शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प

By admin | Updated: October 28, 2015 02:19 IST

नगरपंचायतची निवडणूक लागली आहे. सारेच त्यात व्यस्त आहेत. यात गावात गत तीन दिवसांपासून नागरिकांना पाणी मिळाले नाही,

सारेच निवडणुकीत व्यस्त : थकीत रकमेसाठी पाणीपुरवठा बंदची चर्चाआष्टी (शहीद) : नगरपंचायतची निवडणूक लागली आहे. सारेच त्यात व्यस्त आहेत. यात गावात गत तीन दिवसांपासून नागरिकांना पाणी मिळाले नाही, याची कुणाला खंतही नसल्याचे दिसून आले आहे. २० हजार लोकसंख्या असलेल्या या शहरातील नागरिकांचे पाण्याअभावी हाल होत आहे. येथील पाईपलाईन फुटल्याने पाणीपुरवठा ठप्प असल्याचे सांगण्यात येत आहे. या दुरूस्तीकरिता केवळ दहा मिनिटांचा कालावधी लागत असून नगर पंचायत प्रशासन दुरुस्तीकरिता टाळाटाळ करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. शहरात शनिवारी कसाबसा पाणीपुरवठा झाला. त्याचदिवशी ममदापूर गावाजवळ लोखंडी पाईप गंजल्यामुळे फुटला. त्याला वेल्डींग करण्यासाठी अवघ्या दहा मिनीटांचा अवधी पाहिजे; मात्र यासाठी प्रशासकाच्या मंजुरीची आवश्यकता आहे. पाणीपुरवठ्याचा गंभीर प्रश्न पाहून प्रशासक तहसीलदार सीमा गजभिये यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तात्काळ दुरुस्ती करण्याचे आदेश दिले. तरी देखील दुरुस्तीकडे डोळेझाक केल्या जात आहे. सध्या जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून नगरपंचायतीला पाणीपुरवठा सुरू आहे. त्याच्या करापोटी ३८ लक्ष रुपयांचे देयक थकित असल्यामुळे पाणीपुरवठा बंद केल्याची चर्चा आहे.पाण्याकरिता येथील नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. भर हिवाळ्याच्या दिवसात ही वेळ आली आहे. यामुळे नगर पंचायतीच्या निवडणुकीनंतर नेमकी काय स्थिती येथील नागरिकांवर ओढवेल या बाबत दबक्या आवाजात चर्चा करताना सुरू आहे. नागरिकांच्या वाढत्या समस्यांकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे.याप्रकरणी माजी आमदार दादाराव केचे यांनी पाणीपुरवठ्याची पाईपलाईन फुटलेल्या भागाची पाहणी केली. पाईपलाईन तात्काळ दुरूस्त करून नागरिकांची होत असलेली गैरसोय टाळण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. माजी सरपंच सौदानसिंग टाँक यांनी प्रशासक गजभिये यांची भेट घेवून पाईपलाईनचे काम दोन तासात दुरुस्त होणे शक्य असून त्याकरिता २० हजारांचा खर्च असल्याचे सांगितले. मात्र प्रशासकांनी दीड लाखाचे ईस्टीमेट बनविले असून दुरुस्तीसाठी सांगतो अशी भूमिका घेतल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. शासनाचे अधिकारी शासनालाच चुणा लावत असल्याचा आरोप टाँक यांनी यावेळी केला. निवडणूक प्रचारामध्ये उमेदवार आश्वासनांची खैरात वाटत आहे; परंतु बंद असलेला पाणीपुरवठ्याचा मुद्दा एकानेही रेटून धरला नाही, हे विशेष. याकडे लक्ष देण्याची गरज वर्तविली जात आहे. (प्रतिनिधी)