शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
6
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
7
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
8
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
9
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
10
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
11
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
12
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
13
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
14
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
15
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
16
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
17
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
18
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
19
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
20
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)

नळयोजना रखडल्याने पाणी टंचाईचे सावट

By admin | Updated: December 1, 2014 22:59 IST

जि़प़ पाणी पुरवठा विभागाद्वारे गावे टंचाईमुक्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत़ यासाठी प्रत्येक गावात नळयोजना सुरू केली जात आहे़ समुद्रपूर तालुक्यातील गोविंदपूर येथेही नळयोजनेचे काम पूर्ण झाले आहे़

वर्धा : जि़प़ पाणी पुरवठा विभागाद्वारे गावे टंचाईमुक्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत़ यासाठी प्रत्येक गावात नळयोजना सुरू केली जात आहे़ समुद्रपूर तालुक्यातील गोविंदपूर येथेही नळयोजनेचे काम पूर्ण झाले आहे़ यास एक वर्षाचा कालावधी लोटला; पण नळयोजना सुरू झाली नाही़ केवळ रोहित्र न लागल्याने नळयोजना रखडल्याचे सांगितले जाते़ यामुळे ग्रामस्थांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे दिसते़समुद्रपूर तालुक्यातील गोविंदपूर येथे बोअरवेलला पाणी लागत नाही़ सतत पाण्याची टंचाई भासत असल्याने जि़प़ पाणी पुरवठा विभागांतर्गत नळयोजना प्रस्तावित करण्यात आली़ यासाठी विहिरीचे बांधकाम, विद्युत मोटर, पाईपलाईन, वीज पुरवठ्यास लागणारे साहित्य, विजेचे खांब ही सर्व कामे पूर्ण करण्यात आली आहेत़ एक वर्षापूर्वी नळयोजनेचे संपूर्ण सोपस्कार पार पाडण्यात आले़ केवळ रोहित्र बसविणे शिल्लक राहिले होते़ या रोहित्रासाठी निधी नसल्याचे कारण पूढे केले जात आहे़ एक वर्षापासून काम पूर्ण होऊनही नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे़ नळयोजना पूर्ण होऊन नळाद्वारे पाणी मिळेल, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करीत होते़ यासाठी एक वर्षापासून प्रतीक्षाही करीत आहेत; पण अद्याप ही योजना सुरूच झाली नाही़ केवळ रोहित्र नसल्याने नळयोजना रखडली आहे़ यामुळे नाईलाजाने ग्रामस्थांना बोअरवेल कराव्या लागत आहेत़ गोविंदपूर येथील अनेक ग्रामस्थांनी आपापल्या घरी बोअरवेल केल्या; पण पाणी लागले नाही़ १०० ते १५० फुट खोल खोदूनही पाणी लागत नसल्याने नागरिकांना अकारण भुर्दंड सोसावा लागत आहे़ सुनील हिवंज यांनीही काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरी बोअरवेल केली़ सुमारे दीडशे फुट खोदल्यानंतरही पाणीच लागले नाही़ यामुळे त्यांना ३० ते ३५ हजार रुपयांचा नाहक भुर्दंड सोसावा लागला़ गावातील नळयोजना सुरू झाली असती तर ग्रामस्थांना बोअरवेलचा खर्च करावा लागला नसता़ पाणी टंचाई असताना ग्रा़पं़ प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत़ विजेचे खांब, डीपी लावल्यानंतर केवळ रोहित्रासाठी वर्षभरापासून नळयोजना थंडबस्त्यात आहे़ प्रशासकीय स्तरावर यासाठी प्रयत्न होताना दिसत नसल्याने ग्रामस्थांत असंतोष पसरला आहे़ जि़प़ पाणी पुरवठा विभाग, ग्रा़पं़ प्रशासन व वीज कंपनीने कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे़़(कार्यालय प्रतिनिधी)