शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
3
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
4
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
5
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
6
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
7
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
8
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
9
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
10
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
11
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
12
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
13
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
14
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
15
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
16
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
17
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
18
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
19
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
20
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय

आगामी विधानसभेत २८८ जागा लढविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 22:12 IST

अलीकडच्या काळात राजकीय घडामोडी बघता लोकशाहीचे अस्तित्त्व धोक्यात आल्याचे दिसते. शेतकरी व कष्टकऱ्यांच्या प्रश्नाकडे पूर्वीच्या व आताच्या सरकारने दुर्लक्षच केले. परिणामी, २०१९ च्या निवडणुका महत्त्वाच्या ठरणार आहेत.

ठळक मुद्देज्ञानेश वाकुडकर : लोकजागर अभियानची पत्रपरिषद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अलीकडच्या काळात राजकीय घडामोडी बघता लोकशाहीचे अस्तित्त्व धोक्यात आल्याचे दिसते. शेतकरी व कष्टकऱ्यांच्या प्रश्नाकडे पूर्वीच्या व आताच्या सरकारने दुर्लक्षच केले. परिणामी, २०१९ च्या निवडणुका महत्त्वाच्या ठरणार आहेत. आम्ही कुठलेही आंदोलन न करता मतदारांना त्यांचा रोष मतपेटीतून व्यक्त करा, असे आवाहन करीत आगामी निवडणुकीत विधानसभेच्या २८८ जागा लढू, अशी माहिती लोकजागर अभियानचे अध्यक्ष प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.वाकुडकर पुढे म्हणाले, रविवारी सेवाग्राम येथे आमची बैठक झाली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. आतापर्यंत आम्ही या देशाचे भविष्य असलेल्या विद्यार्थी दशेतील तरुण-तरुणींशी ६० महाविद्यालयात जावून संवाद साधला आहे. त्यांना आम्ही आमच्या अभियानाच्या आठ कलमी कार्यक्रमाची माहिती समजावून सांगितली आहे. सध्या भांडवलशाही, बेरोजगारी, गुन्हेगारी आदी वाढत असल्याने आम्ही मतदारांपुढे शुन्य लोकशाही, गाव तेथे उद्योग, कृषी धर्म-कृषी संस्कृती, मोफत आरोग्य-शिक्षण, सामाजिक सरकार-सामाजिक उद्योग, एक गाव-एक परिवार, नवा भारत-युवा भारत व जलद न्यायालय- पारदर्शी न्याय हे विषय घेवून जाणार आहो, असे सांगितले.सर्वसामान्यांचे नेतृत्त्व करणाºया राजकीय क्षेत्रात सध्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींचा जास्तीत जास्त समावेश असल्याचे दिसून येते. याला आळा घालण्यासाठी आम्ही जलदगती न्यायालय-पारदर्शी न्याय ही संकल्पना घेवून मतदारांपुढे जाणार आहे. या संकल्पनेनुसार एखाद्या राजकीय पुढाºयावर असलेल्या खटल्याचा निकाल तीन वर्षात अपेक्षीत आहे. जिल्हा न्यायालय दोन वर्षात न्यायनिवाडा करेल. त्यावर अपील झाल्यास उच्च न्यायालय सहा महिन्यात प्रकरण निकाली काढेल. त्यावरही अपील झाल्यास सर्वोच्च न्यायालय त्यानंतरच्या सहा महिन्यात प्रकरणाचा न्याय निवाडा करेल, अशी संकल्पना आहे.परंतु, यासाठी न्यायालयांची संख्या व त्यामधील मनुष्यबळ वाढविणे गरजेचे राहणार असल्याचे यावेळी वाकुडकर यांनी स्पष्ट केले, सध्या आमच्याकडे सुमारे नवे २५ चेहरे मतदारांसमोर निवडणुकीच्या वेळी पर्याय म्हणून देण्यासाठी आहेत. परंतु, सहा महिन्यात यादी अद्यावत होईल, असेही यावेळी प्रा. वाकुडकर यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला संजय वानखेडे, कौस्तुब कावळे, दगडू पडिले, महादेव मिरगे यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.