शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ वीज वाहिन्या ठरल्या यमदूत

By admin | Updated: July 12, 2016 02:41 IST

पावसाळ्याच्या दिवसात येत असलेल्या वादळात महावितरणचे खांब क्षतिग्रस्त होत अनेक ठिकाणी विजेच्या जिवंत तारा तुटून

वीज वितरणच्या अनागोंदीने वर्षभरात ५५ जणांचा बळीरूपेश खैरी ल्ल वर्धापावसाळ्याच्या दिवसात येत असलेल्या वादळात महावितरणचे खांब क्षतिग्रस्त होत अनेक ठिकाणी विजेच्या जिवंत तारा तुटून पडून असतात. या तारा दुरूस्त करण्यात महावितरणकडून दुर्लक्ष झाल्याने त्या यमदूत ठरल्याचे घडलेल्या अनेक घटनांवरून दिसून आले आहे. कंपनीच्या या दुर्लक्षामुळे पडून असलेल्या तारांमुळे व इतर काही अनागोंदीने गत वर्षभरात ५५ जणांचा बळी घेतला आहे तर ऐन शेतीच्या हंगामात ५७ जनावरांचाही मृत्यू झाला आहे. कारंजा तालुक्यातील सुसुंद्रा येथे रोहित्राच्या खांबातून ओल्या असलेल्या जमिनीत विद्युत प्रवाह संचारल्याने नऊ जणांना जबर धक्का बसला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. तर गिरड नजीकच्या शिवनफळ येथे झाडावर चार तोडण्याकरिता चढलेल्या शेतकऱ्याचा विजेचा धक्का बसल्याने मृत्यू झाला. याशिवाय शेतात पडून असलेल्या तारांच्या स्पर्शामुळे बैलांचा मृत्यू झाल्याच्या घटना नित्याच्याच आहेत. विजेचा धक्का बसलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना व मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांच्या मालकांना मदत देण्याचा नियम आहे. यात यंदाच्या सत्रात कंपनीच्यावतीने प्राथमिक मदत म्हणून ४ लाख ५० हजार रुपयांची मदत दिल्याचे सांगण्यात आले आहे. जनावरांच्या वयानुसार शेतकऱ्यांना मदत ४जिल्ह्यात घडलेल्या घटनांची नोंद करून विद्युत स्पर्शाने अपघाताने जनावराचा मृत्यू झाल्यास नजीकच्या कार्यालयातील कनिष्ठ अभियंता चौकशी करतो. पोलीस पंचनामा, तलाठी पंचनामा त्या भागातील लाईनमन साक्षीदारसमक्ष घटनेची पाहणी करणे गरजेचे आहे. त्यानंतर पशुधन अधिकारी दाखला, तहसीलदार, वैद्यकीय दाखला व घटनास्थळाच्या छायाचित्रासह संपूर्ण दस्तावेज जमा करून जिल्हा कार्यालयात जमा करणे गरजेचे आहे. त्यानंतर मृत्यू झालेल्या जनावरांच्या वयानुसार त्याची किंमत काढल्या जाते. त्याचे अधिकार जिल्हा कार्यालयातून निश्चित केल्या जाते त्यानुसार त्या शेतकऱ्यांना धनादेश दिल्या जाते. यात जास्तीत जास्त ३० हजार रुपये दिल्या जाते. महावितरणद्वारे झालेल्या अपघाताची माहिती त्या परिसरातील कार्यालयाला असते. काही त्रुटी असल्यास अर्ज येत नाही. मात्र जास्तीत जास्त प्रकरणे, जिल्हा कार्यालयातच येतात. त्या घटनेचा तपास विद्युत वितरण विभागामार्फत करून महावितरण जबाबदार आढळल्यास त्यांना धनादेश दिल्या जातो. याकरिता तहसीलदाराचा अहवाल महत्त्वाचा मानल्या जातो.- सुनील देशपांडे, अधीक्षक अभियंता, महावितरण वर्धा