शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

आगामी विधानसभेत २८८ जागा लढविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 22:12 IST

अलीकडच्या काळात राजकीय घडामोडी बघता लोकशाहीचे अस्तित्त्व धोक्यात आल्याचे दिसते. शेतकरी व कष्टकऱ्यांच्या प्रश्नाकडे पूर्वीच्या व आताच्या सरकारने दुर्लक्षच केले. परिणामी, २०१९ च्या निवडणुका महत्त्वाच्या ठरणार आहेत.

ठळक मुद्देज्ञानेश वाकुडकर : लोकजागर अभियानची पत्रपरिषद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अलीकडच्या काळात राजकीय घडामोडी बघता लोकशाहीचे अस्तित्त्व धोक्यात आल्याचे दिसते. शेतकरी व कष्टकऱ्यांच्या प्रश्नाकडे पूर्वीच्या व आताच्या सरकारने दुर्लक्षच केले. परिणामी, २०१९ च्या निवडणुका महत्त्वाच्या ठरणार आहेत. आम्ही कुठलेही आंदोलन न करता मतदारांना त्यांचा रोष मतपेटीतून व्यक्त करा, असे आवाहन करीत आगामी निवडणुकीत विधानसभेच्या २८८ जागा लढू, अशी माहिती लोकजागर अभियानचे अध्यक्ष प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.वाकुडकर पुढे म्हणाले, रविवारी सेवाग्राम येथे आमची बैठक झाली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. आतापर्यंत आम्ही या देशाचे भविष्य असलेल्या विद्यार्थी दशेतील तरुण-तरुणींशी ६० महाविद्यालयात जावून संवाद साधला आहे. त्यांना आम्ही आमच्या अभियानाच्या आठ कलमी कार्यक्रमाची माहिती समजावून सांगितली आहे. सध्या भांडवलशाही, बेरोजगारी, गुन्हेगारी आदी वाढत असल्याने आम्ही मतदारांपुढे शुन्य लोकशाही, गाव तेथे उद्योग, कृषी धर्म-कृषी संस्कृती, मोफत आरोग्य-शिक्षण, सामाजिक सरकार-सामाजिक उद्योग, एक गाव-एक परिवार, नवा भारत-युवा भारत व जलद न्यायालय- पारदर्शी न्याय हे विषय घेवून जाणार आहो, असे सांगितले.सर्वसामान्यांचे नेतृत्त्व करणाºया राजकीय क्षेत्रात सध्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींचा जास्तीत जास्त समावेश असल्याचे दिसून येते. याला आळा घालण्यासाठी आम्ही जलदगती न्यायालय-पारदर्शी न्याय ही संकल्पना घेवून मतदारांपुढे जाणार आहे. या संकल्पनेनुसार एखाद्या राजकीय पुढाºयावर असलेल्या खटल्याचा निकाल तीन वर्षात अपेक्षीत आहे. जिल्हा न्यायालय दोन वर्षात न्यायनिवाडा करेल. त्यावर अपील झाल्यास उच्च न्यायालय सहा महिन्यात प्रकरण निकाली काढेल. त्यावरही अपील झाल्यास सर्वोच्च न्यायालय त्यानंतरच्या सहा महिन्यात प्रकरणाचा न्याय निवाडा करेल, अशी संकल्पना आहे.परंतु, यासाठी न्यायालयांची संख्या व त्यामधील मनुष्यबळ वाढविणे गरजेचे राहणार असल्याचे यावेळी वाकुडकर यांनी स्पष्ट केले, सध्या आमच्याकडे सुमारे नवे २५ चेहरे मतदारांसमोर निवडणुकीच्या वेळी पर्याय म्हणून देण्यासाठी आहेत. परंतु, सहा महिन्यात यादी अद्यावत होईल, असेही यावेळी प्रा. वाकुडकर यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला संजय वानखेडे, कौस्तुब कावळे, दगडू पडिले, महादेव मिरगे यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.