शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
3
NASA : नासाचा मोठा निर्णय!इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
4
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
5
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
6
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
7
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
8
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
9
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
10
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
11
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
12
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
13
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
14
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
15
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
16
Raksha Bandhan 2025 Gift Ideas: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
17
354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’
18
'मंजिल आने वाली है...' कोडवर्ड देत पतीला कायमचं संपवलं; प्रियकरासोबत पत्नीनं रचलं क्रूर षडयंत्र
19
हृदयद्रावक! ढगफुटीमुळे भाऊ बेपत्ता, आता मी कोणाला राखी बांधू?; बहिणीने फोडला टाहो
20
पत्रिका पाहून लग्न करावं का? तेजश्री प्रधानचं लग्नसंस्थेवर भाष्य; म्हणाली, "पूर्वजांनी लिहून ठेवलंय..."

बोरधरणवरून होणार सेलूला पाणी पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 23:19 IST

शहरात पुरवठा केल्या जाणाºया पाण्यात क्षाराचे प्रमाण जास्त आहे. जलशुद्धीकरण केंद्र नसल्याने केवळ पाण्याच्या विहिरीत ब्लिचिंग पावडर टाकून पाण्याचे नाममात्र शुद्धीकरण केल्या जाते.

ठळक मुद्देनगर उत्थानचा निधी : तीन जलकुंभासह जलशुद्धीकरण केंद्राची निर्मिती

प्रफुल्ल लुंगे।लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : शहरात पुरवठा केल्या जाणाऱ्या पाण्यात क्षाराचे प्रमाण जास्त आहे. जलशुद्धीकरण केंद्र नसल्याने केवळ पाण्याच्या विहिरीत ब्लिचिंग पावडर टाकून पाण्याचे नाममात्र शुद्धीकरण केल्या जाते. या सर्व गंभीर बाबीचा विचार करून सेलू शहराला नगर उत्थान योजनेंतर्गत बोरधरणवरून पाणी पुरवठा करणारी नळ योजना मंजूर आहे. सुमारे ३७ कोटी रूपयांची ही योजना मुंबईला मंत्रालयस्तरावर अंतीम सोपस्कारात असून या पाणी पुरवठा योजनेला मुर्तरूप आल्यास अशुद्ध व क्षारयुक्त पाण्यातून सेलू शहरवासीयांची सुटका होणार आहे.शहराला सध्या बेलगाव येथील श्रीक्षेत्र उत्तरवाहिणी व जवादे यांच्या शेतातील विहिरीतून पाणी पुरवठा केल्या जात आहे. या बरोबरच बेलगाव गावातील खोडके कुटूंबाचे दान दिलेल्या विहिरीला भरपूर पाणी असल्याने तेथूनही पाणी पुरवठा केल्या जातो. शहरातील काही बोअरवेल व विहिरीवरून मोटारपंप लावून पाणी पुरवठ्याचे सातत्य कायम आहे. भर उन्हाळ्यातही शहरवासीयांना पुरेसे पाणी मिळेल अशी अवस्था आहे;पण या सर्व पाण्यात प्रमाणापेक्षा जास्त क्षाराचे प्रमाण असल्याने हा प्रकार नागरिकांच्या आरोग्यासाठी हानीकारक ठरत आहे. या योजनेंतर्गत बोरधरणाजवळ पाणी पुरवठा करणारी विहीर खोदल्या जाणार आहे. येथून सेलूपर्यंत सुमारे १६ किमी जलवाहिनी टाकल्या जाणार आहे. सेलूच्या भगत ले-आऊट, मटन मार्केट व बेलगावच्या खोडके ले-आऊट या ठिकाणी जलकुंभाची निर्मिती केली जाणार आहे. खोडके ले-आऊटच्या मोकळ्या जागेवर जलशुद्धीकरण केंद्र उभारल्या जाणार आहे. या सर्व कामांचे द्रोण कॅमेराद्वारे वर्षभरापूर्वीच मोजमापही करण्यात आले आहे. मंत्रालयात शासनस्तरावर या योजनेला लवकरच हिरवी झेंडी मिळाल्यास नवीन वर्षाच्या शेवटपर्यंत सदर कामही पूर्णत्वास जावू जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एकूच या कामामुळे जलसंकटावर मात करता येणार आहे.लोकप्रतिनिधींचा पुढाकार आवश्यकसेलू शहराला पुरवठा करण्यात येणाºया पाण्यात क्षाराचे प्रमाण अधीक आहे. त्याला आरोग्य विभागानेही वेळोवेळी दुजोरा दिला आहे. सदर पाणी जास्त काळ पिण्यात आल्यास अनेक आजारांची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे नव्या योजनेचे काम तातडीने सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.बोरधरणावरून सेलू शहराला पाणी पुरवठा करणारी योजना नगर उत्थान योजनेंतर्गत होत आहे. मंत्रालयस्तरावरून लवकरच मंजूरी प्राप्त होण्याचे संकेत आहेत. ३७ कोटी रूपयांची ही योजना सेलू शहरवासीयांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करणारी योजना ठरेल. यामुळे शहरवासीयांची क्षारयुक्त पाणी पिण्यापासून सुटका होणार आहे. नव्या वर्षाच्या अखेरपर्यंत योजना पूर्ण होवून कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.- डॉ. राजेश जयस्वाल, अध्यक्ष, नगरपंचायत, सेलू.