शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

कायद्याच्या चाकोरीत न बसविता नागरिकांना पाणीपुरवठा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 23:48 IST

यंदाच्या वर्षी भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. प्रत्येक नागरिकाला पाणी मिळणे निकडीचे आहे. नियमाच्या चाकोरित प्रत्येक बाब बसविता येणार नाही. प्रशासकीय पातळीवर तातडीने उपाययोजना करण्यात येऊन पाणी टंचाईचे निराकरण करण्यात यावे, असे निर्देश आ. डॉ. पंकज भोयर यांनी दिलेत.

ठळक मुद्देपंकज भोयर यांचे निर्देश। अधिकाऱ्यांची घेतली निवासस्थानी आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यंदाच्या वर्षी भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. प्रत्येक नागरिकाला पाणी मिळणे निकडीचे आहे. नियमाच्या चाकोरित प्रत्येक बाब बसविता येणार नाही. प्रशासकीय पातळीवर तातडीने उपाययोजना करण्यात येऊन पाणी टंचाईचे निराकरण करण्यात यावे, असे निर्देश आ. डॉ. पंकज भोयर यांनी दिलेत.वर्धा विधानसभा क्षेत्रातील पाणी टंचाईचा आढावा घेण्यासाठी आ. डॉ. पंकज भोयर यांच्या निवासस्थानी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला जि.प. महिला व बालकल्याण सभापती सोनाली कलोडे, सेलू पं.स.च्या सभापती जयश्री खोडे, वर्धा पं.स.च्या सभापती महानंदा ताकसांडे, जि.प. सदस्य विनोद लाखे, अर्चना टोनपे, सायंकार, सरस्वती मडावी, राणा रणनवरे, पं.स. सदस्य अमित गावंडे, अशोक मुडे, प्रफुल्ल मोरे, चंदा सराम, दुर्गा ताजने, ज्योती टिपले, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत गहलोत, नायब तहसीलदार जाधव, तिनघसे, गटविकास अधिकारी इसाये, पाटील यांच्यासह सरपंच, ग्राम विस्तार अधिकारी, ग्रामसेवक यांची उपस्थिती होती. यावेळी पहिल्या व दुसºया टप्प्यात पाणी टंचाई संदर्भात करण्यात आलेल्या उपाययोजनाचा आढावा आ. डॉ. पंकज भोयर यांनी घेतला. मागील दोन वर्षात पर्जन्यमान कमी झाले असून उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत असल्याचे सांगून जलस्त्रोत झपाट्याने कमी होत असल्याने पाणी समस्या गंभीर होत असल्याचे सरपंचांनी सांगितले. गावातील बोअरवेल, विहिरी आटत असून नैसर्गिंक जलस्त्रोत पूर्ण पणे आटले आहे. त्यामुळे भीषण पाणी टंचाईची समस्या निर्माण झाल्याचे सांगितले. गावातील विहिरींचे खोलीकरण, नवीन विहिरी अधिग्रहित करणे, टँकरने पाणी पुरवठा याबाबीवर काम करण्यात यावे, अशी सूचना सरपंचानी केली. यावेळी आ. भोयर यांनी सर्वांच्या अडचणी जाणून घेत प्रत्येकासाठी पाणी महत्वाचे आहे. माणसासोबतच जनावरांना सुद्धा पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात याव्या. पाणी टंचाईची समस्या गंभीर असून ती सोडविण्याला अधिकाऱ्यांनीही प्राथमिकता द्यावी.प्रत्येक गावातील लोकप्रतिनिधींनी नागरिकांशी समन्वय साधून त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावे, अशा सूचना केल्या. वर्धा शहराशेजारील ग्रामीण भागासह पांढरकवडा पारधीबेडा येथील पाणी टंचाई बाबत प्रत्यक्ष जाऊन पाहणी करावी, अशा सूचना अधिकाºयांना आ. भोयर यांनी दिल्या. बैठकीला अशोक कलोडे, आशिष कुचेवार, विजय खोडे, वासुदेव देवडे, शुभंगी मुडे, संदीप पाटील, खोसे आदी हजर होते.जाणून घेतल्या गावातील समस्याआमदार पंकज भोयर यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीदरम्यान वर्धा शहराशेजारी असलेल्या गावांमधील सरपंचांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांनी आमदारांसमोर गावातील पाणीसमस्येचा पाढाच वाचला. यामुळे अधिकाºयांची मात्र तारांबळ उडाली.

टॅग्स :Pankaj Bhoyarपंकज भोयरWaterपाणी