शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

सेलू शहराला बोरधरणातून पाणी

By admin | Updated: May 7, 2016 02:14 IST

सध्या सेलू शहराला मौजा बेलगाव येथील नळयोजनेच्या दोन विहिरीवरून पाणी पुरवठा सुरू आहे.

क्षारयुक्त पाण्यामुळे नवी योजना : जलशुद्धीकरण केंद्रही प्रस्तावित सेलू : सध्या सेलू शहराला मौजा बेलगाव येथील नळयोजनेच्या दोन विहिरीवरून पाणी पुरवठा सुरू आहे. या पाण्यात क्षाराचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे. भविष्यात विविध आजाराची भीती आहे. तसेच शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेवून सध्या कार्यान्वित पाणीस्त्रोत अपुरे पडण्याची भीती आहे. या सर्व बाबीचा विचार करून शासनाने सेलू शहरासाठी थेट बोरधरण वरून पाईपलाईनद्वारे पाणी आणण्याच्या कामाला हिरवी झेंडी दिली आहे. शुक्रवारी बोरधरण ते सेलू या अंतराचे मोजमाप करण्यात आले. बोरधरणाशेजारी विहिर खोदून तेथून हे पाणी पाईपलाईनद्वारे सेलू शहरात येईल. शहरात जलशुद्धीकरण यंत्र बसविण्यात येईल. सध्या विहिरीवरून थेट पाण्याच्या टाक्या भरल्या जातात. शुद्धीकरण यंत्राची सोय नसल्याने तसेच पाणी पिण्यात जाते. सेलू शहरात पुरविण्यात येणाऱ्या पाण्यात क्षाराचे प्रमाण अधिक आहे. हे जास्त क्षाराचे प्रमाण आरोग्यासाठी धोकादायक आहे.सध्या सेलू शहराला ६०० ते ७०० पेक्षा जास्त टी.डी.एस. चे पाणी पुरविल्या जाते. (टीडीएस- टोटल डिझॉल्ट साल्ट) हे पाणी ज्यांच्या घरी छोटे जलशुद्धीकरण यंत्र लावले आहे. ते १०० पर्यंत टी.डी.एस.चे पाणी शुद्ध करून पितात. मात्र ज्यांच्याकडे ही सुविधा घेण्याची आर्थिक क्षमता नाही त्यांना नगरपंचायत पुरविते तेच पाणी प्यावे लागते. अनेक वर्षांपासून सेलूकर असेच पाणी पीत आहे. ‘लोकमत’ने याबाबत वारंवार वृत्त प्रकाशित करून ही आरोग्याशी गंभीर बाब शासनाच्या लक्षात आणून दिली. उशीरा का होईना शासनाने याची दखल घेतल्याचे दिसते.सध्या मौजा बेलगाव येथे दोन वेगवेगळ्या पाण्याच्या मोठ्या विहिरी आहेत. सेलूत पाण्याचे जलकुंभ उभारून शहरवासियांना या योनजेद्वारे पाणीपुरवठा होतो. या दोन योजना उभारण्यासाठी जवळपास सव्वातीन कोटीपेक्षा जास्त रुपये खर्च झाले. सेलू शहराला कधी पाणी टंचाईची झळ पोहचली नाही; मात्र यंदाच्या उन्हाळ्यात विहिरींचा जलस्तर खाली जावून अवघ्या काही तासात पाणी संपण्याची वेळ आली आहे. भविष्यात सेलू शहराला पाणीटंचाईचा फटका बसणार हे नक्की आहे. त्यामुळे बोरधरणवरून सुमारे १७ कि़मी. अंतराची पाईपलाईन टाकून व बोरधरणालगत विहीर खोदून सेलूला पाणी पुरवठा करण्याच्या कामाला शासनाकडून हिरवी झेंडी मिळाली आहे. याबाबत नगरपंचायत अध्यक्ष डॉ. राजेश जयस्वाल यांना विचारणा केली असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.(तालुका प्रतिनिधी)