शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
3
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
4
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
5
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
6
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
7
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
8
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
9
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
10
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
11
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
12
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
13
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
14
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
15
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
16
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
17
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
18
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
19
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
20
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी

बोरधरणवरून होणार सेलूला पाणी पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 23:19 IST

शहरात पुरवठा केल्या जाणाºया पाण्यात क्षाराचे प्रमाण जास्त आहे. जलशुद्धीकरण केंद्र नसल्याने केवळ पाण्याच्या विहिरीत ब्लिचिंग पावडर टाकून पाण्याचे नाममात्र शुद्धीकरण केल्या जाते.

ठळक मुद्देनगर उत्थानचा निधी : तीन जलकुंभासह जलशुद्धीकरण केंद्राची निर्मिती

प्रफुल्ल लुंगे।लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : शहरात पुरवठा केल्या जाणाऱ्या पाण्यात क्षाराचे प्रमाण जास्त आहे. जलशुद्धीकरण केंद्र नसल्याने केवळ पाण्याच्या विहिरीत ब्लिचिंग पावडर टाकून पाण्याचे नाममात्र शुद्धीकरण केल्या जाते. या सर्व गंभीर बाबीचा विचार करून सेलू शहराला नगर उत्थान योजनेंतर्गत बोरधरणवरून पाणी पुरवठा करणारी नळ योजना मंजूर आहे. सुमारे ३७ कोटी रूपयांची ही योजना मुंबईला मंत्रालयस्तरावर अंतीम सोपस्कारात असून या पाणी पुरवठा योजनेला मुर्तरूप आल्यास अशुद्ध व क्षारयुक्त पाण्यातून सेलू शहरवासीयांची सुटका होणार आहे.शहराला सध्या बेलगाव येथील श्रीक्षेत्र उत्तरवाहिणी व जवादे यांच्या शेतातील विहिरीतून पाणी पुरवठा केल्या जात आहे. या बरोबरच बेलगाव गावातील खोडके कुटूंबाचे दान दिलेल्या विहिरीला भरपूर पाणी असल्याने तेथूनही पाणी पुरवठा केल्या जातो. शहरातील काही बोअरवेल व विहिरीवरून मोटारपंप लावून पाणी पुरवठ्याचे सातत्य कायम आहे. भर उन्हाळ्यातही शहरवासीयांना पुरेसे पाणी मिळेल अशी अवस्था आहे;पण या सर्व पाण्यात प्रमाणापेक्षा जास्त क्षाराचे प्रमाण असल्याने हा प्रकार नागरिकांच्या आरोग्यासाठी हानीकारक ठरत आहे. या योजनेंतर्गत बोरधरणाजवळ पाणी पुरवठा करणारी विहीर खोदल्या जाणार आहे. येथून सेलूपर्यंत सुमारे १६ किमी जलवाहिनी टाकल्या जाणार आहे. सेलूच्या भगत ले-आऊट, मटन मार्केट व बेलगावच्या खोडके ले-आऊट या ठिकाणी जलकुंभाची निर्मिती केली जाणार आहे. खोडके ले-आऊटच्या मोकळ्या जागेवर जलशुद्धीकरण केंद्र उभारल्या जाणार आहे. या सर्व कामांचे द्रोण कॅमेराद्वारे वर्षभरापूर्वीच मोजमापही करण्यात आले आहे. मंत्रालयात शासनस्तरावर या योजनेला लवकरच हिरवी झेंडी मिळाल्यास नवीन वर्षाच्या शेवटपर्यंत सदर कामही पूर्णत्वास जावू जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एकूच या कामामुळे जलसंकटावर मात करता येणार आहे.लोकप्रतिनिधींचा पुढाकार आवश्यकसेलू शहराला पुरवठा करण्यात येणाºया पाण्यात क्षाराचे प्रमाण अधीक आहे. त्याला आरोग्य विभागानेही वेळोवेळी दुजोरा दिला आहे. सदर पाणी जास्त काळ पिण्यात आल्यास अनेक आजारांची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे नव्या योजनेचे काम तातडीने सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.बोरधरणावरून सेलू शहराला पाणी पुरवठा करणारी योजना नगर उत्थान योजनेंतर्गत होत आहे. मंत्रालयस्तरावरून लवकरच मंजूरी प्राप्त होण्याचे संकेत आहेत. ३७ कोटी रूपयांची ही योजना सेलू शहरवासीयांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करणारी योजना ठरेल. यामुळे शहरवासीयांची क्षारयुक्त पाणी पिण्यापासून सुटका होणार आहे. नव्या वर्षाच्या अखेरपर्यंत योजना पूर्ण होवून कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.- डॉ. राजेश जयस्वाल, अध्यक्ष, नगरपंचायत, सेलू.