शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

देवळीचा पाणीपुरवठा १३ दिवसांपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 23:00 IST

जीवन प्राधिकरणचा बेजबाबदारपणा व स्थानिक नगर पालिकेच्या नियोजन शुन्यतेमुळे येथील पाणीपुरवठ्याचे भवितव्य अंधातरी ठरले आहे. हा पाणीपुरवठा अंदोरी येथील वर्धा व देवळी येथील यशोदा या दोन नद्यावरून होत आहे.

ठळक मुद्देनागरिकांची भटकंती : जीवन प्राधिकरणने विद्युत देयक न भरल्याने कनेक्शन तोडले

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : जीवन प्राधिकरणचा बेजबाबदारपणा व स्थानिक नगर पालिकेच्या नियोजन शुन्यतेमुळे येथील पाणीपुरवठ्याचे भवितव्य अंधातरी ठरले आहे. हा पाणीपुरवठा अंदोरी येथील वर्धा व देवळी येथील यशोदा या दोन नद्यावरून होत आहे. वर्धा नदीवरून शहराला होणारा पाणीपुरवठा तब्बल तेरा दिवसापासून बंद आहे. जीवन प्राधीकरणाने महावितरण कंपनीचे विद्युत आकारणी देयक न भरल्यामुळे ही परिस्थिती ओढावली. नदीवरून होणारा पाणीपुरवठा मर्यादीत स्वरूपात होत आहे. या योजनेच्या दोन मोटारीपैकी एक मोटार बरेच दिवसापासून नादुरुस्त असल्याने येथील नागरिकांना दोन-दोन दिवसपर्यंत पाणी मिळत नसल्याची ओरड आहे.अंदोरी येथील वर्धा नदीवरून शहराला होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेची नुकतीच पुर्नबांधणी करण्यात आली. ही योजना ३५ कोटीच्या खर्चातून नव्याने उभी राहिली आहे. काही बाबी वगळता प्राधिकरणने या योजनेचे काम जवळपास पूर्ण केले आहे. वॉटर फिल्टर प्लॅन्ट २५ मे पासून कार्यान्वीत होवून शहराला पाणीपुरवठा होत आहे. येणाºया तीन वर्षापर्यंत ट्रायल म्हणून या योजनेचा कार्यभार जीवन प्राधिकरणकडे राहणार आहे. यानंतर ही योजना स्थानिक न.प. ला हस्तांतरीत होणार आहे. त्यामुळे सध्या विद्युत देयकाचा भरणा जीवन प्राधिकरणलाच करावा लागणार आहे.जीवन प्राधिकरण प्रशासनाच्या लालफीतशाहीमुळे विद्युत देयकाचे पैसे वेळेवर येत नसल्याने पाणीपुरवठा योजनेचे वीज कनेक्शन तोडण्यात येत आहे. याआधी सुध्दा एक-दोन वेळा हा प्रकार झाला आहे. यावेळेस तब्बल तेरा दिवस होवून सुध्दा महावितरणकडे पैशाचा भरणा न केल्यामुळे संपूर्ण योजनाच बंद पडली आहे. मुंबईच्या जीवन प्राधिकरण बोर्डाकडून हे पैसे येत असल्याने देयक भरण्यास वेळ होत असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगितले जात आहे.स्थानिक यशोदा नदीवरून होणाºया न.प. च्या पाणीपुरवठा योजनेची सुध्दा अशीच स्थिती आहे. यशोदेच्या पात्रात असलेल्या पाणीपुरवठ्याच्या विहिरीतून २५ व ३० हॉर्स पॉवरच्या दोन मोटारीचे माध्यमातून पाणी लिप्ट करण्याची व्यवस्था आहे. परंतु यापैकी एक मोटार गेल्या काही दिवसापासून नादुरुस्त आहे. त्यामुळे उर्वरीत एका मोटारीवर काम भागविले जात असल्याने देवळीकरांना दोन-दोन दिवसापयंत पिण्याच्या पाण्यापासून वंचीत राहावे लागत आहे. पिण्याचे पाण्यासाठी विधंन विहिरींचा सहारा घ्यावा लागत आहे.पाणी पुरवठा योजनेचे दीड लाखाचे विद्युत देयक प्राधीकरणकडे थकीत आहे. स्थानिक न.प. कडून लोकवर्गणी म्हणून मिळालेल्या धनादेशातून मुंबई प्राधीकरण बोर्डाकडे विद्युत देयकाची मागणी केली आहे. एक-दोन दिवसात देयकाचा भरणा केला जाणार आहे. महावितरण कंपनीने कनेक्शन तोडण्याची घाई न करता प्रत्येक महिन्याला काही दिवसांची अवधी द्यावी. यासाठी लेखी हमी देण्यास तयार आहे.- दीपक वाघ, शाखा अभियंता, जीवन प्राधिकरण, वर्धा.