शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

शेतकऱ्यांवर जलसंकट, भाजीपाला पीक करपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 22:07 IST

यावर्षी जिल्ह्यात अल्प प्रमाणात पाऊस झाला. यामुळे शेतातील विहिरींची पाणीपातळी पाहिजे त्या प्रमाणात वाढली नाही. याचाच परिणाम म्हणून फेब्रुवारीतच शेतातील विहिरींनी तळ गाठला असल्याचे चिकणीसह परिसरात दिसून येते. पाण्याअभावी भाजीपाला पीकही करपण्याच्या मार्गावर असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत.

ठळक मुद्देउन्हाळ्याची चाहूल लागताच विहिरींनी गाठला तळ

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : यावर्षी जिल्ह्यात अल्प प्रमाणात पाऊस झाला. यामुळे शेतातील विहिरींची पाणीपातळी पाहिजे त्या प्रमाणात वाढली नाही. याचाच परिणाम म्हणून फेब्रुवारीतच शेतातील विहिरींनी तळ गाठला असल्याचे चिकणीसह परिसरात दिसून येते. पाण्याअभावी भाजीपाला पीकही करपण्याच्या मार्गावर असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत.चिकणी येथील अल्पभूधारक शेतकरी विजय डायरे यांनी ओलिताखाली असलेल्या एक एकर शेतात विविध प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड केली होती. लागवडीकरिता त्यांनी मोठ्या प्रमाणावर खर्चही केला. यामध्ये त्यांनी वांगी, मिरची, कांदा, लसूण, मेथी आदी भाजीपाला पिकाची लागवड केली होती. परंतु, ऐन फेब्रुवारीतच विहिरीचे पाणी आटल्यामुळे पिकांना ओलिताची समस्या निर्माण आणि पीक करपले. यात डायरे यांचे मोठे नुकसान झाले आहे.पाणी... जपूनच!शहरासह लगतच्या ११ गावांतील नागरिकांना यंदा भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. ग्रामीण भागात नागरिक पाण्याची अनावश्यक नासाडी करीत आहे. रस्त्यावर सकाळी व सायंकाळी नळाद्वारे पाणी मारत आहे. तसेच घराशेजारी वाहने धुण्याचे काम केले जात आहे. अनेक जण पाणी चक्क नाल्यांमध्ये सोडून देतात. तेव्हा नागरिकांनी पाण्याचा जपूनच वापर करावा, असे आवाहन सामाजिक संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.पाणीपातळीत झपाट्याने घटयावर्षी जिल्ह्यात ७७ टक्केच पाऊस झाला आहे. त्यामुळे पाणीसंकट अतिशय तीव्र स्वरूपात राहणार आहे. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यातच अनेक भागात विहिरींची पातळी खोल गेली आहे. शेतातील मोठ्या विहिरींच्या पाणी पातळीतही घट झाली असून शहरात नळाद्वारे पाणीपुरवठा अनियमित होत असल्याने अनेक नागरिकांनी बोअरवेल तयार केल्या. मात्र, मागील एक ते दीड महिन्यापूर्वी तयार केलेल्या बोअरवेलचीही पातळी खोल गेली आहे. काही ठिंकाणी बोअरवेल कोरड्या पडल्या आहे. त्यामुळे एप्रिल, मे महिन्यात वर्धा जिल्ह्यावर तीव्र पाणी संकटाची छाया पसरली आहे.पिण्याच्या पाण्याचाही प्रश्नचिकणीसह परिसरात यापूर्वी एप्रिल, मे महिन्यात विहिरींचे पाणी आटत असे. अल्प पर्जन्यमानामुळे यावर्षी मात्र फेब्रुवारीमध्येच विहिरी कोरड्या ठाक झाल्या आहेत. यामुळे पिकांना ओलित करणे अवघड झाले असतानाच पिण्याच्या पाण्याचासुद्धा प्रश्न निर्माण होणार आहे. प्यायलाच पाणी नाही, तर पिकांना ओलित करण्यासाठी पाणी आणायचे तरी कोठून असा प्रश्नपरिसरातील शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे.शेतात गहू, आणि हरभऱ्याची सप्टेंबर महिन्यातच लागवड केली होती. त्यामुळे ही पिके जोमात बहरले आणि बºयापैकी उत्पन्नही घेता आले.- विजय डायरे, शेतकरी, चिकणी (जा.).