शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

बाजारातील रस्त्याचे राजे आम्हीच !

By admin | Updated: August 30, 2015 01:53 IST

येथील बाजारात फेरीवाल्यांच्या हातगाड्या चौकाच्या मधोमध रस्त्यावर उभ्या राहणे सुरू झाले आहे. या हातगाड्या कधी रस्त्याच्या कडेला उभ्या राहत होत्या.

पोलीस बेपत्ता : फेरीवाल्यांनी घेतला ताबा, रस्त्याच्या मधोमध फळविक्रेत्यांच्या हातगाड्यांची गर्दीवर्धा : येथील बाजारात फेरीवाल्यांच्या हातगाड्या चौकाच्या मधोमध रस्त्यावर उभ्या राहणे सुरू झाले आहे. या हातगाड्या कधी रस्त्याच्या कडेला उभ्या राहत होत्या. याकडे पोलिसांसह नगर परिषद प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने त्यांच्या गाड्या आता रस्त्याच्या मधोमध उभे राहणे सुरू झाले आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था सांभाळणारे पोलीस, बाजाराच्या कारावर आर्थिक व्यवस्था सांभाळणारी पालिका व व्यापाऱ्यांच्या आपलपोटी स्वभावामुळे सध्या फेरीवाले ‘या रस्त्याचे राजे आम्हीच !’ या अविर्भावात वागत असल्याचे चित्र शनिवारी दिसत होते. शनिवारी रक्षाबंधन असल्याने बाजारात गर्दी असणार असल्याची माहिती असतानाही दुपारच्यावेळी बाजार परिसरात एकही वाहतूक पोलीस दिसून आला नाही. शिवाय नागरिकांच्या सुरक्षेकरिता कुठली पोलिसांची विशेष व्यवस्थाही करण्यात आली नव्हती. अशात गर्दीचा लाभ उचलत समाजकंटकांकडून अनेक विघातक कृत्य केल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. शिवाय या सणाला बाजारात महिलांची व युवतींची गर्दी अधिक असल्याने त्यांच्या संरक्षणाकरिता बाजारात पोलीस असणे अपेक्षित होते; मात्र तसे दिसले नाही. शिवाय पालिकेच्यावतीनेही सणांच्या दिवसाकरिता फेरीवाल्यांना काही वगळे नियम दिल्याचेही दिसून आले नाही. पालिकेकडून कुठलीही व्यवस्था करण्यात आली नव्हती.येथील कपडा लाईन, पत्रावळी चौक, दूर्गा टॉकीजच्या मार्गावरील वाहतूक पुर्णत: विस्कळीत झाल्याचे दिसले. कपडा लाईन व पत्रावळी चौकात तर रस्त्याच्या मधोमध फेरीवाल्यांच्या हातगाड्या उभ्या होत्या. पत्रावळी चौकासह बसस्थानकासमोरून धान्य बाजाराकडे येत असलेल्या रस्त्यावर दुकानमालकांनी त्यांच्या दुकानातील साहित्य बाहेर ठेवल्याने येथून वाहने कशी चालवावी असा प्रश्न पडल्याशिवाय राहत आहे. शहर पोलीस ठाण्याच्या मागच्या बाजूला असलेल्या मार्गावर पिपरी (मेघे), येळाकेळी, सुकळी, जामणी, आकोली या मार्गाने जाणारे आॅटो उभे राहण्याकरिता जागा देण्यात आली आहे; मात्र येथे आॅटो पलटविण्याकरिताही जागा शिल्लक राहत नसल्याने सतत वाहतूक खोळंबत आहे.