शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
5
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
6
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
7
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
8
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
9
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
10
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
11
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
12
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
13
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
14
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
15
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
16
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
17
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
18
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
19
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
20
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?

सदोष बांधकामामुळे पाण्याची वानवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 23:08 IST

निम्न वर्धा प्रकल्पाच्या कालव्याचे नियोजनानुसार बांधकाम झाले नसल्यामुळे शेतकऱ्यांना पाणीपुरवठा होत नाही. परिणामी मोझरी (शेकापूर) परिसरातील शेतकऱ्यांना पाण्याची प्रतीक्षा कायम आहे. त्यामुळे याची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. शेतकऱ्यांना सिंचन करता यावे व चांगले उत्पादन घेता यावे म्हणून प्रशासनाने वर्षात दोनवेळा पाणी पुरवठा करण्याचे जाहीर केले होते.

ठळक मुद्देमोझरीच्या शेतकऱ्यांना प्रतीक्षा : जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : निम्न वर्धा प्रकल्पाच्या कालव्याचे नियोजनानुसार बांधकाम झाले नसल्यामुळे शेतकऱ्यांना पाणीपुरवठा होत नाही. परिणामी मोझरी (शेकापूर) परिसरातील शेतकऱ्यांना पाण्याची प्रतीक्षा कायम आहे. त्यामुळे याची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.शेतकऱ्यांना सिंचन करता यावे व चांगले उत्पादन घेता यावे म्हणून प्रशासनाने वर्षात दोनवेळा पाणी पुरवठा करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार पहिले पाणी सतत २२ दिवस सोडण्यात आले. परंतु यातील एकही दिवस पाणी मोझरी (शेकापूर) या गावातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचले नाही. कालव्याला पाणी सोडल्याच्या दिवसापासून साठ तासात पाणी मोझरी या गावापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या वरुड, खानगांव या गावात पोहचले. तसेच सर्वच दिवस आवश्यकतेपेक्षाही जास्त पाणी पुरवठा या गावांमध्ये झाला. पण, मोझरीपर्यंत पाणी का येत नाही, या पाठपुरावा शेतकºयांनी केला असता खानगाव ते कापशी दरम्यान कालव्याचा पुर्ण उतार काढला नाही तसेच कालाव्याची रुंदी व लांबी याचा ताळमेळ जुळलेला नसल्याचे आढळून आले. म्हणूनच हा कालवा पूर्ण झाल्यापासून तर आजच्या दिवसापर्यंत पाण्याचा एकही थेंब मोझरीवासीयांच्या नशीबी आला नाही. त्यामुळे या कालाव्याच्या बांधकामाची चौकशी करुन मोझरीतील शेतकऱ्यांना नियमित पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवदेन देताना संदिप वरखडे, प्रवीण वनकर, खेमचंद चिमणे, संदेश उमरे, परशांता मुंजेवार, गजानन काकडे व सुरेश पारिसे उपस्थित होते. या निवेदनावर गावातील ५८ जणांच्या स्वाक्षरी आहेत. या निवेदनाच्या प्रतिलीपी खासदार रामदास तडस, आमदार पंकज भोयर, निम्न वर्धा कार्यालय, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, वर्धा पंचायत समितीचे बांधकाम सभापती यांनाही देण्यात आले आहे. आता प्रशासन यावर काय कारवाई करते याकडे लक्ष लागले आहे.अधिकाऱ्यांकडून होतेय टाळाटाळनिम्न वर्धा प्रकल्पातून पाणी सोडल्यानंतर कालव्याने ते मोझरी (शेकापूर) गावापर्यंत पोहचत नाही. सोडलेले पाणी मोझरीपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या गावांमध्ये भरपूर प्रमाणात उलब्ध होते. यासदर्भात संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता धरणात पाणी उपलब्ध नसल्याने पाणी पुरवठा होऊ शकत नाही, अशी उत्तरे दिली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. जर धरणात पाणी नाही तर बाकी गावांना पाणीपुरवठा कुठून होतो, असा प्रश्न उपस्थित झाल्याने शेतकºयांनी पाणी न येण्यामागचे कारण शोधून काढले. तेव्हा कालव्याचे बांधकामच सदोष असल्याचे आढळून आले.