शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वर्धेकरांनो, 'डिजिटल अरेस्ट' पासून वेळीच व्हा सावधान !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 17:37 IST

सायबर चोरट्यांची नवी शक्कल : लाखो रुपयांची होतेय फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : 'आम्ही सीबीआय विभागातून बोलत आहे, तुम्ही देशविघातक कृत्य केले आहे. कुरिअरच्या माध्यमातून ड्रग्ज पाठविले असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामधून सुटका करायची असेल तर आम्हाला पाच लाख रुपये अमुक-तमुक खात्यावर पाठवा'. असा कॉल वर्ध्यातील काही प्रतिष्ठित व्यक्तींना आला असून विशेष म्हणजे बोलण्यात गुंतवून संबंधित व्यक्ती ठरलेले पैसे जोपर्यंत पाठवत नाही तोपर्यंत ऑडिओ किंवा व्हिडीओ कॉल कट करायचा नाही, अशी ताकीद दिली जाते.

एका दृष्टीने समोरच्याचे मानसिकदृष्ट्या खच्चीकरण करून सायबर चोरटे अवघ्या काही मिनिटांत त्याच्याकडून लाखो रुपयांची कमाई करतात. मागील वर्षभरात काही वर्धेकरांनी 'डिजिटल अरेस्ट'चा अनुभव घेतला असून, लाखो रुपये गमावले आहेत. जास्त धोका न घेता, प्रत्यक्षात कोणाला न भेटता, मुख्य म्हणजे एकाच खोलीत बसून दुसऱ्यांना लाखो रुपयांचा गंडा घालण्याचा उद्योग काही महिन्यांपासून सुरू झाला आहे. नागरिकच जागरूक नसल्याने सायबर चोरट्यांचे फावते आहे. अनेकांना 'समाज काय म्हणेल' आणि 'माझी अब्रू गेली तर मी इतरांना तोंड कसे दाखवू' ही चिंता नेहमी सतावत असते. त्याचाच अचूक फायदा सायबर चोरटे उचलतात. डिजिटल अरेस्ट करण्यासाठी सायबर चोरट्यांची टोळी कार्यरत असते. ही टोळी कार्यरत असते. ही टोळी पीडित व्यक्तीला फोन करून आपण पोलिस, ईडी, सीबीआय, प्राप्तिकर विभाग किंवा लष्करी अधिकारी असल्याची बतावणी करते. तुम्ही बेकायदेशीर वस्तू, बनावट पासपोर्ट, दहशतवाद्यांशी आर्थिक व्यवहार केल्याचे कोणतेही कारण सांगून 'डिजिटल अरेस्ट' केल्याचे समोरील व्यक्तीला सांगितले जाते. विश्वास बसण्यासाठी सोशल मीडियावरून सीबीआय किंवा तत्सम विभागाचे अटक वॉरंट पाठविले जाते. 

चोरटे फेक आयडी देखील पाठवितात. आपल्याला अटक करण्यात आल्याचे समजताच अनेकांच्या पायाखालची वाळूच सरकते आणि ती व्यक्ती जसे सांगते तसे आपण करू लागतो. त्यामुळे कायम जागरुक राहून फसवणुकीची शंका आल्यास तातडीने सायबर पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांशी संवाद साधण्यास प्राधान्य देण्याची गरज आहे. 

घाबरू नका, तक्रार दाखल करा सायबर चोरट्यांचा ऑडिओ किंवा व्हिडीओ कॉलमार्फत तुम्हाला डिजिटल अरेस्टची भीती घातल्यास घाबरू नका, जो गुन्हा तुम्ही केलेला नाही त्यामध्ये अटक कशी होईल असा साधा प्रश्न मनाला विचारा. समोरून पैशांची मागणी केल्यास कोणत्याही परिस्थितीत पैसे देऊ नका. चोरट्यांनी फेकलेल्या जाळ्यात अडकू नका. थेट सायबर पोलिस ठाण्यात संपर्क करा

आठ महिन्यांत दहावर तक्रारी दाखलसायबर पोलिस ठाणे कार्यान्वित झाल्यानंतर सर्वांत पहिला गुन्हा 'डिजिटल अरेस्ट'चाच दाखल करण्यात आला होता. यामध्ये तक्रारदाराचे लाखो रुपये सायबर चोरट्याने चोरून नेले होते. त्यानंतर मागील आठ महिन्यांत जवळपास १० ते १२ तक्रारी सायबर पोलिसांकडे प्राप्त झाल्याची माहिती आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

भामटे यांना करतात टार्गेट... उच्चशिक्षित पिढी नवीन तंत्रज्ञानाबाबत बऱ्यापैकी जागरुक असते. त्यामुळे सायबर चोरटे शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेले अधिकारी, कर्मचारी किंवा पन्नाशीच्या पुढील वयाचे व्यापाऱ्यांना टार्गेट करतात. कारण त्यांना अद्ययावत ज्ञान नसल्याने त्यांची फसवणूक करणे सोपे होते.

टॅग्स :wardha-acवर्धाdigitalडिजिटलArrestअटक