शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांवर जलसंकट, भाजीपाला पीक करपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 22:07 IST

यावर्षी जिल्ह्यात अल्प प्रमाणात पाऊस झाला. यामुळे शेतातील विहिरींची पाणीपातळी पाहिजे त्या प्रमाणात वाढली नाही. याचाच परिणाम म्हणून फेब्रुवारीतच शेतातील विहिरींनी तळ गाठला असल्याचे चिकणीसह परिसरात दिसून येते. पाण्याअभावी भाजीपाला पीकही करपण्याच्या मार्गावर असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत.

ठळक मुद्देउन्हाळ्याची चाहूल लागताच विहिरींनी गाठला तळ

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : यावर्षी जिल्ह्यात अल्प प्रमाणात पाऊस झाला. यामुळे शेतातील विहिरींची पाणीपातळी पाहिजे त्या प्रमाणात वाढली नाही. याचाच परिणाम म्हणून फेब्रुवारीतच शेतातील विहिरींनी तळ गाठला असल्याचे चिकणीसह परिसरात दिसून येते. पाण्याअभावी भाजीपाला पीकही करपण्याच्या मार्गावर असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत.चिकणी येथील अल्पभूधारक शेतकरी विजय डायरे यांनी ओलिताखाली असलेल्या एक एकर शेतात विविध प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड केली होती. लागवडीकरिता त्यांनी मोठ्या प्रमाणावर खर्चही केला. यामध्ये त्यांनी वांगी, मिरची, कांदा, लसूण, मेथी आदी भाजीपाला पिकाची लागवड केली होती. परंतु, ऐन फेब्रुवारीतच विहिरीचे पाणी आटल्यामुळे पिकांना ओलिताची समस्या निर्माण आणि पीक करपले. यात डायरे यांचे मोठे नुकसान झाले आहे.पाणी... जपूनच!शहरासह लगतच्या ११ गावांतील नागरिकांना यंदा भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. ग्रामीण भागात नागरिक पाण्याची अनावश्यक नासाडी करीत आहे. रस्त्यावर सकाळी व सायंकाळी नळाद्वारे पाणी मारत आहे. तसेच घराशेजारी वाहने धुण्याचे काम केले जात आहे. अनेक जण पाणी चक्क नाल्यांमध्ये सोडून देतात. तेव्हा नागरिकांनी पाण्याचा जपूनच वापर करावा, असे आवाहन सामाजिक संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.पाणीपातळीत झपाट्याने घटयावर्षी जिल्ह्यात ७७ टक्केच पाऊस झाला आहे. त्यामुळे पाणीसंकट अतिशय तीव्र स्वरूपात राहणार आहे. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यातच अनेक भागात विहिरींची पातळी खोल गेली आहे. शेतातील मोठ्या विहिरींच्या पाणी पातळीतही घट झाली असून शहरात नळाद्वारे पाणीपुरवठा अनियमित होत असल्याने अनेक नागरिकांनी बोअरवेल तयार केल्या. मात्र, मागील एक ते दीड महिन्यापूर्वी तयार केलेल्या बोअरवेलचीही पातळी खोल गेली आहे. काही ठिंकाणी बोअरवेल कोरड्या पडल्या आहे. त्यामुळे एप्रिल, मे महिन्यात वर्धा जिल्ह्यावर तीव्र पाणी संकटाची छाया पसरली आहे.पिण्याच्या पाण्याचाही प्रश्नचिकणीसह परिसरात यापूर्वी एप्रिल, मे महिन्यात विहिरींचे पाणी आटत असे. अल्प पर्जन्यमानामुळे यावर्षी मात्र फेब्रुवारीमध्येच विहिरी कोरड्या ठाक झाल्या आहेत. यामुळे पिकांना ओलित करणे अवघड झाले असतानाच पिण्याच्या पाण्याचासुद्धा प्रश्न निर्माण होणार आहे. प्यायलाच पाणी नाही, तर पिकांना ओलित करण्यासाठी पाणी आणायचे तरी कोठून असा प्रश्नपरिसरातील शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे.शेतात गहू, आणि हरभऱ्याची सप्टेंबर महिन्यातच लागवड केली होती. त्यामुळे ही पिके जोमात बहरले आणि बºयापैकी उत्पन्नही घेता आले.- विजय डायरे, शेतकरी, चिकणी (जा.).