शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
3
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
4
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
5
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
6
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
7
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
8
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
9
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
10
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
11
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
12
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
13
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
14
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
15
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
16
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
17
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
18
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
19
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
Daily Top 2Weekly Top 5

रब्बी हंगामात पाणीबाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 22:42 IST

निसर्गाच्या लहरीपणा आणि बोंडअळीमुळे शेतकऱ्यांनी कपाशीकडे पाठ फिरवून सोयाबीनचे क्षेत्र वाढविले. सोयाबीनची मळणी करुन रब्बी हंगामात आता गहू व चना पिकांचे उत्पादन घेण्याचे नियोजन केले. परंतु यावर्षी पडलेल्या अल्प पावसामुळे जलाशयांची पातळी खालावल्याने महाकाळी धरणात केवळ ३८ टक्केच जलसाठा उपलब्ध आहे.

ठळक मुद्देमुख्य कालव्याला पाणी सोडण्यास सिंचन विभाग असमर्थ

श्रीकांत तोटे।लोकमत न्यूज नेटवर्कपवनार : निसर्गाच्या लहरीपणा आणि बोंडअळीमुळे शेतकऱ्यांनी कपाशीकडे पाठ फिरवून सोयाबीनचे क्षेत्र वाढविले. सोयाबीनची मळणी करुन रब्बी हंगामात आता गहू व चना पिकांचे उत्पादन घेण्याचे नियोजन केले. परंतु यावर्षी पडलेल्या अल्प पावसामुळे जलाशयांची पातळी खालावल्याने महाकाळी धरणात केवळ ३८ टक्केच जलसाठा उपलब्ध आहे. म्हणूनच रब्बी हंगामाकरिता या धरणातून धामच्या मुख्य कालव्याला पाणी सोडण्यासाठी सिंचन विभागाने असमर्थता दर्शविली आहे. परिणामी या कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या असंख्य शेतकºयांच्या रब्बी उत्पन्नावर पाणी फेरले आहे.महाकाळी धरणाच्या धाम नदी कालवा क्षेत्रामध्ये येळाकेळी ते शिरपूर या दरम्यान महाकाळ, मोधापूर, पवनार, केदारवाडी, कुटकी, खरांगणा (गोडे), करंजी (काजी), करंजी (भोगे) या गावांचा समावेश आहे. या परिसरातील जवळपास ४ हजार ५०० हेक्टर जमिन कालव्याच्या पाण्यावर अवलंबून आहे. यात खरीप आणि रब्बी पिकांचाही समावेश आहे. जिल्ह्यात सरासरीच्या ७७ टक्केच पाऊस झाल्याने पावसाच्या खंडामुळे सोयाबीन पिक धोक्यात आले. पावसाअभावी सोयाबीनचे उत्पन्न ५ क्विंटलच्या आत आले आहे. या पिकांची भरपाई गहू व चना या पिकांतून भरुन निघेल, अशी शेतकºयांना अपेक्षा होती. परंतु धरणात ३८ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. त्यातील १५ टक्के पाणी हे संरक्षित ठेवल्या जाते तर उर्वरीत २३ टक्के पाण्यातून पिण्याच्या पाण्याला प्राथमिकता देण्यात येते. याच धरणावरुन वर्धा शहरासह लगतच्या अकरा ग्रामपंचायतला पाणी पुरवठा केल्या जातो.त्यामुळे सिंचन विभागाने पाणी सोडण्यास नकार दिल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षेवर पाणी फेरले.सिंचनाला फाटा, बागायतदार अडचणीतकालव्याचे पाणी आधी पिण्यासाठी, सिंचनासाठी व नंतर औद्योगिकरणासाठी अशा प्राधान्याक्रमाने द्यायचे असते. परंतु जेव्हा जलसाठा कमी असतो तेव्हा मात्र सिंचनालाच फाटा दिला जातो. नदीवरील लिफ्ट ईरिगेशनद्वारे शेतीला मिळणारे पाणीही बंद केले जाऊ शकते. या धरणातून वर्धा नगर परिषद, एमआयडीसी, वर्धा उत्तम गल्वा कंपनीला पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे नदीला बंधारे बांधून पाणी अडविल्यामुळे नदीला पाणी असते. नदी शेजारी असलेल्या शेतकºयांनी नदीवरुन पाईप लाईन टाकून सिंचनाकरिता पाणी घेतलेले आहे. ३ हजार हेक्टर क्षेत्राला लिफ्ट ईरिगेशनद्वारे पाणी पुरवठा होतो. परंतु वीज वितरणमार्फत त्यांचा वीज पुरवठा बंद केला जाण्याची शक्यता असल्याने आता केळी, ऊस व फळबागायदार शेतकरीही अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे.दोन वेळा तरी पाणी सोडावेदरवर्षी १५ दिवसांच्या अंतराने १५ नोव्हेंबर ३१ मार्च या कालावधीत सहा वेळा कालव्याला पाणी सोडले जायचे. त्यामुळे या परिसरातील शेतकºयांच्या उत्पन्नात वाढ व्हायची. परंतु या वर्षी रब्बी हंगामासाठी पाणी देण्यास असमर्थता दर्शविली आहे.त्यामुळे यावर्षी निदान दोन वेळा जरी पाणी सोडले तरी चना,गहू व मुगासारखे पिक घेता येईल व खरीपालाही फायदा होईल. अशी मागणी शेतकºयांकडून होत आहे.१५ नोव्हेंबरला आढावा बैठक असून त्यावेळी धरणामध्ये उपलब्ध असलेल्या साठ्यानुसार निर्णय घेण्यात येईल. १५ जुलैपर्यंत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी पाण्याची आवश्यक पातळी कायम ठेवावी लागते. आजच्या परिस्थितीनुसार शेती सिंचनासाठी कालव्याला पाणी सोडण्याची शक्यता नाही. त्या बाबतीत १५ नोव्हेंबरनंतर सूचना देण्यात येईल.रवींद्र डाफणे, सह संचालक, जलसचिंन (कालवा) पिपरी (मेघे)