शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
3
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
4
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
5
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
6
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
7
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
8
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
9
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
10
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
11
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
12
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
13
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
14
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
15
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
16
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
17
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
18
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
19
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
20
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

वर्धा नगराध्यक्षाला दोन आठवडे दिलासा

By admin | Updated: October 5, 2016 01:40 IST

नगर परिषद अध्यक्ष त्रिवेणी कुत्तरमारे यांना राज्य शासनाने नगर पालिका कायद्याच्या ५५ (अ) व ५५ (ब) अन्वये कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

उच्च न्यायालयाचे आदेश : कारवाईकरिता शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा वर्धा : नगर परिषद अध्यक्ष त्रिवेणी कुत्तरमारे यांना राज्य शासनाने नगर पालिका कायद्याच्या ५५ (अ) व ५५ (ब) अन्वये कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या नोटीसविरोधात कुत्तरमारे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातून स्थगनाादेश आणला होता. या स्थगनादेशाला पालिकेचे उपाध्यक्ष कलम कुलधरीया यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. या प्रकरणात न्यायालयाने मंगळवारी प्रकरण बंद करीत नगराध्यक्ष त्रिवेणी कुत्तरमारे यांना दोन आठवड्याचा दिलासा दिला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनाकडून होणाऱ्या कारवाईचा नगराध्यक्षांवर दोन आठवडे कोणताच प्रभाव होणार नसल्याचे म्हटले आहे. शिवाय न्यायालयाच्या आदेशाविरोधात त्यांना न्यायालयात जाण्याची मुभा असल्याची माहिती कुलधरीया यांचे वकील शंतनू भोयर यांनी दिली. येथील नगराध्यक्ष कुत्तरमारे यांनी वर्धा पालिकेत नियमानुसार नगरसेवकांच्या सभा घेतल्या नाही. तसेच त्यांच्या अधिकारात येत नसताना त्यांनी अमेरीकेच्या एका सेवाभावी सस्थेला वर्धेत काम करण्याकरिता सहकारी बनवून घेतले. त्यांच्या मुलाचा पालिकेत वाढत असलेला हस्तक्षेप या विरोधात उपाध्यक्ष कुलधरीया यांनी राज्य शासनाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून तो अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला होता. या अहवालावरून राज्य शासनाने त्यांना पालिका अधिनियम १९६५ चे कलम ५५ (अ) (पदमुक्त करणे), ५५ (ब) (सदस्यता रद्द करणे) नुसार नोटीस बजावली होती. हा नोटीस मिळण्यापूर्वीच त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यांना ३० आॅगस्ट २०१६ रोजी कुत्तरमारे यांना सदर नोटीस प्राप्त झाली. याचवेळी मुंबई येथे नगरविकास मंत्रालयात त्याची सुनावणी सुरू होती. याची माहिती मिळताच कुलधरीया यांनी नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्या याचिकेवर मंगळवारी न्यायमूर्ती बी. आर. गवई व व्ही. एम. देशपांडे यांनी निकाल दिला. त्यांच्या निकालानुसार या प्रकरणात शासनाकडून होणाऱ्या कारवाईचा किमान दोन आठवडे नगराध्यक्षांवर कुठलाही प्रभाव होणार नाही असे म्हटल्याची माहिती कुलधरीया यांचे वकील शंतून भोयर यांनी दिली. कुलधरीया यांच्या बाजूने नागपूर येथील अ‍ॅड. सुनील मनोहर यांनी बाजू मांडली. तर राज्य शासनातर्फे अ‍ॅड. निखील जोशी यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)