शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
2
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
3
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
4
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
5
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
6
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
7
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
8
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
9
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
10
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
11
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
12
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
13
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
14
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
15
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
16
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
17
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
18
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
19
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
20
Crime: गे डेटिंग अपवर ओळख, ८ जण फ्लॅटवर पार्टीसाठी भेटले; पार्टीनंतर शुभमचा मृत्यू

रब्बी हंगामात पाणीबाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 22:42 IST

निसर्गाच्या लहरीपणा आणि बोंडअळीमुळे शेतकऱ्यांनी कपाशीकडे पाठ फिरवून सोयाबीनचे क्षेत्र वाढविले. सोयाबीनची मळणी करुन रब्बी हंगामात आता गहू व चना पिकांचे उत्पादन घेण्याचे नियोजन केले. परंतु यावर्षी पडलेल्या अल्प पावसामुळे जलाशयांची पातळी खालावल्याने महाकाळी धरणात केवळ ३८ टक्केच जलसाठा उपलब्ध आहे.

ठळक मुद्देमुख्य कालव्याला पाणी सोडण्यास सिंचन विभाग असमर्थ

श्रीकांत तोटे।लोकमत न्यूज नेटवर्कपवनार : निसर्गाच्या लहरीपणा आणि बोंडअळीमुळे शेतकऱ्यांनी कपाशीकडे पाठ फिरवून सोयाबीनचे क्षेत्र वाढविले. सोयाबीनची मळणी करुन रब्बी हंगामात आता गहू व चना पिकांचे उत्पादन घेण्याचे नियोजन केले. परंतु यावर्षी पडलेल्या अल्प पावसामुळे जलाशयांची पातळी खालावल्याने महाकाळी धरणात केवळ ३८ टक्केच जलसाठा उपलब्ध आहे. म्हणूनच रब्बी हंगामाकरिता या धरणातून धामच्या मुख्य कालव्याला पाणी सोडण्यासाठी सिंचन विभागाने असमर्थता दर्शविली आहे. परिणामी या कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या असंख्य शेतकºयांच्या रब्बी उत्पन्नावर पाणी फेरले आहे.महाकाळी धरणाच्या धाम नदी कालवा क्षेत्रामध्ये येळाकेळी ते शिरपूर या दरम्यान महाकाळ, मोधापूर, पवनार, केदारवाडी, कुटकी, खरांगणा (गोडे), करंजी (काजी), करंजी (भोगे) या गावांचा समावेश आहे. या परिसरातील जवळपास ४ हजार ५०० हेक्टर जमिन कालव्याच्या पाण्यावर अवलंबून आहे. यात खरीप आणि रब्बी पिकांचाही समावेश आहे. जिल्ह्यात सरासरीच्या ७७ टक्केच पाऊस झाल्याने पावसाच्या खंडामुळे सोयाबीन पिक धोक्यात आले. पावसाअभावी सोयाबीनचे उत्पन्न ५ क्विंटलच्या आत आले आहे. या पिकांची भरपाई गहू व चना या पिकांतून भरुन निघेल, अशी शेतकºयांना अपेक्षा होती. परंतु धरणात ३८ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. त्यातील १५ टक्के पाणी हे संरक्षित ठेवल्या जाते तर उर्वरीत २३ टक्के पाण्यातून पिण्याच्या पाण्याला प्राथमिकता देण्यात येते. याच धरणावरुन वर्धा शहरासह लगतच्या अकरा ग्रामपंचायतला पाणी पुरवठा केल्या जातो.त्यामुळे सिंचन विभागाने पाणी सोडण्यास नकार दिल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षेवर पाणी फेरले.सिंचनाला फाटा, बागायतदार अडचणीतकालव्याचे पाणी आधी पिण्यासाठी, सिंचनासाठी व नंतर औद्योगिकरणासाठी अशा प्राधान्याक्रमाने द्यायचे असते. परंतु जेव्हा जलसाठा कमी असतो तेव्हा मात्र सिंचनालाच फाटा दिला जातो. नदीवरील लिफ्ट ईरिगेशनद्वारे शेतीला मिळणारे पाणीही बंद केले जाऊ शकते. या धरणातून वर्धा नगर परिषद, एमआयडीसी, वर्धा उत्तम गल्वा कंपनीला पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे नदीला बंधारे बांधून पाणी अडविल्यामुळे नदीला पाणी असते. नदी शेजारी असलेल्या शेतकºयांनी नदीवरुन पाईप लाईन टाकून सिंचनाकरिता पाणी घेतलेले आहे. ३ हजार हेक्टर क्षेत्राला लिफ्ट ईरिगेशनद्वारे पाणी पुरवठा होतो. परंतु वीज वितरणमार्फत त्यांचा वीज पुरवठा बंद केला जाण्याची शक्यता असल्याने आता केळी, ऊस व फळबागायदार शेतकरीही अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे.दोन वेळा तरी पाणी सोडावेदरवर्षी १५ दिवसांच्या अंतराने १५ नोव्हेंबर ३१ मार्च या कालावधीत सहा वेळा कालव्याला पाणी सोडले जायचे. त्यामुळे या परिसरातील शेतकºयांच्या उत्पन्नात वाढ व्हायची. परंतु या वर्षी रब्बी हंगामासाठी पाणी देण्यास असमर्थता दर्शविली आहे.त्यामुळे यावर्षी निदान दोन वेळा जरी पाणी सोडले तरी चना,गहू व मुगासारखे पिक घेता येईल व खरीपालाही फायदा होईल. अशी मागणी शेतकºयांकडून होत आहे.१५ नोव्हेंबरला आढावा बैठक असून त्यावेळी धरणामध्ये उपलब्ध असलेल्या साठ्यानुसार निर्णय घेण्यात येईल. १५ जुलैपर्यंत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी पाण्याची आवश्यक पातळी कायम ठेवावी लागते. आजच्या परिस्थितीनुसार शेती सिंचनासाठी कालव्याला पाणी सोडण्याची शक्यता नाही. त्या बाबतीत १५ नोव्हेंबरनंतर सूचना देण्यात येईल.रवींद्र डाफणे, सह संचालक, जलसचिंन (कालवा) पिपरी (मेघे)