, २०१९ च्या निवडणुका महत्त्वाच्या ठरणार आहेत.

ठळक मुद्देज्ञानेश वाकुडकर : लोकजागर अभियानची पत्रपरिषद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अलीकडच्या काळात राजकीय घडामोडी बघता लोकशाहीचे अस्तित्त्व धोक्यात आल्याचे दिसते. शेतकरी व कष्टकऱ्यांच्या प्रश्नाकडे पूर्वीच्या व आताच्या सरकारने दुर्लक्षच केले. परिणामी, २०१९ च्या निवडणुका महत्त्वाच्या ठरणार आहेत. आम्ही कुठलेही आंदोलन न करता मतदारांना त्यांचा रोष मतपेटीतून व्यक्त करा, असे आवाहन करीत आगामी निवडणुकीत विधानसभेच्या २८८ जागा लढू, अशी माहिती लोकजागर अभियानचे अध्यक्ष प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.वाकुडकर पुढे म्हणाले, रविवारी सेवाग्राम येथे आमची बैठक झाली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. आतापर्यंत आम्ही या देशाचे भविष्य असलेल्या विद्यार्थी दशेतील तरुण-तरुणींशी ६० महाविद्यालयात जावून संवाद साधला आहे. त्यांना आम्ही आमच्या अभियानाच्या आठ कलमी कार्यक्रमाची माहिती समजावून सांगितली आहे. सध्या भांडवलशाही, बेरोजगारी, गुन्हेगारी आदी वाढत असल्याने आम्ही मतदारांपुढे शुन्य लोकशाही, गाव तेथे उद्योग, कृषी धर्म-कृषी संस्कृती, मोफत आरोग्य-शिक्षण, सामाजिक सरकार-सामाजिक उद्योग, एक गाव-एक परिवार, नवा भारत-युवा भारत व जलद न्यायालय- पारदर्शी न्याय हे विषय घेवून जाणार आहो, असे सांगितले.सर्वसामान्यांचे नेतृत्त्व करणाºया राजकीय क्षेत्रात सध्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींचा जास्तीत जास्त समावेश असल्याचे दिसून येते. याला आळा घालण्यासाठी आम्ही जलदगती न्यायालय-पारदर्शी न्याय ही संकल्पना घेवून मतदारांपुढे जाणार आहे. या संकल्पनेनुसार एखाद्या राजकीय पुढाºयावर असलेल्या खटल्याचा निकाल तीन वर्षात अपेक्षीत आहे. जिल्हा न्यायालय दोन वर्षात न्यायनिवाडा करेल. त्यावर अपील झाल्यास उच्च न्यायालय सहा महिन्यात प्रकरण निकाली काढेल. त्यावरही अपील झाल्यास सर्वोच्च न्यायालय त्यानंतरच्या सहा महिन्यात प्रकरणाचा न्याय निवाडा करेल, अशी संकल्पना आहे.परंतु, यासाठी न्यायालयांची संख्या व त्यामधील मनुष्यबळ वाढविणे गरजेचे राहणार असल्याचे यावेळी वाकुडकर यांनी स्पष्ट केले, सध्या आमच्याकडे सुमारे नवे २५ चेहरे मतदारांसमोर निवडणुकीच्या वेळी पर्याय म्हणून देण्यासाठी आहेत. परंतु, सहा महिन्यात यादी अद्यावत होईल, असेही यावेळी प्रा. वाकुडकर यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला संजय वानखेडे, कौस्तुब कावळे, दगडू पडिले, महादेव मिरगे यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.