शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

जलकुंभाची सुरक्षा धोक्यात

By admin | Updated: April 14, 2017 02:20 IST

वरूड रेल्वे ग्रामपंचायत अंतर्गत आणि मुख्य मार्गावरील पेट्रोल पंपाच्या मागे पिपरी (मेघे) अधिक अकरा गावे या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा जलकुंभ आहे.

जीवन प्राधिकरणचे दुर्लक्ष : प्रवेशद्वाराचा पत्ताच नाहीसेवाग्राम : वरूड रेल्वे ग्रामपंचायत अंतर्गत आणि मुख्य मार्गावरील पेट्रोल पंपाच्या मागे पिपरी (मेघे) अधिक अकरा गावे या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा जलकुंभ आहे. या जलकुंभाची सुरक्षा व्यवस्था धोक्यात आली आहे. कुंपणाच्या तारा तुटलेल्या असून गेट बेपत्ता ओह. शिवाय पायऱ्यांना कुलूप नसल्याचे दिसून आले. याकडे जीवन प्राधिकरणचे दुर्लक्ष होत असल्याचेच दिसते.वर्धा शहरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नागरी व ग्रामीण योजना विभागाचे मुख्य कार्यालय आहे. या अंतर्गत अकरा गावांना शुद्ध पाणी पुरवठा केला जातो. यासाठी जलकुंभाची व्यवस्था करण्यात आली आहे. वरूड गावाचा विस्तार नव्या ले-आऊटमुळे होत आहे. यातून ग्रा.पं. ला आर्थिक उत्पन्न मिळण्याचा स्त्रोत निर्माण झाला आहे. नव्या वसाहती निर्माण झाल्या असल्या तरी सर्वात प्राथमिक गरज पाण्याची आहे. ही गरज लक्षात घेऊन सधन व नव्या ले-आऊटमध्ये उंच भागावर ४ लाख ५० हजार लिटरचा जलकुंभ तयार करण्यात आला आहे. यातून नागरिकांना पाणी पुरवठा केला जात आहे. सदर जलकुंभाला सुरक्षेसाठी तारांचे कुंपण केले. वर जाण्यासाठी पायऱ्या असून कुणी जाऊ नये म्हणून जिन्याला गेट होते; पण सध्या जलकुंभ असुरक्षित असल्याचे दिसते. कुंपणाच्या तारा तुटल्या असून प्रवेशद्वाराचा खांब वाकला. प्रवेशद्वाराचा पत्ताच नाही. जिन्याच्या गेटला कुलूप नसल्याचे दिसून आले. हजारो लोकांना पाणी देणाऱ्या जलकुंभाच्या सुरक्षिततेकडे सध्या दुर्लक्षच होत असल्याचे दिसते. उपविभागीय कार्यालयाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.(वार्ताहर)