शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ वीज वाहिन्या ठरल्या यमदूत

By admin | Updated: July 12, 2016 02:41 IST

पावसाळ्याच्या दिवसात येत असलेल्या वादळात महावितरणचे खांब क्षतिग्रस्त होत अनेक ठिकाणी विजेच्या जिवंत तारा तुटून

वीज वितरणच्या अनागोंदीने वर्षभरात ५५ जणांचा बळीरूपेश खैरी ल्ल वर्धापावसाळ्याच्या दिवसात येत असलेल्या वादळात महावितरणचे खांब क्षतिग्रस्त होत अनेक ठिकाणी विजेच्या जिवंत तारा तुटून पडून असतात. या तारा दुरूस्त करण्यात महावितरणकडून दुर्लक्ष झाल्याने त्या यमदूत ठरल्याचे घडलेल्या अनेक घटनांवरून दिसून आले आहे. कंपनीच्या या दुर्लक्षामुळे पडून असलेल्या तारांमुळे व इतर काही अनागोंदीने गत वर्षभरात ५५ जणांचा बळी घेतला आहे तर ऐन शेतीच्या हंगामात ५७ जनावरांचाही मृत्यू झाला आहे. कारंजा तालुक्यातील सुसुंद्रा येथे रोहित्राच्या खांबातून ओल्या असलेल्या जमिनीत विद्युत प्रवाह संचारल्याने नऊ जणांना जबर धक्का बसला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. तर गिरड नजीकच्या शिवनफळ येथे झाडावर चार तोडण्याकरिता चढलेल्या शेतकऱ्याचा विजेचा धक्का बसल्याने मृत्यू झाला. याशिवाय शेतात पडून असलेल्या तारांच्या स्पर्शामुळे बैलांचा मृत्यू झाल्याच्या घटना नित्याच्याच आहेत. विजेचा धक्का बसलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना व मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांच्या मालकांना मदत देण्याचा नियम आहे. यात यंदाच्या सत्रात कंपनीच्यावतीने प्राथमिक मदत म्हणून ४ लाख ५० हजार रुपयांची मदत दिल्याचे सांगण्यात आले आहे. जनावरांच्या वयानुसार शेतकऱ्यांना मदत ४जिल्ह्यात घडलेल्या घटनांची नोंद करून विद्युत स्पर्शाने अपघाताने जनावराचा मृत्यू झाल्यास नजीकच्या कार्यालयातील कनिष्ठ अभियंता चौकशी करतो. पोलीस पंचनामा, तलाठी पंचनामा त्या भागातील लाईनमन साक्षीदारसमक्ष घटनेची पाहणी करणे गरजेचे आहे. त्यानंतर पशुधन अधिकारी दाखला, तहसीलदार, वैद्यकीय दाखला व घटनास्थळाच्या छायाचित्रासह संपूर्ण दस्तावेज जमा करून जिल्हा कार्यालयात जमा करणे गरजेचे आहे. त्यानंतर मृत्यू झालेल्या जनावरांच्या वयानुसार त्याची किंमत काढल्या जाते. त्याचे अधिकार जिल्हा कार्यालयातून निश्चित केल्या जाते त्यानुसार त्या शेतकऱ्यांना धनादेश दिल्या जाते. यात जास्तीत जास्त ३० हजार रुपये दिल्या जाते. महावितरणद्वारे झालेल्या अपघाताची माहिती त्या परिसरातील कार्यालयाला असते. काही त्रुटी असल्यास अर्ज येत नाही. मात्र जास्तीत जास्त प्रकरणे, जिल्हा कार्यालयातच येतात. त्या घटनेचा तपास विद्युत वितरण विभागामार्फत करून महावितरण जबाबदार आढळल्यास त्यांना धनादेश दिल्या जातो. याकरिता तहसीलदाराचा अहवाल महत्त्वाचा मानल्या जातो.- सुनील देशपांडे, अधीक्षक अभियंता, महावितरण वर्धा