शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

वर्धा बनतेय गांजा तस्करीचे ‘हब’

By admin | Updated: March 2, 2017 00:25 IST

रेल्वे प्रवासाच्या दृष्टीने वर्धेतील सेवाग्राम महत्त्वाचे स्टेशन आहे. येथून चारही दिशेला जाणाऱ्या रेल्वे गाड्या उपलब्ध आहेत.

रेल्वे पोलिसांकडूनच सर्वाधिक कारवाया : वर्षभरात तब्बल दोन क्विंटल गांजा जप्त महेश सायखेडे  वर्धा रेल्वे प्रवासाच्या दृष्टीने वर्धेतील सेवाग्राम महत्त्वाचे स्टेशन आहे. येथून चारही दिशेला जाणाऱ्या रेल्वे गाड्या उपलब्ध आहेत. देशभर पसरलेल्या रेल्वेच्या जाळ्याचा अनेक अवैध व्यवसायाकरिता होत आहे. याच जाळ्याच्या माध्यमातून वर्धेत मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी होत असल्याचे पोलिसांच्या कारवाईवरून समोर आले आहे. वर्षभरात रेल्वे पोलिसांनी तब्बल दोन क्विंटल गांजा जप्त केल्याने वर्धा आता गांजा तस्करीचे ‘हब’ बनत असल्याचेच चित्र आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाली. त्या काळात रेल्वेतून मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी झाल्याचे पोलिसांच्या कारवाईवरून स्पष्ट झाले आहे. या कारवाईत आरोपी नव्हते; पण गांजाच्या तस्करीत पोलिसांना आरोपी सापडले असून त्यांनी आंध्रातून हा गांजा आणल्याचे कबूल केले आहे. आंध्रातून गांजा आणून तो वर्धेत उतरवायचा आणि येथून अमरावती, अकोला या भागात चिल्लर स्वरूपात विकायचा, असे या व्यवसाचे स्वरूप असल्याचे समोर आले आहे. गांजाची माहिती मिळताच बुट्टीबोरी ते बडनेरापर्यंत रेल्वेची हद्द असलेल्या वर्धा लोहमार्ग पोलिसांनी १५ कारवाया केल्या. या कारवाईत त्यांनी एकूण २०० किलो गांजा जप्त केला. याची किंमत १८ लाख ४८ हजार ९२० रुपये असल्याचे समोर आले आहे. यात त्यांनी १० आरोपींना अटक केल्याची माहिती आहे. पोलिसांनी एवढ्या कारवाया केल्या असताना वर्धेत अनेक ठिकाणी गांजाचा धूर निघताना दिसून येतो. रेल्वे पोलिसांच्या तुलनेत महाराष्ट्र पोलिसांकडून होणाऱ्या कारवाया थातुरमातूर असल्याचे दिसून आले आहे. प्राप्त माहितीनुसार, जिल्हा पोलिसांनी जानेवारी २०१६ ते २०१७ या बारा महिन्यांमध्ये चार ठिकाणी कारवाई करीत ३ लाख ५९ हजार १८० रुपयांचा ४४.१२१ किलो गांजा जप्त केला. वर्धा पोलिसांनी केलेल्या चार कारवाईमध्ये नऊ आरोपींना अटक करण्यात यश आले आहे. वर्षभरात वर्धा पोलिसांनी मोठ्या प्रमाणात गांजा जप्त केला असला तरी सध्या सुरू असलेल्या गांजा विक्री व्यवसायाच्या तुलनेत या कारवाया कमीच आहे. पोलीस यंत्रणेने शहरातील अड्डे धुंडाळणे गरजेचे झाले आहे. अमरावती, अकोला येथे वर्धा शहरातून तस्करी वर्धेत पकडलेल्या आरोपींमध्ये सर्वाधिक आरोपी अमरावती येथील असल्याचे समोर आले आहे. या आरोपींकडून आंध्रप्रदेशातून गांजा आणला जातो. तो अमरावती येथे नेऊन विकण्याचा व्यवसाय असल्याचेही समोर आले आहे. अमरावती येथून हा गांजा अकोला शहरापर्यंत जात असल्याची माहिती आहे. गांजा तस्करीचे नेटवर्क दोन-तीन राज्यांत पसरले असून रेल्वे स्थानक व गाड्यांत होणाऱ्या कारवाईतूनच ही बाब समोर येते. वर्धेत अनेक ठिकाणी गांजाचा धूर शहरात गांजाची तस्करी जोरात सुरू आहे. पोलिसांकडून आजपर्यंत केवळ बाहेरून गांजा आणणाऱ्या तस्करांवरच कारवाई झाल्याचे दिसते. शहरातील गांजांच्या अड्ड्यांकडे मात्र त्यांचे दुर्लक्ष होत आहे. वर्धा रेल्वे स्थानक परिसरासह शहरातील जीर्ण इमारतींमध्ये दररोज गांजाचा धूर निघतो. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असून वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे. १९ आरोपींना अंमली पदार्थांच्या तस्करीत अटक वर्धा लोहमार्ग पोलीस व रेल्वे सुरक्षा बल तसेच जिल्हा पोलिसांनी जानेवारी २०१६ ते फेब्रुवारी २०१७ पर्यंत १५ वेळा कारवाई केली. यातील चार कारवाई जिल्हा पोलिसांनी केल्या तर ११ कारवाई रेल्वे पोलिसांच्या आहे. यात एकूण १९ आरोपींना अटक केली आहे. यातील १० आरोपी रेल्वे तर नऊ आरोपी जिल्हा पोलिसांच्या कारवाईतील आहेत. या १९ आरोपींकडून १९३.९५ किलो गांजा जप्त करण्यात आला. त्याची किंमत १८ लाख ४८ हजार रुपये आहे. अकरा पैकी सहा कारवाईत ७५.३०८ किलो गांजा बेवारस आढळून आला आहे. यामुळे रेल्वेतून होत असलेल्या गांजाच्या तस्करीवर आळा बसविण्याची मागणी जोर धरत आहे.