शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
2
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
3
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
4
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
5
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
6
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
7
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
8
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
9
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
10
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
11
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
12
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
13
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
14
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
15
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
16
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
17
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
18
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
19
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
20
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक

सोयाबीनच्या अत्यल्प उताऱ्याने बळीराजाच्या डोळ्यांत पाणी

By admin | Updated: October 7, 2015 00:37 IST

सोयाबीन.. शेतकऱ्याचे वार्षिक आर्थिक नियोजन ठरविणारे पीक़ दिवाळीच्या तोंडावर निघाणाऱ्या या उत्पादनामुळे बळीराजाच्या घरची दिवाळी साजरी होते.

सरासरी एकरी एक ते दोन पोते : शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन ढासळलेवर्धा : सोयाबीन.. शेतकऱ्याचे वार्षिक आर्थिक नियोजन ठरविणारे पीक़ दिवाळीच्या तोंडावर निघाणाऱ्या या उत्पादनामुळे बळीराजाच्या घरची दिवाळी साजरी होते. यंदा मात्र हे समीकरण बदलण्याचे संकेत आहे. शेतकऱ्यांना एकरी दोन ते अडीच पोत्यांची उतारी येत असल्याने त्यांच्या डोळ्यात पाणी येत असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यात यंदाच्या खरीपात १ लाख २२ हजार हेक्टरवर पेरा झाला. पाऊस उशिरा आल्याने यंदा पेरा कमी झाल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. सोयाबीनचा पेरा झाल्यांनतर पावसाने मारलेल्या दडीने अंकुरलेल्या रोपट्यांची वाढ खुंटली. शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असताना आलेल्या पावसामुळे सोयाबीनला जीवनदान मिळाल्याचे बोलले जाऊ लागले. सोयाबीनचे उत्पन्न बऱ्यापैकी येईल असे वाटत असताना पुन्हा पावसाची गरज असताना पावसाने दडी मारली. सायोबीनच्या शेंगा भरण्याची वेळ असताना तापणाऱ्या उन्हामुळे आलेल्या शेंगा भरल्याच नाही. परिणामी उत्पादनात घट होत असल्याचे दिसून येत आहे. केवळ उत्पादनातच नाही तर हाती येत असलेल्या सोयाबीनचा दाणाही बारीकच आहे. यामुळे निघणाऱ्या उत्पादनाला दरही मिळणे कठीण झाले आहे. यंदाच्या पीक स्थितीवरून कृषी विभागाने हेक्टरी सहा ते सात पोते सोयाबीन होईल असा अंदाज व्यक्त केला होता; मात्र तसे झाले नाही. वास्तविकतेत एकरी अर्धे, कुठे एक पोत्याची उतारी येत आहे. सोयाबीन सवंगण्याच्या काळापर्यंत असलेल्या उन्हाच्या तडाख्यामुळे सोयाबीन जळाल्याने काही भागातील शेतकऱ्यांनी ते सवंगण्याचे टाळले आहे. शेतात असलेले पीक आता पूर्णत: जाळण्याचा निर्णय देवळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी होत आहे.(प्रतिनिधी) गतवर्षी हेक्टरी पाच पोत्यांची उतारीगतवर्षी दुष्काळी स्थिती असताना शेतकऱ्यांना सोयाबीनची हेक्टरी ४.४१ क्विंटल उतारी आली होती. यंदा मात्र तसेही होत नसल्याचे दिसून आले आहे. यंदाच्या हंगामात गत वर्षीच्या तुलनेत बिकट स्थिती असल्याचे दिसून आले आहे. आर्थिक सोय नसताना शेतकऱ्यांनी उधार उसणे घेत पेरा केला; मात्र पावसाने दिलेल्या दग्यामुळे यंदा कुठलेही उत्पन्न होत नसल्याचे दिसून आले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत आला आहे. शेतात उभ्या असलेल्या सोयाबीनमधून किती रुपयांचे उत्पन्न निघेल हे सांगणे सध्या कठीण झाले आहे. यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयाबीनची सवंगणी करण्याचे टाळले आहे. काही भागात सवंगणी करून सोयाबीन काढण्याचे काम होत असले तरी कुटारही निघण्याची शाश्वती राहिली नसल्याचे शेतकरी बोलत आहे. देवळी तालुक्यातील सोनेगाव, डिगडोह व आगरगाव या परिसरातील शेतकऱ्यांनी शेतात असलेले उभे पीक जाळण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. शेतीची वस्तुनिष्ठ पैसेवारी काढण्याची मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकाची नजरअंदाज पैसेवारी ६७ टक्केच्यावर निघाली आहे. परंतु यावर्षी पावसाच्या अनियमितपणामुळे सोयाबीन पिकाची परिस्थिती फारच चिंताजनक आहे. सरासरी उतारा हा एकरी १ ते २ क्ंिवटलवरही येणार नाही.