शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

मुख्य रस्त्याला पाण्याचे ग्रहण

By admin | Updated: July 29, 2016 02:10 IST

शहरालगतच्या हनुमान टेकडी परिसरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे जलशुद्धीकरण केंद्र आहे. या केंद्रातून निघालेले अशुद्ध पाणी...

संबंधित विभागाचे दुर्लक्ष : प्राधिकरणच्या पाण्यामुळे रस्त्यावर चिखल वर्धा : शहरालगतच्या हनुमान टेकडी परिसरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे जलशुद्धीकरण केंद्र आहे. या केंद्रातून निघालेले अशुद्ध पाणी सतत मुख्य रस्त्यावरून वाहते. परिणामी, नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. गांधी सिटी पब्लिक स्कूल समोर तर चिखलाचे साम्राज्यच निर्माण झाले आहे. तीनही ऋतूमध्ये वाहणारे हे पाणी नागरिकांकरिता डोकेदुखी ठरत आहे. प्राधिकरणने यावर उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिक तसेच गांधी सिटी पब्लिक स्कूलकडून करण्यात येत आहे. हनुमान टेकडीवर असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रातून सायंकाळच्या सुमारास दररोज अशुद्ध पाणी बाहेर फेकले जाते. हे पाणी टेकडीवरून खाली उतरून मुख्य रस्त्याच्या बाजूने वाहत असल्याने परिसर चिखलमय होतो. परिणामी, नागरिकांना तसेच चिमुकल्यांना त्रास सहन करावा लागतो. गांधी सिटी पब्लिक स्कूलसमोरच चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याच परिसरातून विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करावी लागते. वर्षभर वाहणाऱ्या पाण्यामुळे काही ठिकाणी दलदल निर्माण झाली आहे. यात वाहने रूतत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. पाणी आणि चिखलामुळे व्यावसायिकही त्रस्त झाले आहेत. याबाबत पिपरी (मेघे) ग्रामपंचायत तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे तक्रारी करण्यात आल्या; पण अद्याप कार्यवाही झाली नाही. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.(कार्यालय प्रतिनिधी)