शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

५१ गावांत जलयुक्त शिवार अभियान

By admin | Updated: June 7, 2015 02:22 IST

भूजल पातळी उंचावणे, जमिनीचा पोत सुधारणे, सिंचन क्षमता वाढविणे, जमिनीची लेव्हल समतल करणे या उद्देशाने शासनाने महाराष्ट्रात जलयुक्त शिवार अभियान सुरू केले.

६५ टक्के कामे पूर्ण : ९० कोटींच्या निधीतून केली जाताहेत कामेकारंजा (घा.) : भूजल पातळी उंचावणे, जमिनीचा पोत सुधारणे, सिंचन क्षमता वाढविणे, जमिनीची लेव्हल समतल करणे या उद्देशाने शासनाने महाराष्ट्रात जलयुक्त शिवार अभियान सुरू केले. यात तालुक्यातील ५१ गावांची निवड करण्यात आली आहे. कामांना प्रारंभ करण्यात आला असून यासाठी ९० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.अभियानातील प्रस्तावित कामे कृषी विभाग, लघुसिंचन जि.प., राज्य लघुसिंचन, वनविभाग, सामाजिक वनीकरण, ग्रामीण पाणी पुरवठा, पंचायत समिती व सामाजिक संस्था या सात यंत्रणेमार्फत नि:शुल्क केली जाणार आहे. निवड झालेल्या ५१ पैकी ४१ गावांत तालुका कृषी विभागातर्फे नाला खोलीकरण, धाडीचे बांध, सिमेंट बंधारे, गॅबीयन बंधारे आदी कामे फेबु्रवारी महिन्यापासून सुरू करण्यात आली आहे. यात ३३ शेततळे असून २७ कामे पूर्ण झालीत. ६ शेततळ्यांची कामे सुरू आहेत. १०४ धाडीच्या बांधापैकी ८७ बांध पूर्ण झाले असून १७ बांध अपूर्ण आहेत. २३ सिमेंट बंधाऱ्यांचे बांधकाम सुरू असून एकही बंधारा पूर्ण झाला नाही. नाला खोलीकरणाची ९६ कामे सुरू असून ६६ पूर्ण झाली तर ३० अपूर्ण आहे. पाच गॅबीयन बंधाऱ्यांपैकी चार पूर्ण झाले असून एकाचे काम सुरू आहे. ५१ गावांत सुक्ष्म सिंचनाची २१० कामे पूर्ण झाली आहेत.२० जूनपर्यंत सर्व कामे पूर्ण व्हावीत, असे शासनाचे धोरण आहे; पण यंत्राची उपलब्धता, शेतकऱ्यांच्या अडचणी व कमी अवधीतील अधिक कामांमुळे ३० जूनपर्यंत कामे पूर्ण होतील, अशी माहिती जलशिवार अभियानाचे सदस्य सचिव तथा तालुका कृषी अधिकारी व्ही.बी. महंत यांनी दिली. अन्य सहा यंत्रणेमार्फत कोणती कामे सुरू आहे व कामांची सद्यस्थिती काय, याची माहिती तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे अद्याप पोहोचली नसल्याने अप्राप्त आहे. एकंदरीत ६५ टक्के कामे झाली असून ३५ टक्के कामे व्हायची आहेत. येत्या १५ दिवसांत पाऊस आला तर ही कामे कशी पूर्ण होतील, हा प्रश्नच आहेू. एकदा शेतकऱ्यांचा पेरणी हंगाम सुरू झाला की, आपोआपच या कामांना अडथळा निर्माण होईल. यामुळे शासनाची योजना उदीष्टाप्रत पोहचणार की नाही, अशी शंका उपस्थित होत आहे.(तालुका प्रतिनिधी)