शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प

By admin | Updated: October 28, 2015 02:19 IST

नगरपंचायतची निवडणूक लागली आहे. सारेच त्यात व्यस्त आहेत. यात गावात गत तीन दिवसांपासून नागरिकांना पाणी मिळाले नाही,

सारेच निवडणुकीत व्यस्त : थकीत रकमेसाठी पाणीपुरवठा बंदची चर्चाआष्टी (शहीद) : नगरपंचायतची निवडणूक लागली आहे. सारेच त्यात व्यस्त आहेत. यात गावात गत तीन दिवसांपासून नागरिकांना पाणी मिळाले नाही, याची कुणाला खंतही नसल्याचे दिसून आले आहे. २० हजार लोकसंख्या असलेल्या या शहरातील नागरिकांचे पाण्याअभावी हाल होत आहे. येथील पाईपलाईन फुटल्याने पाणीपुरवठा ठप्प असल्याचे सांगण्यात येत आहे. या दुरूस्तीकरिता केवळ दहा मिनिटांचा कालावधी लागत असून नगर पंचायत प्रशासन दुरुस्तीकरिता टाळाटाळ करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. शहरात शनिवारी कसाबसा पाणीपुरवठा झाला. त्याचदिवशी ममदापूर गावाजवळ लोखंडी पाईप गंजल्यामुळे फुटला. त्याला वेल्डींग करण्यासाठी अवघ्या दहा मिनीटांचा अवधी पाहिजे; मात्र यासाठी प्रशासकाच्या मंजुरीची आवश्यकता आहे. पाणीपुरवठ्याचा गंभीर प्रश्न पाहून प्रशासक तहसीलदार सीमा गजभिये यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तात्काळ दुरुस्ती करण्याचे आदेश दिले. तरी देखील दुरुस्तीकडे डोळेझाक केल्या जात आहे. सध्या जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून नगरपंचायतीला पाणीपुरवठा सुरू आहे. त्याच्या करापोटी ३८ लक्ष रुपयांचे देयक थकित असल्यामुळे पाणीपुरवठा बंद केल्याची चर्चा आहे.पाण्याकरिता येथील नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. भर हिवाळ्याच्या दिवसात ही वेळ आली आहे. यामुळे नगर पंचायतीच्या निवडणुकीनंतर नेमकी काय स्थिती येथील नागरिकांवर ओढवेल या बाबत दबक्या आवाजात चर्चा करताना सुरू आहे. नागरिकांच्या वाढत्या समस्यांकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे.याप्रकरणी माजी आमदार दादाराव केचे यांनी पाणीपुरवठ्याची पाईपलाईन फुटलेल्या भागाची पाहणी केली. पाईपलाईन तात्काळ दुरूस्त करून नागरिकांची होत असलेली गैरसोय टाळण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. माजी सरपंच सौदानसिंग टाँक यांनी प्रशासक गजभिये यांची भेट घेवून पाईपलाईनचे काम दोन तासात दुरुस्त होणे शक्य असून त्याकरिता २० हजारांचा खर्च असल्याचे सांगितले. मात्र प्रशासकांनी दीड लाखाचे ईस्टीमेट बनविले असून दुरुस्तीसाठी सांगतो अशी भूमिका घेतल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. शासनाचे अधिकारी शासनालाच चुणा लावत असल्याचा आरोप टाँक यांनी यावेळी केला. निवडणूक प्रचारामध्ये उमेदवार आश्वासनांची खैरात वाटत आहे; परंतु बंद असलेला पाणीपुरवठ्याचा मुद्दा एकानेही रेटून धरला नाही, हे विशेष. याकडे लक्ष देण्याची गरज वर्तविली जात आहे. (प्रतिनिधी)