शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा नगराध्यक्षाला दोन आठवडे दिलासा

By admin | Updated: October 5, 2016 01:40 IST

नगर परिषद अध्यक्ष त्रिवेणी कुत्तरमारे यांना राज्य शासनाने नगर पालिका कायद्याच्या ५५ (अ) व ५५ (ब) अन्वये कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

उच्च न्यायालयाचे आदेश : कारवाईकरिता शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा वर्धा : नगर परिषद अध्यक्ष त्रिवेणी कुत्तरमारे यांना राज्य शासनाने नगर पालिका कायद्याच्या ५५ (अ) व ५५ (ब) अन्वये कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या नोटीसविरोधात कुत्तरमारे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातून स्थगनाादेश आणला होता. या स्थगनादेशाला पालिकेचे उपाध्यक्ष कलम कुलधरीया यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. या प्रकरणात न्यायालयाने मंगळवारी प्रकरण बंद करीत नगराध्यक्ष त्रिवेणी कुत्तरमारे यांना दोन आठवड्याचा दिलासा दिला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनाकडून होणाऱ्या कारवाईचा नगराध्यक्षांवर दोन आठवडे कोणताच प्रभाव होणार नसल्याचे म्हटले आहे. शिवाय न्यायालयाच्या आदेशाविरोधात त्यांना न्यायालयात जाण्याची मुभा असल्याची माहिती कुलधरीया यांचे वकील शंतनू भोयर यांनी दिली. येथील नगराध्यक्ष कुत्तरमारे यांनी वर्धा पालिकेत नियमानुसार नगरसेवकांच्या सभा घेतल्या नाही. तसेच त्यांच्या अधिकारात येत नसताना त्यांनी अमेरीकेच्या एका सेवाभावी सस्थेला वर्धेत काम करण्याकरिता सहकारी बनवून घेतले. त्यांच्या मुलाचा पालिकेत वाढत असलेला हस्तक्षेप या विरोधात उपाध्यक्ष कुलधरीया यांनी राज्य शासनाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून तो अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला होता. या अहवालावरून राज्य शासनाने त्यांना पालिका अधिनियम १९६५ चे कलम ५५ (अ) (पदमुक्त करणे), ५५ (ब) (सदस्यता रद्द करणे) नुसार नोटीस बजावली होती. हा नोटीस मिळण्यापूर्वीच त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यांना ३० आॅगस्ट २०१६ रोजी कुत्तरमारे यांना सदर नोटीस प्राप्त झाली. याचवेळी मुंबई येथे नगरविकास मंत्रालयात त्याची सुनावणी सुरू होती. याची माहिती मिळताच कुलधरीया यांनी नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्या याचिकेवर मंगळवारी न्यायमूर्ती बी. आर. गवई व व्ही. एम. देशपांडे यांनी निकाल दिला. त्यांच्या निकालानुसार या प्रकरणात शासनाकडून होणाऱ्या कारवाईचा किमान दोन आठवडे नगराध्यक्षांवर कुठलाही प्रभाव होणार नाही असे म्हटल्याची माहिती कुलधरीया यांचे वकील शंतून भोयर यांनी दिली. कुलधरीया यांच्या बाजूने नागपूर येथील अ‍ॅड. सुनील मनोहर यांनी बाजू मांडली. तर राज्य शासनातर्फे अ‍ॅड. निखील जोशी यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)