शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

बोरधरणवरून होणार सेलूला पाणी पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 23:19 IST

शहरात पुरवठा केल्या जाणाºया पाण्यात क्षाराचे प्रमाण जास्त आहे. जलशुद्धीकरण केंद्र नसल्याने केवळ पाण्याच्या विहिरीत ब्लिचिंग पावडर टाकून पाण्याचे नाममात्र शुद्धीकरण केल्या जाते.

ठळक मुद्देनगर उत्थानचा निधी : तीन जलकुंभासह जलशुद्धीकरण केंद्राची निर्मिती

प्रफुल्ल लुंगे।लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : शहरात पुरवठा केल्या जाणाऱ्या पाण्यात क्षाराचे प्रमाण जास्त आहे. जलशुद्धीकरण केंद्र नसल्याने केवळ पाण्याच्या विहिरीत ब्लिचिंग पावडर टाकून पाण्याचे नाममात्र शुद्धीकरण केल्या जाते. या सर्व गंभीर बाबीचा विचार करून सेलू शहराला नगर उत्थान योजनेंतर्गत बोरधरणवरून पाणी पुरवठा करणारी नळ योजना मंजूर आहे. सुमारे ३७ कोटी रूपयांची ही योजना मुंबईला मंत्रालयस्तरावर अंतीम सोपस्कारात असून या पाणी पुरवठा योजनेला मुर्तरूप आल्यास अशुद्ध व क्षारयुक्त पाण्यातून सेलू शहरवासीयांची सुटका होणार आहे.शहराला सध्या बेलगाव येथील श्रीक्षेत्र उत्तरवाहिणी व जवादे यांच्या शेतातील विहिरीतून पाणी पुरवठा केल्या जात आहे. या बरोबरच बेलगाव गावातील खोडके कुटूंबाचे दान दिलेल्या विहिरीला भरपूर पाणी असल्याने तेथूनही पाणी पुरवठा केल्या जातो. शहरातील काही बोअरवेल व विहिरीवरून मोटारपंप लावून पाणी पुरवठ्याचे सातत्य कायम आहे. भर उन्हाळ्यातही शहरवासीयांना पुरेसे पाणी मिळेल अशी अवस्था आहे;पण या सर्व पाण्यात प्रमाणापेक्षा जास्त क्षाराचे प्रमाण असल्याने हा प्रकार नागरिकांच्या आरोग्यासाठी हानीकारक ठरत आहे. या योजनेंतर्गत बोरधरणाजवळ पाणी पुरवठा करणारी विहीर खोदल्या जाणार आहे. येथून सेलूपर्यंत सुमारे १६ किमी जलवाहिनी टाकल्या जाणार आहे. सेलूच्या भगत ले-आऊट, मटन मार्केट व बेलगावच्या खोडके ले-आऊट या ठिकाणी जलकुंभाची निर्मिती केली जाणार आहे. खोडके ले-आऊटच्या मोकळ्या जागेवर जलशुद्धीकरण केंद्र उभारल्या जाणार आहे. या सर्व कामांचे द्रोण कॅमेराद्वारे वर्षभरापूर्वीच मोजमापही करण्यात आले आहे. मंत्रालयात शासनस्तरावर या योजनेला लवकरच हिरवी झेंडी मिळाल्यास नवीन वर्षाच्या शेवटपर्यंत सदर कामही पूर्णत्वास जावू जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एकूच या कामामुळे जलसंकटावर मात करता येणार आहे.लोकप्रतिनिधींचा पुढाकार आवश्यकसेलू शहराला पुरवठा करण्यात येणाºया पाण्यात क्षाराचे प्रमाण अधीक आहे. त्याला आरोग्य विभागानेही वेळोवेळी दुजोरा दिला आहे. सदर पाणी जास्त काळ पिण्यात आल्यास अनेक आजारांची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे नव्या योजनेचे काम तातडीने सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.बोरधरणावरून सेलू शहराला पाणी पुरवठा करणारी योजना नगर उत्थान योजनेंतर्गत होत आहे. मंत्रालयस्तरावरून लवकरच मंजूरी प्राप्त होण्याचे संकेत आहेत. ३७ कोटी रूपयांची ही योजना सेलू शहरवासीयांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करणारी योजना ठरेल. यामुळे शहरवासीयांची क्षारयुक्त पाणी पिण्यापासून सुटका होणार आहे. नव्या वर्षाच्या अखेरपर्यंत योजना पूर्ण होवून कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.- डॉ. राजेश जयस्वाल, अध्यक्ष, नगरपंचायत, सेलू.