शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

विदर्भाच्या माथ्यावरील दुष्काळाचा कलंक पुसायचा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By रवींद्र चांदेकर | Updated: April 13, 2025 20:56 IST

नळगंगा-वैनगंगा नदी जोड प्रकल्प महत्त्वाचा असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

वर्धा : विदर्भातील अनेक जिल्ह्यात दुष्काळसदृश स्थिती असते. सिंचनाची सुविधाही कमी आहे. राज्य शासनाने आता वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प हाती घेतला आहे. यातून विदर्भाच्या माथ्यावरील दुष्काळाचा कलंक पुसायचा आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

आर्वी येथे रविवारी ७२० कोटी रुपयांच्या विविध विकासकामांच्या ई-भूमिपूजन, लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. मंचावर पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, खासदार अमर काळे, आमदार दादाराव केचे, आमदार सुमित वानखेडे. आमदार समीर कुणावार, आमदार राजेश बकाने, माजी खासदार रामदास तडस, जिल्हाधिकारी वान्मथी सी. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकरी अधिकारी जितीन रहमान, आदी उपस्थित होते. 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पावर एक लाख कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. विशेष विमानाने संपूर्ण परिसराचे मॅपिंग आटोपले आहे. या प्रकल्पामुळे तब्बल ५५० किलोमीटरची नवीन नदीच तयार होणार आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशीम, बुलढाणा, आदी जिल्ह्यांतील शेतकरी, जनतेला त्याचा लाभ होणार आहे. ६२ टीएमसी पाणी मिळणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

८० टक्के शेतकऱ्यांना दिवसा मोफत १२ तास वीज

पंतप्रधान सूर्यघर योजनेमुळे अनेक घरे, अनेक गावे सौरऊर्जेकडे वळत आहेत. आर्वी तालुक्यातील नेरी (पुनर्वसन) हे गाव १०० टक्के सौरऊर्जामय झाले. सौर कृषी योजनेत पुढील काळात १६ हजार मेगावॉट वीज उपलब्ध होईल. परिणामी २०२६ च्या शेवटपर्यंत राज्यातील ८० टक्के शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा १२ तास मोफत वीज उपलब्ध होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

नागपूरएवढेच वर्धा जिल्ह्यावर प्रेम

पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी मुख्यमंत्र्यांची नागपूर एवढेच वर्धा जिल्ह्यावर प्रेम असल्याचे सांगितले. त्यामुळेच त्यांनी सेवाग्राम, पवनार कृती आराखडा, जिल्हा बँकेला १६३ कोटींची मदत केल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या नेतृत्वात जिल्ह्याचा विकास आता थांबणार नाही, असे सांगितले. आमदार सुमित वानखेडे यांच्या काम करण्याच्या हातोटीचे डॉ. पंकज भोयर यांनी कौतुक केले. यावेळी खासदार अमर काळे, आमदार दादाराव केचे, आमदार सुमित वानखेडे यांनी आपल्या मनोगतातून विविध मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. प्रास्ताविक जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसVidarbhaविदर्भ