शहरं
Join us  
Trending Stories
1
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणीचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला, मृत्यू नेमका कशामुळे?
3
Video: ७ महिन्याच्या गर्भवतीनं उचललं तब्बल १४५ किलो वजन; कसा अन् कुणी केला हा पराक्रम?
4
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
5
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? एसबीआय करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
6
अस्थिर बाजारात 'सुझलॉन'ची मोठी झेप! तिमाही निकालापूर्वीच भाव वाढला; दुसऱ्यांदा मल्टीबॅगर ठरणार?
7
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
8
‘त्यांनी आपल्या २ मुली पळवल्या तर तुम्ही त्यांच्या १० जणीं घेऊन या’, भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान  
9
अर्जुन तेंडुलकर चमकला; पण 'या' गोलंदाजाने दिला त्रास! रन काढू दिलीच नाही, विकेटही घेतली...
10
महागडे मोबाइल अन् मोठे टीव्हीच हवेत; या दिवाळीत 'प्रीमियम' खरेदीचा नवा पॅटर्न समोर
11
कोण आहे रंजना प्रकाश देसाई?; ज्यांना ८ व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदाची मिळाली जबाबदारी
12
रणबीरच्या 'रामायण'मध्ये विवेक ओबेरॉयचीही भूमिका, अभिनेत्याने दान केलं मानधन; म्हणाला...
13
बाजारात मोठी अस्थिरता! सेंसेक्स-निफ्टी सपाट पातळीवर बंद; महिंद्रा-बजाजसह 'हे' शेअर्स आपटले
14
प्रणित मोरे ऐकत नाय! क्रिकेटपटूच्या बहिणीसोबत वाढतेय जवळीक? 'बिग बॉस'च्या घरातील व्हिडीओ पाहून चाहतेही अवाक्
15
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
16
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
17
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
18
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
19
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
20
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण

शेतकऱ्यांवर जलसंकट, भाजीपाला पीक करपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 22:07 IST

यावर्षी जिल्ह्यात अल्प प्रमाणात पाऊस झाला. यामुळे शेतातील विहिरींची पाणीपातळी पाहिजे त्या प्रमाणात वाढली नाही. याचाच परिणाम म्हणून फेब्रुवारीतच शेतातील विहिरींनी तळ गाठला असल्याचे चिकणीसह परिसरात दिसून येते. पाण्याअभावी भाजीपाला पीकही करपण्याच्या मार्गावर असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत.

ठळक मुद्देउन्हाळ्याची चाहूल लागताच विहिरींनी गाठला तळ

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : यावर्षी जिल्ह्यात अल्प प्रमाणात पाऊस झाला. यामुळे शेतातील विहिरींची पाणीपातळी पाहिजे त्या प्रमाणात वाढली नाही. याचाच परिणाम म्हणून फेब्रुवारीतच शेतातील विहिरींनी तळ गाठला असल्याचे चिकणीसह परिसरात दिसून येते. पाण्याअभावी भाजीपाला पीकही करपण्याच्या मार्गावर असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत.चिकणी येथील अल्पभूधारक शेतकरी विजय डायरे यांनी ओलिताखाली असलेल्या एक एकर शेतात विविध प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड केली होती. लागवडीकरिता त्यांनी मोठ्या प्रमाणावर खर्चही केला. यामध्ये त्यांनी वांगी, मिरची, कांदा, लसूण, मेथी आदी भाजीपाला पिकाची लागवड केली होती. परंतु, ऐन फेब्रुवारीतच विहिरीचे पाणी आटल्यामुळे पिकांना ओलिताची समस्या निर्माण आणि पीक करपले. यात डायरे यांचे मोठे नुकसान झाले आहे.पाणी... जपूनच!शहरासह लगतच्या ११ गावांतील नागरिकांना यंदा भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. ग्रामीण भागात नागरिक पाण्याची अनावश्यक नासाडी करीत आहे. रस्त्यावर सकाळी व सायंकाळी नळाद्वारे पाणी मारत आहे. तसेच घराशेजारी वाहने धुण्याचे काम केले जात आहे. अनेक जण पाणी चक्क नाल्यांमध्ये सोडून देतात. तेव्हा नागरिकांनी पाण्याचा जपूनच वापर करावा, असे आवाहन सामाजिक संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.पाणीपातळीत झपाट्याने घटयावर्षी जिल्ह्यात ७७ टक्केच पाऊस झाला आहे. त्यामुळे पाणीसंकट अतिशय तीव्र स्वरूपात राहणार आहे. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यातच अनेक भागात विहिरींची पातळी खोल गेली आहे. शेतातील मोठ्या विहिरींच्या पाणी पातळीतही घट झाली असून शहरात नळाद्वारे पाणीपुरवठा अनियमित होत असल्याने अनेक नागरिकांनी बोअरवेल तयार केल्या. मात्र, मागील एक ते दीड महिन्यापूर्वी तयार केलेल्या बोअरवेलचीही पातळी खोल गेली आहे. काही ठिंकाणी बोअरवेल कोरड्या पडल्या आहे. त्यामुळे एप्रिल, मे महिन्यात वर्धा जिल्ह्यावर तीव्र पाणी संकटाची छाया पसरली आहे.पिण्याच्या पाण्याचाही प्रश्नचिकणीसह परिसरात यापूर्वी एप्रिल, मे महिन्यात विहिरींचे पाणी आटत असे. अल्प पर्जन्यमानामुळे यावर्षी मात्र फेब्रुवारीमध्येच विहिरी कोरड्या ठाक झाल्या आहेत. यामुळे पिकांना ओलित करणे अवघड झाले असतानाच पिण्याच्या पाण्याचासुद्धा प्रश्न निर्माण होणार आहे. प्यायलाच पाणी नाही, तर पिकांना ओलित करण्यासाठी पाणी आणायचे तरी कोठून असा प्रश्नपरिसरातील शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे.शेतात गहू, आणि हरभऱ्याची सप्टेंबर महिन्यातच लागवड केली होती. त्यामुळे ही पिके जोमात बहरले आणि बºयापैकी उत्पन्नही घेता आले.- विजय डायरे, शेतकरी, चिकणी (जा.).