शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
5
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
6
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकड्यांचा फज्जा
7
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
8
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
9
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
10
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
11
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
12
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
13
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
14
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
15
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
16
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
17
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
18
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
19
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...
20
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट

नळयोजना रखडल्याने पाणी टंचाईचे सावट

By admin | Updated: December 1, 2014 22:59 IST

जि़प़ पाणी पुरवठा विभागाद्वारे गावे टंचाईमुक्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत़ यासाठी प्रत्येक गावात नळयोजना सुरू केली जात आहे़ समुद्रपूर तालुक्यातील गोविंदपूर येथेही नळयोजनेचे काम पूर्ण झाले आहे़

वर्धा : जि़प़ पाणी पुरवठा विभागाद्वारे गावे टंचाईमुक्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत़ यासाठी प्रत्येक गावात नळयोजना सुरू केली जात आहे़ समुद्रपूर तालुक्यातील गोविंदपूर येथेही नळयोजनेचे काम पूर्ण झाले आहे़ यास एक वर्षाचा कालावधी लोटला; पण नळयोजना सुरू झाली नाही़ केवळ रोहित्र न लागल्याने नळयोजना रखडल्याचे सांगितले जाते़ यामुळे ग्रामस्थांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे दिसते़समुद्रपूर तालुक्यातील गोविंदपूर येथे बोअरवेलला पाणी लागत नाही़ सतत पाण्याची टंचाई भासत असल्याने जि़प़ पाणी पुरवठा विभागांतर्गत नळयोजना प्रस्तावित करण्यात आली़ यासाठी विहिरीचे बांधकाम, विद्युत मोटर, पाईपलाईन, वीज पुरवठ्यास लागणारे साहित्य, विजेचे खांब ही सर्व कामे पूर्ण करण्यात आली आहेत़ एक वर्षापूर्वी नळयोजनेचे संपूर्ण सोपस्कार पार पाडण्यात आले़ केवळ रोहित्र बसविणे शिल्लक राहिले होते़ या रोहित्रासाठी निधी नसल्याचे कारण पूढे केले जात आहे़ एक वर्षापासून काम पूर्ण होऊनही नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे़ नळयोजना पूर्ण होऊन नळाद्वारे पाणी मिळेल, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करीत होते़ यासाठी एक वर्षापासून प्रतीक्षाही करीत आहेत; पण अद्याप ही योजना सुरूच झाली नाही़ केवळ रोहित्र नसल्याने नळयोजना रखडली आहे़ यामुळे नाईलाजाने ग्रामस्थांना बोअरवेल कराव्या लागत आहेत़ गोविंदपूर येथील अनेक ग्रामस्थांनी आपापल्या घरी बोअरवेल केल्या; पण पाणी लागले नाही़ १०० ते १५० फुट खोल खोदूनही पाणी लागत नसल्याने नागरिकांना अकारण भुर्दंड सोसावा लागत आहे़ सुनील हिवंज यांनीही काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरी बोअरवेल केली़ सुमारे दीडशे फुट खोदल्यानंतरही पाणीच लागले नाही़ यामुळे त्यांना ३० ते ३५ हजार रुपयांचा नाहक भुर्दंड सोसावा लागला़ गावातील नळयोजना सुरू झाली असती तर ग्रामस्थांना बोअरवेलचा खर्च करावा लागला नसता़ पाणी टंचाई असताना ग्रा़पं़ प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत़ विजेचे खांब, डीपी लावल्यानंतर केवळ रोहित्रासाठी वर्षभरापासून नळयोजना थंडबस्त्यात आहे़ प्रशासकीय स्तरावर यासाठी प्रयत्न होताना दिसत नसल्याने ग्रामस्थांत असंतोष पसरला आहे़ जि़प़ पाणी पुरवठा विभाग, ग्रा़पं़ प्रशासन व वीज कंपनीने कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे़़(कार्यालय प्रतिनिधी)