शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
4
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
5
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
6
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
7
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
8
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
9
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
10
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
11
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
12
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
13
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
14
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
15
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
16
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
17
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
18
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
19
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
20
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!

जलवाहिनी फोडली पालिकेचे लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 22:00 IST

दिलीप बिल्डकॉन प्रशासनाने खोदकामादरम्यान वर्धा नदीवरून देवळीला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनीच फोडली. त्यामुळे याचा पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला. जलवाहिनी फुटल्याने पालिका प्रशासनाचे लाखोंचे नुकसान झाले असून माहिती मिळताच खा. रामदास तडस यांनी घटनास्थळ गाठले. दुष्काळी स्थितीत पाण्याचा अपव्यय झाल्याची परिस्थिती पाहून खा. तडस संतापले. त्यांनी दिलीप बिल्डकॉन कंपनी प्रशासनातील अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली.

ठळक मुद्देपोलिसात तक्रार : खासदारांकडून कंपनी अधिकाऱ्यांना कानपिचक्या

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : दिलीप बिल्डकॉन प्रशासनाने खोदकामादरम्यान वर्धा नदीवरून देवळीला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनीच फोडली. त्यामुळे याचा पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला. जलवाहिनी फुटल्याने पालिका प्रशासनाचे लाखोंचे नुकसान झाले असून माहिती मिळताच खा. रामदास तडस यांनी घटनास्थळ गाठले. दुष्काळी स्थितीत पाण्याचा अपव्यय झाल्याची परिस्थिती पाहून खा. तडस संतापले. त्यांनी दिलीप बिल्डकॉन कंपनी प्रशासनातील अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली.जलवाहिनी फुटल्याने देवळीचा पाणी पुरवठा दहा दिवसांसाठी प्रभावीत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सदर घटनेची माहिती मिळताच खा. रामदास तडस घटनास्थळ गाठून पाहणी केली. परिस्थिती एकदम विदारक असल्याचे लक्षात येताच घटनास्थळी असलेल्या जेसीबीची चाबीच त्यांनी घेऊन घेतली. शिवाय सुरू असलेले काम बंद पाडून घटनेची माहिती फोनवरून देवळीच्या ठाणेदारांसह पोलीस अधीक्षकांना दिली. तसेच गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर त्यांनी दिलीप बिल्डकॉनचे विभागीय मॅनेजर गिरीष तलवार यांच्यांशी मोबाईलवर संपर्क साधून रोष व्यक्त केला. दरम्यान न.प. मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी देवळी पोलीसात तक्रार दिली आहे. त्यातून गैरअर्जदारावर फौजदारी कारवाईची मागणी केली आहे.दहा दिवस मिळणार नाही पाणीअंदोरी येथील वर्धा नदीवरून देवळी शहराला पाणी पुरवठा करण्याची योजना गेल्या ५० वर्षांपासून कार्यान्वित आहे; पण कालांतराने ही योजना तांत्रिक दृष्ट्या नादुरूस्त ठरल्याने नव्याने ३५ कोटींच्या निधीतून अद्यावत अशी पाणी पुरवठ्याची योजना उभी राहिली. मात्र, दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या कामगारांकडून काम करताना ही जलवाहिनी फोडली. रविवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास देवळीच्या यशोदा नदीजवळील मुख्य जलवाहिनी फोडण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय झाला आहे. परिणामी, पुढील ८ ते १० दिवसांपर्यत देवळीचा पाणी पुरवठा बंद राहण्याची स्थिती निर्माण झाली आहे.