शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
2
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
3
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
4
जीएसटी कपातीमुळे कुटुंबाच्या मासिक खर्चात होणार बचत; पण वाचलेल्या पैशांची कुठे, कशी गुंतवणूक कराल?
5
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!
6
Upcoming IPO: २१ वर्ष जुनी कंपनी IPO आणण्याच्या तयारीत, ८०० कोटी रुपये उभे करण्याची योजना
7
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
8
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
9
तब्बल २२ वर्षे सुरू होता घटस्फोटचा खटला, अखेर कोर्टाने दिली मंजूरी! पण वेगळं होण्याचं कारण ऐकाल तर हैराण व्हाल!
10
स्पाय कॅमेरा, ७४ तरुणींचे व्हिडिओ, खाजगी एअरलाइन्समधील पायलटचं धक्कादायक कृत्य, असं फुटलं बिंग   
11
बदला घेण्यासाठी बिहारी व्यक्तीनं रचला कांड; ऐन गणेशोत्सवात मुंबईत पसरवली दहशत, पोलिसांची झोप उडवली
12
तिला फोटोशूटसाठी भारतात पाठवण्यास राजी नाही पाकिस्तान; वर्ल्ड कप आधी घेतला मोठा निर्णय
13
“त्यांच्या सल्ल्यामुळेच उद्धव ठाकरे सत्तेवरून पायउतार झाले”; केंद्रीय मंत्र्यांचा खोचक टोला
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा आश्चर्यचकित करणारा निर्णय ! टॅरिफ पद्धतीत बदल, 'या' वस्तूंवर दिली सूट
15
किम जोंग उनला लादेनप्रमाणेच मारण्याची तयारी, सैनिकही पाठवले, पण एक चूक झाली आणि फसला अमेरिकेचा प्लॅन 
16
Mumbai: विद्यार्थी एक दिवस शिक्षकांच्या भूमिकेत; वर्गांवर घेतला तास!
17
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
18
काय आहे 'Bharat Taxi', काय आहे त्याबाबत मोठी अपडेट? Ola-Uber ची झोप उडणार, तुम्हाला फायदा
19
UPतील बड्या नेत्याचा मुलगा, हत्येप्रकरणी दोषी,आता तब्बल २२ वर्षांनी लहान तरुणीशी केलं लग्न, कोण आहे ती?
20
"गणपती दरम्यान मुंबईत स्फोट घडवणार", लष्कर-ए-जिहादीच्या नावाने केलेला मेसेज! आरोपीला पोलिसांनी केली अटक

खरिपाकरिता तीन पाळ्यात पाणी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2015 02:34 IST

प्रकल्पात पाणीसाठा उपलब्ध असल्यास खरीप हंगाम २०१५-१६ करीता शेतकऱ्यांना तीन पाळ्यांत पाणीपुरवठा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

वर्धा : प्रकल्पात पाणीसाठा उपलब्ध असल्यास खरीप हंगाम २०१५-१६ करीता शेतकऱ्यांना तीन पाळ्यांत पाणीपुरवठा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मागील तीन खरीप हंगामात शेतकऱ्यांना निसर्गाच्या कोपामुळे आर्थिक नुकसान सोसावे लागले होते. यामुळे शेतकरी आर्थिकदृष्टया कममुवत झाला. सिंचनाची सोय असताना पाणी उपलब्ध होत नसल्याने शेतातील पीक वाळले होते. यावर्षी तीन पाळ्यात पाणी देण्याची मागणी करण्यात आली. यावर सिंचन विभागाने बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या या प्रस्तावानुसार नियोजन केले. यात खरीप हंगामाकरिता तीन पाळ्या प्रस्तावित केल्या असून लाभक्षेत्रातील पाऊस, लाभधारकांची पाण्याची मागणी व कालव्याच्या तांत्रिक अडचणी आदी विचारात घेऊन पाणी सोडण्याचे नियोजन असल्याचे शेतकऱ्यांना सांगण्यात येत आहे. यामुळे सिंचनाची व्यवस्था असलेल्या शेतकऱ्यांनी त्यानुसार नियोजन केले आहे.खरीप हंगामाकरिता पिकांना पाणी देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. या मागणीनुसार केलेल्या नियोजनात सिंचन विभागाने शेतकऱ्यांना या प्रस्तावाबाबत माहिती दिली आहे. कालव्याचे प्रवाही, कालव्यावरील नदी-नाल्यांवरील मंजूर उपसा सिंचन योजनांद्वारे सिंचनासाठी पाणी घ्यावयाचे असल्यास पाणी मागणी अर्ज नमूना क्रमांक संबंधित शाखा कार्यालयास सादर करावे, असे कळविले आहे. याकरिता लागणारा हा पाणी अर्ज नमूना ७ अ, ७ ब कोरे फॉर्म संबंधित शाखा कार्यालयात विनामूल्य देण्याची मागणी केली होती. खरीप हंगाम १ जुलै १४ नोव्हेंबर या कालावधीत मागणीप्रमाणे तीन पाणी पाळ्या देण्यात येतील. नमुना क्रमांक ७ चे प्राप्त झालेल्या पाणी अर्जदारास अथवा लाभधारकांना त्यांच्याकडील थकबाकीपैकी १/३ व चालू हंगामाची अग्रीम पाणीपट्टी भरावी लागेल. पिकाचे मागणीक्षेत्र २० आरच्या पटीत असावे. मंजूर उपसा सिंचन योजनाधारकांनी पाणी अर्ज मंजूर करुन घेऊनच उपसा सिंचनातील पाण्याचा वापर करावा. मंजूर क्षेत्रास कालव्याचे पाणी घेण्यात येणारी शेतचारी व विहिरीवरील शेतचारी यामध्ये तीन मीटरचे अंतर असले पाहिजे, असे कळविले आहे. पाणीपट्टी न भरणाऱ्या लाभधारकास सिंचनासाठी पाणी देणे उर्ध्व वर्धा धरण विभागाच्या कार्यालयावर बंधनकारक राहणार नाही. त्यांचा पाणीपुरवठा केव्हाही बंद करण्यात येईल व थकबाकीवर शासन निर्णयानुसार दरमहा १ टक्का दराने व्याज आकरण्यात येईल, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.कालव्याचे पाणी शेतात नेण्यासाठी असलेली पाटचरी स्वच्छ व व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी लाभधारकांची असल्याचे सांगण्यात आले आहे. पाटचरी स्वच्छतेअभावी पाणीपुरवठ्यामध्ये व्यत्यय आल्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही. तसेच लाभधारकांनी मंजूर क्षेत्राचे मर्यादेपर्यंत कालवा व नदी-नाल्याच्या पाण्याचा वापर करावा. लाभधारकाने दिवस व रात्री पाणी घेणे बंधनकारक आहे, असे प्रस्तावात नमुद केले आहे. कालवाप्रवाह क्षेत्रातील विहिरीवरुन औद्योगिक वापरासाठी अथवा पिण्याच्या पाण्यासाठी व इतर सिंचनोतर वापरलेल्या पाण्याची बिगर सिंचन पाणीपट्टी आकारणी याची माहिती शेतकऱ्यांना देण्यात येईल असेही या प्रस्तावात नमुद केले आहे. शेतकऱ्यांना काहीअंशी दिलासा मिळाला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)