शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

भर पावसाळ्यात पाणीटंचाई; ग्रामस्थ त्रस्त

By admin | Updated: August 9, 2014 23:52 IST

उन्हाळ्याच्या दिवसांत तीव्र पाणीटंचाईला कंटाळलेल्या येथील नागरिकांना पावसाळ्यातही कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे़ यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहे़ ग्रामपंचायत प्रशासन

रोहणा : उन्हाळ्याच्या दिवसांत तीव्र पाणीटंचाईला कंटाळलेल्या येथील नागरिकांना पावसाळ्यातही कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे़ यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहे़ ग्रामपंचायत प्रशासन ग्रामस्थांच्या किमान अपेक्षांचीही पूर्ती करू शकत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे़ संबंधितांनी याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे़एकेकाळी जिल्ह्याच्या राजकारणाचे केंद्र असलेल्या रोहणा गावात प्रत्येक लहान-मोठी निवडणूक जिद्दीने लढली जात असे; पण कालांतराने हा परस्पर विरोध कमी होऊन सत्तेतून वृद्धांनी बाजूला व्हावे व युवकांच्या हातात सत्तेची चावी सोपवावी, ही मानसिकता वाढीस लागली़ परिणामी, गावात एकोपा निर्माण होऊन ग्रामपंचायत निवडणूक अविरोध पार पाडण्यात आली़ यात गावातील सुशिक्षित, राजकीय जाण असलेल्या राजकीय पक्षातील युवक, युवतींना ग्रामपंचायत सदस्य म्हणून सर्वानुमते निवडण्यात आले़ सत्तेची चावी तरुणांच्या हातात सोपविताना ग्रामस्थांना गावातील पाणीटंचाई, रस्त्यावरील अतिक्रमण व प्राथमिक आरोग्य केंद्रातील समस्या सोडविल्या जातील, अशी अपेक्षा होती़ यासाठी त्यांना कार्यक्षम म्हणून लौकिक असणारा ग्रामविकास अधिकारी प्राप्त झाला; पण या तरूण चमूचा तीन चतुर्थांश काळ संपला असताना एकही समस्या सुटली नाही़ उन्हाळ्यातील पाणीटंचाईने पावसाळ्यात त्यापेक्षा भयानक रूप धारण केले आहे़ मागील १० दिवसांपासून गावात नळाला पाणी येणे बंद आहे़ नळ योजनेतील विद्युतचे दोन्ही मोटरपंप जळाल्याचे कारण पूढे केले जात आहे़ वास्तविक, एक मोटर पंप जळाला तर दुसरा अतिरिक्त मोटर पंप उपलब्ध ठेवणे प्रशासनाचे कर्तव्य आहे़ मोटर दुरूस्तीला दहा दिवस लागतात़ ही बाब प्रशासनाच्या अकार्यक्षमतेची परिसीमा आहे़ नदीला पाणी आहे़ नळयोजनेच्या विहरीत जलसाठा आहे़ विद्युत वितरण कंपनीने भारनियमन बंद केले आहे़ असे असताना ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे़ यामुळे गावात ग्रा़पं़ प्रशासनाविरूद्ध नाराजी दिसून येत आहे़ अनेक ग्रामस्थ युवकांच्या हाती सत्ता देऊन आपली फसगत झाल्याची भावना व्यक्त करतात़ काही तरूण सदस्य तर कधीच मासिक सभेला हजर राहत नसल्याची माहिती आहे़ अशा सदस्यांनी राजीनामा देत दुसऱ्या तरूणाला संधी देणे गरजेचे आहे़ उर्वरित कालावधीत पाणीटंचाई जाणवू नये म्हणून शक्य प्रयत्न करावेत, अशी मागणी ग्रामस्थांद्वारे करण्यात येत आहे़(वार्ताहर)