शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
6
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
7
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
8
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
9
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
10
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
11
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
12
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
13
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
14
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
15
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
16
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
17
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
18
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
19
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
20
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?

पाण्याचा होणारा अपव्यय टळणार

By admin | Updated: May 7, 2017 00:44 IST

स्थानिक ग्रा.पं. प्रशासनाच्यावतीने नळावर मिटर बसविण्याच्या कामाला वेग दिल्या जात असल्याने होणारा पाण्याचा अपव्यय टळणार आहे.

ग्रामपंचायत प्रशासनाकडून नळावर मीटर लोकमत न्यूज नेटवर्क सेवाग्राम : स्थानिक ग्रा.पं. प्रशासनाच्यावतीने नळावर मिटर बसविण्याच्या कामाला वेग दिल्या जात असल्याने होणारा पाण्याचा अपव्यय टळणार आहे. तसेच पाण्याच्या अतिवापरावर चाप बसणार आहे. नगर वासियांना नवीन नळ कनेक्शन देण्यात येणार असून होणारा पाण्याचा अपव्यय टळणार असल्याने उन्हाळ्यातील पाणी समस्येवर ग्रा.पं.प्रशासनाचे हे पाऊल रामबाण इलाज ठरणार असल्याचे सांगण्यात आले. ग्रा.पं. प्रशासनाने १४ व्या वित्त आयोग निधीतून नळावर मिटर बसविण्याचा निर्णय घेतला आहे. याची सर्व प्रथम अमलबजावणी आदर्शनगर मध्ये करण्यात आलेली आहे. २४७ मिटर बसविले आहे. काही लोकांनी विरोध दर्शविला. पण, लवकरच सर्वांना समान व आवश्यक पाणी मिळेल. काटकसरीने पाणी वापर व्हावा यासाठी मिटर लावण्यात येणार आहे असे ग्रा.पं. प्रशासनाच्यावतीने नागरिकांना सांगण्यात आले. ग्रामस्थांना मुबलग पाणी द्या अशी मागणी जुनीच होती. परंतु, विविध कारणांमुळे नगरवासीयांची उपेक्षा पुर्ण होत नव्हती. आदर्श नगरला नेहमीच झुलते माप देण्यात आल्याचाही आरोप होत होता. परंतु, यंदा आदर्शनगरला प्राधान्य देण्यात आले आहे. प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंततर्गत पाणी देण्यात आले आहे. घरगुती नळ कनेक्शन देण्यात यावे, अशी मागणी रहिवासीयांची आहे. डिमांड भरण्याची तयारीही नागरिकांची आहे. सध्या तरी आदर्श व सेवाभावी नगरवांसीयांचा पाण्याचा प्रश्न सुटला असून दोन्ही नगरात बाराही महिने पाणी मिळणार का असा सवाल विचारला जात आहे. जुनी वस्ती व ऊगले ले-आऊट या भागाला जुन्या वस्तीतील जलकुंभातून पाणी पुरवठा केला जातो. उन्हाळ्याचे दिवस असल्याने विहीरींची पाणी पातळी दिवसेंदिवस खाली जात असून नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.