शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

कायद्याच्या चाकोरीत न बसविता नागरिकांना पाणीपुरवठा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 23:48 IST

यंदाच्या वर्षी भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. प्रत्येक नागरिकाला पाणी मिळणे निकडीचे आहे. नियमाच्या चाकोरित प्रत्येक बाब बसविता येणार नाही. प्रशासकीय पातळीवर तातडीने उपाययोजना करण्यात येऊन पाणी टंचाईचे निराकरण करण्यात यावे, असे निर्देश आ. डॉ. पंकज भोयर यांनी दिलेत.

ठळक मुद्देपंकज भोयर यांचे निर्देश। अधिकाऱ्यांची घेतली निवासस्थानी आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यंदाच्या वर्षी भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. प्रत्येक नागरिकाला पाणी मिळणे निकडीचे आहे. नियमाच्या चाकोरित प्रत्येक बाब बसविता येणार नाही. प्रशासकीय पातळीवर तातडीने उपाययोजना करण्यात येऊन पाणी टंचाईचे निराकरण करण्यात यावे, असे निर्देश आ. डॉ. पंकज भोयर यांनी दिलेत.वर्धा विधानसभा क्षेत्रातील पाणी टंचाईचा आढावा घेण्यासाठी आ. डॉ. पंकज भोयर यांच्या निवासस्थानी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला जि.प. महिला व बालकल्याण सभापती सोनाली कलोडे, सेलू पं.स.च्या सभापती जयश्री खोडे, वर्धा पं.स.च्या सभापती महानंदा ताकसांडे, जि.प. सदस्य विनोद लाखे, अर्चना टोनपे, सायंकार, सरस्वती मडावी, राणा रणनवरे, पं.स. सदस्य अमित गावंडे, अशोक मुडे, प्रफुल्ल मोरे, चंदा सराम, दुर्गा ताजने, ज्योती टिपले, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत गहलोत, नायब तहसीलदार जाधव, तिनघसे, गटविकास अधिकारी इसाये, पाटील यांच्यासह सरपंच, ग्राम विस्तार अधिकारी, ग्रामसेवक यांची उपस्थिती होती. यावेळी पहिल्या व दुसºया टप्प्यात पाणी टंचाई संदर्भात करण्यात आलेल्या उपाययोजनाचा आढावा आ. डॉ. पंकज भोयर यांनी घेतला. मागील दोन वर्षात पर्जन्यमान कमी झाले असून उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत असल्याचे सांगून जलस्त्रोत झपाट्याने कमी होत असल्याने पाणी समस्या गंभीर होत असल्याचे सरपंचांनी सांगितले. गावातील बोअरवेल, विहिरी आटत असून नैसर्गिंक जलस्त्रोत पूर्ण पणे आटले आहे. त्यामुळे भीषण पाणी टंचाईची समस्या निर्माण झाल्याचे सांगितले. गावातील विहिरींचे खोलीकरण, नवीन विहिरी अधिग्रहित करणे, टँकरने पाणी पुरवठा याबाबीवर काम करण्यात यावे, अशी सूचना सरपंचानी केली. यावेळी आ. भोयर यांनी सर्वांच्या अडचणी जाणून घेत प्रत्येकासाठी पाणी महत्वाचे आहे. माणसासोबतच जनावरांना सुद्धा पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात याव्या. पाणी टंचाईची समस्या गंभीर असून ती सोडविण्याला अधिकाऱ्यांनीही प्राथमिकता द्यावी.प्रत्येक गावातील लोकप्रतिनिधींनी नागरिकांशी समन्वय साधून त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावे, अशा सूचना केल्या. वर्धा शहराशेजारील ग्रामीण भागासह पांढरकवडा पारधीबेडा येथील पाणी टंचाई बाबत प्रत्यक्ष जाऊन पाहणी करावी, अशा सूचना अधिकाºयांना आ. भोयर यांनी दिल्या. बैठकीला अशोक कलोडे, आशिष कुचेवार, विजय खोडे, वासुदेव देवडे, शुभंगी मुडे, संदीप पाटील, खोसे आदी हजर होते.जाणून घेतल्या गावातील समस्याआमदार पंकज भोयर यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीदरम्यान वर्धा शहराशेजारी असलेल्या गावांमधील सरपंचांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांनी आमदारांसमोर गावातील पाणीसमस्येचा पाढाच वाचला. यामुळे अधिकाºयांची मात्र तारांबळ उडाली.

टॅग्स :Pankaj Bhoyarपंकज भोयरWaterपाणी