शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सदोष बांधकामामुळे पाण्याची वानवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 23:08 IST

निम्न वर्धा प्रकल्पाच्या कालव्याचे नियोजनानुसार बांधकाम झाले नसल्यामुळे शेतकऱ्यांना पाणीपुरवठा होत नाही. परिणामी मोझरी (शेकापूर) परिसरातील शेतकऱ्यांना पाण्याची प्रतीक्षा कायम आहे. त्यामुळे याची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. शेतकऱ्यांना सिंचन करता यावे व चांगले उत्पादन घेता यावे म्हणून प्रशासनाने वर्षात दोनवेळा पाणी पुरवठा करण्याचे जाहीर केले होते.

ठळक मुद्देमोझरीच्या शेतकऱ्यांना प्रतीक्षा : जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : निम्न वर्धा प्रकल्पाच्या कालव्याचे नियोजनानुसार बांधकाम झाले नसल्यामुळे शेतकऱ्यांना पाणीपुरवठा होत नाही. परिणामी मोझरी (शेकापूर) परिसरातील शेतकऱ्यांना पाण्याची प्रतीक्षा कायम आहे. त्यामुळे याची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.शेतकऱ्यांना सिंचन करता यावे व चांगले उत्पादन घेता यावे म्हणून प्रशासनाने वर्षात दोनवेळा पाणी पुरवठा करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार पहिले पाणी सतत २२ दिवस सोडण्यात आले. परंतु यातील एकही दिवस पाणी मोझरी (शेकापूर) या गावातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचले नाही. कालव्याला पाणी सोडल्याच्या दिवसापासून साठ तासात पाणी मोझरी या गावापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या वरुड, खानगांव या गावात पोहचले. तसेच सर्वच दिवस आवश्यकतेपेक्षाही जास्त पाणी पुरवठा या गावांमध्ये झाला. पण, मोझरीपर्यंत पाणी का येत नाही, या पाठपुरावा शेतकºयांनी केला असता खानगाव ते कापशी दरम्यान कालव्याचा पुर्ण उतार काढला नाही तसेच कालाव्याची रुंदी व लांबी याचा ताळमेळ जुळलेला नसल्याचे आढळून आले. म्हणूनच हा कालवा पूर्ण झाल्यापासून तर आजच्या दिवसापर्यंत पाण्याचा एकही थेंब मोझरीवासीयांच्या नशीबी आला नाही. त्यामुळे या कालाव्याच्या बांधकामाची चौकशी करुन मोझरीतील शेतकऱ्यांना नियमित पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवदेन देताना संदिप वरखडे, प्रवीण वनकर, खेमचंद चिमणे, संदेश उमरे, परशांता मुंजेवार, गजानन काकडे व सुरेश पारिसे उपस्थित होते. या निवेदनावर गावातील ५८ जणांच्या स्वाक्षरी आहेत. या निवेदनाच्या प्रतिलीपी खासदार रामदास तडस, आमदार पंकज भोयर, निम्न वर्धा कार्यालय, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, वर्धा पंचायत समितीचे बांधकाम सभापती यांनाही देण्यात आले आहे. आता प्रशासन यावर काय कारवाई करते याकडे लक्ष लागले आहे.अधिकाऱ्यांकडून होतेय टाळाटाळनिम्न वर्धा प्रकल्पातून पाणी सोडल्यानंतर कालव्याने ते मोझरी (शेकापूर) गावापर्यंत पोहचत नाही. सोडलेले पाणी मोझरीपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या गावांमध्ये भरपूर प्रमाणात उलब्ध होते. यासदर्भात संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता धरणात पाणी उपलब्ध नसल्याने पाणी पुरवठा होऊ शकत नाही, अशी उत्तरे दिली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. जर धरणात पाणी नाही तर बाकी गावांना पाणीपुरवठा कुठून होतो, असा प्रश्न उपस्थित झाल्याने शेतकºयांनी पाणी न येण्यामागचे कारण शोधून काढले. तेव्हा कालव्याचे बांधकामच सदोष असल्याचे आढळून आले.