शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

वर्धेकरांची अपेक्षापूर्ती नाहीच!

By admin | Updated: July 8, 2014 23:35 IST

रेल्वे अर्थसंकल्पात नेहमीच विदर्भाच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार घडतो. प्रत्येक अर्थसंकल्पात थातूरमातूर उपाययोजना केल्याने विदर्भाच्या पदरात निराशाच पडते. यंदाही विदर्भाला फारसे न देता खुप

रेल्वे अर्थसंकल्पात नेहमीच विदर्भाच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार घडतो. प्रत्येक अर्थसंकल्पात थातूरमातूर उपाययोजना केल्याने विदर्भाच्या पदरात निराशाच पडते. यंदाही विदर्भाला फारसे न देता खुप दिल्याचा आव रेल्वे अर्थसंकल्पातून दिसून आला़ नागपूर येथून विलासपूर व सिकंदराबाद या दोन वेगवान ट्रेन सुरू करण्यापलीकडे काहीही दिले नाही़ काजीपेठ ते मुंबई या गाडीची घोषणा झाली; पण तीही साप्ताहिक आहे़ काही चांगल्या निर्णयांचा अंतर्भाव करण्यात आला असला जिल्ह्यातील प्रस्ताव, मागण्या मात्र पूर्ण झाल्या नाहीत़ यापूर्वी मंजूर वर्धा-यवतमाळ -नांदेड या रेल्वेमार्गाबद्दल उल्लेख नाही तर आर्वी पुलगाव ऐतिहासिक शकुंतला ब्रॉडगेज करून नरखेडपर्यंत वाढविण्याच्या प्रस्तावालाही कुठेच थारा दिलेला नाही़ सामान्यांकरिता नागपूर, वर्धा, बडनेरा दरम्यान कुठलीही नवीन गाडी देण्यात आली नाही़काय होत्या अपेक्षा़़़स्टॉपेजची मागणी अपूर्णचनागपूर ते बडनेरा दरम्यान सिंदी (रेल्वे), पुलगाव, धामणगाव या मोठ्या रेल्वे स्थानकांवर काही एक्स्प्रेस गाड्यांच्या थांब्याची मागणी करण्यात आली होती़शिवाय सेवाग्राम ते चंद्रपूरपर्यंतच्या हिंगणघाट, वरोरा येथेही सुपरफास्ट गाड्या थांबाव्या, अशी मागणी होती़सामान्यांशी जुळलेल्या या मागण्यांकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले़ यापूर्वीच्या रेल्वे मंत्र्यांनीही याकडे लक्ष दिले नाही तर बजेटमध्येही यावर विचार करण्यात आलेला नाही़यामुळे सामान्यांना कुठलाही लाभ नसल्याचे दिसते़वर्धा-नांदेड, पुलगाव-आर्वी-नरखेड प्रकल्पही रखडलाचयापूर्वीच्या रेल्वे अर्थसंकल्पामध्ये वर्धा-यवतमाळ-नांदेड हा रेल्वे मार्ग मंजूर करण्यात आला होता़ यासाठी जमिनीचे अधिग्रहणही सुरू करण्यात आले होते; पण हा प्रकल्प अद्यापही पूर्णत्त्वास गेलेला नाही़ यासाठी निधीची तरतूदही करण्यात आली नसल्याचे समोर आले आहे़ रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आश्वासित केल्यानंतर उपोषण मागे घेतलेल्या पुलगाव-आर्वी-नरखेड रेल्वे मार्गालाही अर्थसंकल्पात थारा देण्यात आलेला नाही़ ऐतिहासिक इंग्रजकालीन शकुंतला एक्स्प्रेस ब्रॉडगेज करून नरखेडपर्यंत वाढविण्याची मागणी शेवटी अपूर्णच राहिली आहे़ अर्थसंकल्पात यासाठी कुठलीही तरतूद करण्यात आली नाही़वर्धेतील रेल्वे उड्डाण पूलाचा प्रश्नही खितपतचयंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पामध्ये ११६४ नवीन रेल्वे पुलांचा अंतर्भाव करण्यात आला आहे़ रेल्वे क्रॉसिंग ही संकल्पना हद्दपार करण्याचा प्रयत्न यातून होत असला तरी वर्धेतील वा अन्य जिल्ह्यांतील वाहतुकीला अपूरे पडत असलेल्या रेल्वे उड्डाण पुलांच्या विस्तारीकरणावर कुठलीही तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही़कित्येक वर्षांपासून रेल्वे प्रशासनाकडे धूळखात पडलेला पूल विस्तारीकरणाचा प्रश्न निकाली निघणे, हे वर्धेकरांसाठी महत्त्वाचे होते; पण याचाही अंतर्भाव करण्यात आलेला नाही़ यामुळे रेल्वेच्या यंदाच्या अर्थसंकल्पानेही वर्धेकरांना काहीच दिले नसल्याचेच दिसून येत आहे़ नवीन गाड्यांमध्ये जिल्ह्याला भोपळाचनागपूर वा मुंबई येथून नवीन गाड्या सुरू करून जिल्ह्याला दिलासा देणे गरजेचे होते; पण कुठलीही नवीन गाडी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही़नागपूर ते पुणे व काजीपेठ ते मुंबई या दोन गाड्या सुरू करण्याची घोषणा झाली; पण त्या दोन्ही गाड्या साप्ताहिक ठेवण्यात आल्याने कुणाच्याही उपयोगाच्या नसल्याच्या प्रतिक्रीया उमटत आहेत़वर्धा जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा मिळेल, अशी एकही नवीन गाडी सुरू करण्याची घोषणा करण्यात आलेली नाही़ नागपूर ते भुसावळ दरम्यान पॅसेंजरही वाढविण्यात आल्या नाहीत़ यामुळे वर्धेकरांच्या अपेक्षांची पूर्ती करण्यात हा रेल्वे अर्थसंकल्प अपयशीच ठरलाय़