शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

अर्धवट पुलाच्या बांधकामात शिरले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 21:53 IST

वर्धा ते राळेगाव मार्गावरील कानगावपासून ३ कि.मी अंतरावरील नाल्याच्या पुलाचे बांधकाम सुरु आहे. हे बांधकाम सदोष असल्याने चौकशी करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य धनराज तेलंग यांनी केली होती. परंतु संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्याने पहिल्याच पावसाचे पाणी या बांधकामात शिरले असून लगतचा वळण रस्ताही वाहून गेल्याने वाहतूक ठप्प झाली होती.

ठळक मुद्देवर्धा-राळेगाव मार्गावरील वाहतूक ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्कमोझरी (शेकापूर) : वर्धा ते राळेगाव मार्गावरील कानगावपासून ३ कि.मी अंतरावरील नाल्याच्या पुलाचे बांधकाम सुरु आहे. हे बांधकाम सदोष असल्याने चौकशी करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य धनराज तेलंग यांनी केली होती. परंतु संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्याने पहिल्याच पावसाचे पाणी या बांधकामात शिरले असून लगतचा वळण रस्ताही वाहून गेल्याने वाहतूक ठप्प झाली होती.वर्धा ते राळेगाव मार्गावरील पुलाच्या बांधकामात मातीमिश्रीत वाळूचा वापर होत असून या सदोष बांधकामाची चौकशी करुन कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी होत असतानाही दुर्लक्षकरण्यात आले. परिणामी गुरुवारी झालेल्या पावसामुळे पुलानजिक असलेला वळणरस्ता वाहत गेला तसेच पुलाच्या अर्धवट बांधकामात पुर्ण पाणी साचले. वाहन चालकांनी तात्पुरता मार्ग काढत रस्ता धरला परंतु खोलगट भाग असल्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी असल्याने मालवाहू वाहन फसल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे वाहनचालकांनी मोझरी, डौलापूर या मार्गाने वाहतूक वळविली होती. पहाटेपासून तर सकाळी ११ वाजतापर्यंत ही वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशांना चागलाच त्रास सहन करावा लागला.