शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

कायद्याच्या चाकोरीत न बसविता नागरिकांना पाणीपुरवठा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 23:48 IST

यंदाच्या वर्षी भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. प्रत्येक नागरिकाला पाणी मिळणे निकडीचे आहे. नियमाच्या चाकोरित प्रत्येक बाब बसविता येणार नाही. प्रशासकीय पातळीवर तातडीने उपाययोजना करण्यात येऊन पाणी टंचाईचे निराकरण करण्यात यावे, असे निर्देश आ. डॉ. पंकज भोयर यांनी दिलेत.

ठळक मुद्देपंकज भोयर यांचे निर्देश। अधिकाऱ्यांची घेतली निवासस्थानी आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यंदाच्या वर्षी भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. प्रत्येक नागरिकाला पाणी मिळणे निकडीचे आहे. नियमाच्या चाकोरित प्रत्येक बाब बसविता येणार नाही. प्रशासकीय पातळीवर तातडीने उपाययोजना करण्यात येऊन पाणी टंचाईचे निराकरण करण्यात यावे, असे निर्देश आ. डॉ. पंकज भोयर यांनी दिलेत.वर्धा विधानसभा क्षेत्रातील पाणी टंचाईचा आढावा घेण्यासाठी आ. डॉ. पंकज भोयर यांच्या निवासस्थानी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला जि.प. महिला व बालकल्याण सभापती सोनाली कलोडे, सेलू पं.स.च्या सभापती जयश्री खोडे, वर्धा पं.स.च्या सभापती महानंदा ताकसांडे, जि.प. सदस्य विनोद लाखे, अर्चना टोनपे, सायंकार, सरस्वती मडावी, राणा रणनवरे, पं.स. सदस्य अमित गावंडे, अशोक मुडे, प्रफुल्ल मोरे, चंदा सराम, दुर्गा ताजने, ज्योती टिपले, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत गहलोत, नायब तहसीलदार जाधव, तिनघसे, गटविकास अधिकारी इसाये, पाटील यांच्यासह सरपंच, ग्राम विस्तार अधिकारी, ग्रामसेवक यांची उपस्थिती होती. यावेळी पहिल्या व दुसºया टप्प्यात पाणी टंचाई संदर्भात करण्यात आलेल्या उपाययोजनाचा आढावा आ. डॉ. पंकज भोयर यांनी घेतला. मागील दोन वर्षात पर्जन्यमान कमी झाले असून उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत असल्याचे सांगून जलस्त्रोत झपाट्याने कमी होत असल्याने पाणी समस्या गंभीर होत असल्याचे सरपंचांनी सांगितले. गावातील बोअरवेल, विहिरी आटत असून नैसर्गिंक जलस्त्रोत पूर्ण पणे आटले आहे. त्यामुळे भीषण पाणी टंचाईची समस्या निर्माण झाल्याचे सांगितले. गावातील विहिरींचे खोलीकरण, नवीन विहिरी अधिग्रहित करणे, टँकरने पाणी पुरवठा याबाबीवर काम करण्यात यावे, अशी सूचना सरपंचानी केली. यावेळी आ. भोयर यांनी सर्वांच्या अडचणी जाणून घेत प्रत्येकासाठी पाणी महत्वाचे आहे. माणसासोबतच जनावरांना सुद्धा पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात याव्या. पाणी टंचाईची समस्या गंभीर असून ती सोडविण्याला अधिकाऱ्यांनीही प्राथमिकता द्यावी.प्रत्येक गावातील लोकप्रतिनिधींनी नागरिकांशी समन्वय साधून त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावे, अशा सूचना केल्या. वर्धा शहराशेजारील ग्रामीण भागासह पांढरकवडा पारधीबेडा येथील पाणी टंचाई बाबत प्रत्यक्ष जाऊन पाहणी करावी, अशा सूचना अधिकाºयांना आ. भोयर यांनी दिल्या. बैठकीला अशोक कलोडे, आशिष कुचेवार, विजय खोडे, वासुदेव देवडे, शुभंगी मुडे, संदीप पाटील, खोसे आदी हजर होते.जाणून घेतल्या गावातील समस्याआमदार पंकज भोयर यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीदरम्यान वर्धा शहराशेजारी असलेल्या गावांमधील सरपंचांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांनी आमदारांसमोर गावातील पाणीसमस्येचा पाढाच वाचला. यामुळे अधिकाºयांची मात्र तारांबळ उडाली.

टॅग्स :Pankaj Bhoyarपंकज भोयरWaterपाणी