शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

५१ गावांत जलयुक्त शिवार अभियान

By admin | Updated: June 7, 2015 02:22 IST

भूजल पातळी उंचावणे, जमिनीचा पोत सुधारणे, सिंचन क्षमता वाढविणे, जमिनीची लेव्हल समतल करणे या उद्देशाने शासनाने महाराष्ट्रात जलयुक्त शिवार अभियान सुरू केले.

६५ टक्के कामे पूर्ण : ९० कोटींच्या निधीतून केली जाताहेत कामेकारंजा (घा.) : भूजल पातळी उंचावणे, जमिनीचा पोत सुधारणे, सिंचन क्षमता वाढविणे, जमिनीची लेव्हल समतल करणे या उद्देशाने शासनाने महाराष्ट्रात जलयुक्त शिवार अभियान सुरू केले. यात तालुक्यातील ५१ गावांची निवड करण्यात आली आहे. कामांना प्रारंभ करण्यात आला असून यासाठी ९० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.अभियानातील प्रस्तावित कामे कृषी विभाग, लघुसिंचन जि.प., राज्य लघुसिंचन, वनविभाग, सामाजिक वनीकरण, ग्रामीण पाणी पुरवठा, पंचायत समिती व सामाजिक संस्था या सात यंत्रणेमार्फत नि:शुल्क केली जाणार आहे. निवड झालेल्या ५१ पैकी ४१ गावांत तालुका कृषी विभागातर्फे नाला खोलीकरण, धाडीचे बांध, सिमेंट बंधारे, गॅबीयन बंधारे आदी कामे फेबु्रवारी महिन्यापासून सुरू करण्यात आली आहे. यात ३३ शेततळे असून २७ कामे पूर्ण झालीत. ६ शेततळ्यांची कामे सुरू आहेत. १०४ धाडीच्या बांधापैकी ८७ बांध पूर्ण झाले असून १७ बांध अपूर्ण आहेत. २३ सिमेंट बंधाऱ्यांचे बांधकाम सुरू असून एकही बंधारा पूर्ण झाला नाही. नाला खोलीकरणाची ९६ कामे सुरू असून ६६ पूर्ण झाली तर ३० अपूर्ण आहे. पाच गॅबीयन बंधाऱ्यांपैकी चार पूर्ण झाले असून एकाचे काम सुरू आहे. ५१ गावांत सुक्ष्म सिंचनाची २१० कामे पूर्ण झाली आहेत.२० जूनपर्यंत सर्व कामे पूर्ण व्हावीत, असे शासनाचे धोरण आहे; पण यंत्राची उपलब्धता, शेतकऱ्यांच्या अडचणी व कमी अवधीतील अधिक कामांमुळे ३० जूनपर्यंत कामे पूर्ण होतील, अशी माहिती जलशिवार अभियानाचे सदस्य सचिव तथा तालुका कृषी अधिकारी व्ही.बी. महंत यांनी दिली. अन्य सहा यंत्रणेमार्फत कोणती कामे सुरू आहे व कामांची सद्यस्थिती काय, याची माहिती तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे अद्याप पोहोचली नसल्याने अप्राप्त आहे. एकंदरीत ६५ टक्के कामे झाली असून ३५ टक्के कामे व्हायची आहेत. येत्या १५ दिवसांत पाऊस आला तर ही कामे कशी पूर्ण होतील, हा प्रश्नच आहेू. एकदा शेतकऱ्यांचा पेरणी हंगाम सुरू झाला की, आपोआपच या कामांना अडथळा निर्माण होईल. यामुळे शासनाची योजना उदीष्टाप्रत पोहचणार की नाही, अशी शंका उपस्थित होत आहे.(तालुका प्रतिनिधी)