शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

समन्वयाची शेती ठरली विकासाचा मार्ग

By admin | Updated: May 10, 2015 01:34 IST

तालुक्यातील रेहकी येथील दोन मावसभावांनी एकत्र येत समन्वयाने शेती करून विकासाचा मार्ग शोधला आहे.

सेलू : तालुक्यातील रेहकी येथील दोन मावसभावांनी एकत्र येत समन्वयाने शेती करून विकासाचा मार्ग शोधला आहे. या दोघांनी पाऊण एकरात थोडा थोडका नाही तर तब्बल सव्वा लाख रुपयांचा नफा मिळविला आहे. पंकज झाडे व श्रीकांत धानकुटे या दोघांनी पारंपरिक शेतील फाटा देत भाजीपाल पीक घ्यायला सुरुवात केली. पाऊण एकर शेतीत वर्षभर पारंपारिक पिकांसोबतच भाजीपाल्याचे नियोजन करून सोयाबीन, कापूस, यासोबतच मेथी, भेंडी, ऊस आदी पिके घेत त्यांनी आर्थिक बाजू भक्कम केली. पंकज झाडे याच्याकडे वडीलोपार्जित अडीच एकर शेती आहे. १५ वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. पंकजचे वडील नियमित भाजीपाल्याचीच शेती करायचे. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत पंकजने तो गुण हस्तगत केला आहे. त्याला साथ दिली त्याचा मावसभाऊ श्रीकांतने. कारण पंकज जवळ शेती जेमतेम, पाण्याचा अभाव व सतत अडीच एकरात भाजीपाला बाराही माहिने घेतल्यामुळे जमीन आता सध्या भाजीपाल्यासाठी योग्य नाही. यामुळे श्रीकांतने मदतीचा हात देत पंकजच्या या उपक्रमात स्वत:ची शेती त्याला दिली. पावसाळ्यात सोयाबीनचे पीक घेतले. पाऊण एकरात अवघे तिनच पोते सोयाबीनचे उत्पन्न झाले. त्यानंतर त्याच जमिनीवर त्यांनी मेथीचे पीक घेतले. त्यातून ३० हजार रुपये खर्च वजा जाता नफा मिळाला होता. मेथीचे पीक दोन महिन्यात घेतल्यानंतर भेंडीचे उत्पादन घेण्यात आले. यातही नफा झाला. दोघांनी मिळून शेती केल्यामुळे पंकज उत्पादनाच नियोजन पाहतो तर श्रीकांत बाजारपेठेत ने-आण करण्याच्या खर्चाचे नियोजन करतो. (तालुका प्रतिनिधी)