शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

देवळीचा पाणीपुरवठा १३ दिवसांपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 23:00 IST

जीवन प्राधिकरणचा बेजबाबदारपणा व स्थानिक नगर पालिकेच्या नियोजन शुन्यतेमुळे येथील पाणीपुरवठ्याचे भवितव्य अंधातरी ठरले आहे. हा पाणीपुरवठा अंदोरी येथील वर्धा व देवळी येथील यशोदा या दोन नद्यावरून होत आहे.

ठळक मुद्देनागरिकांची भटकंती : जीवन प्राधिकरणने विद्युत देयक न भरल्याने कनेक्शन तोडले

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : जीवन प्राधिकरणचा बेजबाबदारपणा व स्थानिक नगर पालिकेच्या नियोजन शुन्यतेमुळे येथील पाणीपुरवठ्याचे भवितव्य अंधातरी ठरले आहे. हा पाणीपुरवठा अंदोरी येथील वर्धा व देवळी येथील यशोदा या दोन नद्यावरून होत आहे. वर्धा नदीवरून शहराला होणारा पाणीपुरवठा तब्बल तेरा दिवसापासून बंद आहे. जीवन प्राधीकरणाने महावितरण कंपनीचे विद्युत आकारणी देयक न भरल्यामुळे ही परिस्थिती ओढावली. नदीवरून होणारा पाणीपुरवठा मर्यादीत स्वरूपात होत आहे. या योजनेच्या दोन मोटारीपैकी एक मोटार बरेच दिवसापासून नादुरुस्त असल्याने येथील नागरिकांना दोन-दोन दिवसपर्यंत पाणी मिळत नसल्याची ओरड आहे.अंदोरी येथील वर्धा नदीवरून शहराला होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेची नुकतीच पुर्नबांधणी करण्यात आली. ही योजना ३५ कोटीच्या खर्चातून नव्याने उभी राहिली आहे. काही बाबी वगळता प्राधिकरणने या योजनेचे काम जवळपास पूर्ण केले आहे. वॉटर फिल्टर प्लॅन्ट २५ मे पासून कार्यान्वीत होवून शहराला पाणीपुरवठा होत आहे. येणाºया तीन वर्षापर्यंत ट्रायल म्हणून या योजनेचा कार्यभार जीवन प्राधिकरणकडे राहणार आहे. यानंतर ही योजना स्थानिक न.प. ला हस्तांतरीत होणार आहे. त्यामुळे सध्या विद्युत देयकाचा भरणा जीवन प्राधिकरणलाच करावा लागणार आहे.जीवन प्राधिकरण प्रशासनाच्या लालफीतशाहीमुळे विद्युत देयकाचे पैसे वेळेवर येत नसल्याने पाणीपुरवठा योजनेचे वीज कनेक्शन तोडण्यात येत आहे. याआधी सुध्दा एक-दोन वेळा हा प्रकार झाला आहे. यावेळेस तब्बल तेरा दिवस होवून सुध्दा महावितरणकडे पैशाचा भरणा न केल्यामुळे संपूर्ण योजनाच बंद पडली आहे. मुंबईच्या जीवन प्राधिकरण बोर्डाकडून हे पैसे येत असल्याने देयक भरण्यास वेळ होत असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगितले जात आहे.स्थानिक यशोदा नदीवरून होणाºया न.प. च्या पाणीपुरवठा योजनेची सुध्दा अशीच स्थिती आहे. यशोदेच्या पात्रात असलेल्या पाणीपुरवठ्याच्या विहिरीतून २५ व ३० हॉर्स पॉवरच्या दोन मोटारीचे माध्यमातून पाणी लिप्ट करण्याची व्यवस्था आहे. परंतु यापैकी एक मोटार गेल्या काही दिवसापासून नादुरुस्त आहे. त्यामुळे उर्वरीत एका मोटारीवर काम भागविले जात असल्याने देवळीकरांना दोन-दोन दिवसापयंत पिण्याच्या पाण्यापासून वंचीत राहावे लागत आहे. पिण्याचे पाण्यासाठी विधंन विहिरींचा सहारा घ्यावा लागत आहे.पाणी पुरवठा योजनेचे दीड लाखाचे विद्युत देयक प्राधीकरणकडे थकीत आहे. स्थानिक न.प. कडून लोकवर्गणी म्हणून मिळालेल्या धनादेशातून मुंबई प्राधीकरण बोर्डाकडे विद्युत देयकाची मागणी केली आहे. एक-दोन दिवसात देयकाचा भरणा केला जाणार आहे. महावितरण कंपनीने कनेक्शन तोडण्याची घाई न करता प्रत्येक महिन्याला काही दिवसांची अवधी द्यावी. यासाठी लेखी हमी देण्यास तयार आहे.- दीपक वाघ, शाखा अभियंता, जीवन प्राधिकरण, वर्धा.