शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
3
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
4
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
5
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
6
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
7
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
8
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
9
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
10
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
11
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
13
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
14
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
15
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
16
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
17
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
18
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
19
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
20
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!

वॉटर कप स्पर्धेचा श्रीगणेशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 21:59 IST

दिवसाच्या पहिल्या ठोक्यालाच सेलू तालुक्यातील दिंदोडा आणि हिवरा ग्रामवासीयांनी पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेकरिता संपूर्ण गावाने एकत्र येत मोठ्या उत्साहाने जलदेवतेची पूजा तसेच श्रमदान करून सुरुवात केली.

ठळक मुद्देदिंदोडा व हिवरा गावातून सुरुवात : बाराचा ठोका पडताच श्रमदानासाठी एकवटले गावकरी

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : ८ एप्रिल, दिवसाच्या पहिल्या ठोक्यालाच सेलू तालुक्यातील दिंदोडा आणि हिवरा ग्रामवासीयांनी पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेकरिता संपूर्ण गावाने एकत्र येत मोठ्या उत्साहाने जलदेवतेची पूजा तसेच श्रमदान करून सुरुवात केली.रात्रीचे १२ म्हणजे गावामध्ये शुकशुकाट असतो; परंतु ८ एप्रिलची रात्र म्हणजे गावामध्ये जल्लोष बघायला मिळाला. गावामधील प्रत्येक नागरिक आपापल्या घरातील कुदळ, फावडे घेऊन गाव पाणीदार करण्याचा दृढ निश्चय करून तेथे उभा असल्याचा प्रत्यय त्यावेळी आला. या ग्रामस्थांना साथ देण्यासाठी शहरातूनही मंडळी मोठ्या संख्येने आली होती.त्यामध्ये प्रामुख्याने सेवाग्राम रुग्णालयातील डॉ. उल्हास जाजू, वैद्यकीय जनजागृती मंचाचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे, डॉ. प्रदीप सुने, डॉ. राजेश सरोदे, डॉ. अमोल ठाकरे, डॉ. प्रशांत वाडीभस्मे, प्रा. श्याम भेंडे, सचिन गरपाल, अनंत बोबडे, लोहे आदी उपस्थित होते.दिंदोडा गावामध्ये जलदेवतेची तसेच यंत्र सामग्रीची पूजा करण्यात आली आणि ‘जल है तो कल है’ यांसारखे जलजागृतीचे नारे देत श्रमदानाला सुरुवात करण्यात आली. तसेच हिवरा या गावामध्ये संपूर्ण गावातील लोकांनी एकत्र येऊन यंत्रसामग्रीची पूजा गावातील महिला आणि चिमुकल्यांकडून प्राधान्याने करून घेऊन नंतर दुष्काळरूपी राक्षसाच्या पुतळ्याचे गावातील चौकात दहन करण्यात आले. यावर्षी आपले गाव दुष्काळमुक्त करण्याची शपथ यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी घेतली.तसेच संपूर्ण गावाने गावानजीकच्या शेतात कंटोर टाकून श्रमदान केले. उपस्थित लोकांना डॉ. उल्हास जाजू तसेच वैद्यकीय जनजागृती मंचचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे यांनी प्रोत्साहन तसेच मार्गदर्शन केले. यावेळी पाणी फाऊंडेशन समन्वयक चंद्रशेखर तसेच गावातील प्रशिक्षित तरुणांनी विशेष श्रम घेतले.मागीलवर्षी पाणी फाउंडेशनअंतर्गत आर्वी तालुक्यातील दोन गावांना पुरस्कार मिळाला. आपल्याही गावाला पुरस्कार मिळावा, पाणी समस्या कायमचे निकाली निघावी, गाव पाणीदार व्हावे याकरिता ग्रामस्थांनी कंबर कसली आहे. यात युवकांसह महिला आणि पुरुषांचाही सहभाग असून त्यांनी पुरस्कार मिळविण्याचा निर्धार केला आहे.