शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याने सर्वांच्याच डोळ्यात आणले ‘पाणी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 23:53 IST

जिल्ह्यात यंदा जलसंकट तीव्र झाले आहे. यामुळे सर्वत्र नागरिकांची पाण्यासाठी दाहीदिशा पाहायला मिळत आहे. पाण्याणे यंदा नागरिकांच्या डोळ्यात अक्षरश: पाणी आणले आहे. पाणीसंकट आणि उष्णतामानामुळे वैतागलेल्या नागरिकांना आता धो-धो पावसाची प्रतीक्षा आहे.

ठळक मुद्देधो-धो पावसाची प्रतीक्षा : प्रखर उष्णतामान अद्याप कायम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात यंदा जलसंकट तीव्र झाले आहे. यामुळे सर्वत्र नागरिकांची पाण्यासाठी दाहीदिशा पाहायला मिळत आहे. पाण्याणे यंदा नागरिकांच्या डोळ्यात अक्षरश: पाणी आणले आहे. पाणीसंकट आणि उष्णतामानामुळे वैतागलेल्या नागरिकांना आता धो-धो पावसाची प्रतीक्षा आहे.गतवर्षी जिल्ह्याचे अत्यल्प पाऊस झाला. यामुळे जलाशयांमध्ये पुरेसा पाणीसाठा होऊ शकला. शहराला पाणीुरवठा करणाऱ्या धाम व महाकाळी धारणात अल्पसा जलसाठा आहे. तर शहरालगतच्या ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाºया येळाकेळी येथील नदीपात्रानेही तळ गाठला आहे. परिणामी, सद्यस्थितीत शहर आणि ग्रामीण भागाला सहा ते सात दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यात शेतशिवारात उन्हाळवाहीची कामे अंतिम टप्प्यात आहेत.मृग नक्षत्राला सुरुवात होऊन चार दिवस झाले आहेत. मृग नक्षत्रापूर्वी आलेल्या वादळी पावसाने ज्ञनेक ग्रामीण भागांना तडाखा दिला. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली. वीज पडल्याने जनावरे मृत्युमुखी पडली. आता तीन दिवसांपासून प्रखर उष्णतामान असून उकाडा कायम आहे. सर्वत्र भीषण पाणीटंचाई असल्याने शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिक अक्षरश: वैतागले आहेत. शहरात आणि ग्रामीण भागात पाण्याचे खासगी टँकर सुरू आहेत.मात्र, किती दिवस पाणी विकत घ्यायचे, हा प्रश्न नागरिकांंना भेङसावत आहे. जलाशयांमध्ये २० जूनपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. दुसरीकडे पावसाचा मागील तीन ते चार दिवसांपासून पत्ता नाही. त्यामुळे सर्वच जण चातकाप्रमाणे पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. दररोज सायंकाळी आकाशात मेघ दाटून येत असले तरी पाऊस मात्र येत नाही. त्यामुळे पाणीसमस्या आणखी तीव्र होण्याचे संकेत आहेत. यामुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. दिवसेंदिवस उकाडाही असह्य होऊ लागला आहे. त्यामुळे जो-तो पावसाची चातकाप्रमाणे प्रतीक्षा करीत असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई