शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

देवळीतील मलकापूर झाले जलयुक्त

By admin | Updated: August 5, 2016 02:00 IST

पावसाळ्यात नाल्याचे पाणी शेतात शिरुन खरीप पीक नष्ट होत होते. एखाद्या वर्षी चांगला पाऊस झाला

५३७ दलघमी पाणीसाठा : शेतकऱ्यांनी केली डाळिंबाची लागवड वर्धा : पावसाळ्यात नाल्याचे पाणी शेतात शिरुन खरीप पीक नष्ट होत होते. एखाद्या वर्षी चांगला पाऊस झाला तरच रबी पिकाची शाश्वती मलकापूर गावातील शेतकऱ्यांना होती. पण जलयुक्त शिवार अभियानात झालेल्या नाला खोलीकरणामुळे शेतात पाणी शिरण्यास पायबंद बसला आणि नाल्याकाठच्या अनेक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसू लागले. कित्येक वर्षात ज्या शेतात खरीपाचे पिकच आले नाही, त्या शेतात सोयाबीन, कापूस व तुरीचे पीक आज डौलाने उभे आहे. देवळी तालुक्यातील मलकापूर हे गाव कायम टंचाईग्रस्त गाव. मागील वर्षी या गावाची आणेवारी ५० टक्केच्या आत होती. २०१५-१६ मध्ये या गावाची निवड जलयुक्त शिवार अभियानात करण्यात आली आणि गावाचे चित्रच पालटले. गावाच्या एकूण पाण्याच्या गरजेनुसार पाण्याचे नियोजन करण्यात आले. यामध्ये सिमेंट नाला बांधासह नाला खोलीकरणाची सहा कामे, दोन साठवण बंधारे आणि पाणी पुरवठा योजनेच्या स्त्रोत बळकटीकरणासाठी भूमिगत रिचार्ज शाप्ट पाच अशी एकूण १३ कामे घेण्यात आली. त्यापैकी आठ कामे पूर्ण झाली असून पाच कामे प्रगतीपथावर आहे. गावाच्या एकूण वाटर बजेटींग नुसार ९१ टक्के पाण्याचे बजेटींग पूर्ण झाले आहे. सध्या गावात ५३७.६४ दलघमी पाणीसाठा असून या पाण्याचा उपयोग सुमारे ५३७ हेक्टराच्या सिंचनासाठी होणार आहे. या संपूर्ण कामासाठी १ कोटी ४६ लक्ष रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून त्यापैकी पूर्ण झालेल्या कामावर ७० लक्ष ६७ हजार रुपये खर्च झाले आहे. जलयुक्त शिवारमधील झालेल्या कामामुळे विशेषत: नाल्याकाठच्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होतांना दिसत आहे. पिण्याच्या पाण्याची काळजी मिटली. हे गाव कायम पाणी टंचाईग्रस्त होते. गावात ग्रामीण पाणी पुरवठा योजना आहे; मात्र या योजनेसाठी वापरण्यात येणारी विहीर उन्हाळ्यात कोरडी व्हायची. त्यामुळे गावात पाणी पुरवठा होत नव्हता. जलयुक्त शिवारमध्ये पाणी पुरवठा योजनेच्या स्त्रोत विहिरीजवळ रिचार्ज शाप्टची कामे करण्यात आली. यामुळे यावर्षी विहिरीची पाणी पातळी वाढली आहे. पुढील उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार नाही अशी आशा आहे. - साधना नेहारे, सरपंच, मलकापूर नाल्यालगत माझी पाच एकर शेती असून शेतात विहीर आहे. मात्र रब्बी पिकाला विहिरीचे पाणी पुरत नव्हते. पण नाला खोलीकरणाचे कामामुळे यावर्षी विहिरीच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली आहे. त्यामुळे दोन एकरात मी डाळिंबाची लागवड केली आहे. पावसाळ्यानंतर विहिरीच्या पाण्यावर डाळिंब शेती जगवता येईल. - प्रशांत निवल, शेतकरी,मलकापूर