शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
2
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
5
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
6
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
7
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
8
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
9
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
10
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
11
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
12
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
13
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
14
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
15
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
16
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
17
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
18
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
19
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
20
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहिनी फोडली पालिकेचे लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 22:00 IST

दिलीप बिल्डकॉन प्रशासनाने खोदकामादरम्यान वर्धा नदीवरून देवळीला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनीच फोडली. त्यामुळे याचा पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला. जलवाहिनी फुटल्याने पालिका प्रशासनाचे लाखोंचे नुकसान झाले असून माहिती मिळताच खा. रामदास तडस यांनी घटनास्थळ गाठले. दुष्काळी स्थितीत पाण्याचा अपव्यय झाल्याची परिस्थिती पाहून खा. तडस संतापले. त्यांनी दिलीप बिल्डकॉन कंपनी प्रशासनातील अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली.

ठळक मुद्देपोलिसात तक्रार : खासदारांकडून कंपनी अधिकाऱ्यांना कानपिचक्या

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : दिलीप बिल्डकॉन प्रशासनाने खोदकामादरम्यान वर्धा नदीवरून देवळीला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनीच फोडली. त्यामुळे याचा पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला. जलवाहिनी फुटल्याने पालिका प्रशासनाचे लाखोंचे नुकसान झाले असून माहिती मिळताच खा. रामदास तडस यांनी घटनास्थळ गाठले. दुष्काळी स्थितीत पाण्याचा अपव्यय झाल्याची परिस्थिती पाहून खा. तडस संतापले. त्यांनी दिलीप बिल्डकॉन कंपनी प्रशासनातील अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली.जलवाहिनी फुटल्याने देवळीचा पाणी पुरवठा दहा दिवसांसाठी प्रभावीत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सदर घटनेची माहिती मिळताच खा. रामदास तडस घटनास्थळ गाठून पाहणी केली. परिस्थिती एकदम विदारक असल्याचे लक्षात येताच घटनास्थळी असलेल्या जेसीबीची चाबीच त्यांनी घेऊन घेतली. शिवाय सुरू असलेले काम बंद पाडून घटनेची माहिती फोनवरून देवळीच्या ठाणेदारांसह पोलीस अधीक्षकांना दिली. तसेच गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर त्यांनी दिलीप बिल्डकॉनचे विभागीय मॅनेजर गिरीष तलवार यांच्यांशी मोबाईलवर संपर्क साधून रोष व्यक्त केला. दरम्यान न.प. मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी देवळी पोलीसात तक्रार दिली आहे. त्यातून गैरअर्जदारावर फौजदारी कारवाईची मागणी केली आहे.दहा दिवस मिळणार नाही पाणीअंदोरी येथील वर्धा नदीवरून देवळी शहराला पाणी पुरवठा करण्याची योजना गेल्या ५० वर्षांपासून कार्यान्वित आहे; पण कालांतराने ही योजना तांत्रिक दृष्ट्या नादुरूस्त ठरल्याने नव्याने ३५ कोटींच्या निधीतून अद्यावत अशी पाणी पुरवठ्याची योजना उभी राहिली. मात्र, दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या कामगारांकडून काम करताना ही जलवाहिनी फोडली. रविवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास देवळीच्या यशोदा नदीजवळील मुख्य जलवाहिनी फोडण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय झाला आहे. परिणामी, पुढील ८ ते १० दिवसांपर्यत देवळीचा पाणी पुरवठा बंद राहण्याची स्थिती निर्माण झाली आहे.