शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

जलयुक्त शिवारच्या अंमलबजावणीत वर्धा जिल्हा विभागात अव्वल

By admin | Updated: September 21, 2016 01:06 IST

पावसाच्या पाण्यावरील शेतकऱ्यांचे अवलंबित्व कमी करून शेत-शिवारात जलसाठे निर्माण व्हावेत या उद्देशाने राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या

३७ हजार दशलक्ष घनमीटर पाणीसाठा निर्मितीवर्धा : पावसाच्या पाण्यावरील शेतकऱ्यांचे अवलंबित्व कमी करून शेत-शिवारात जलसाठे निर्माण व्हावेत या उद्देशाने राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवारच्या अंमलबजावणीत वर्धा जिल्हा आघाडीवर आहे. नागपूर विभागातील सहांपैकी सर्वाधिक पाणी साठवण क्षमता वर्धा जिल्ह्यात निर्माण झाली. जलयुक्त शिवार अभियानामुळे २५ हजार हेक्टर संरक्षित सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे.जिल्ह्यात ४ लाख ४८ हजार २८५ हेक्टर क्षेत्रावर यावर्षी खरीपाची लागवड झाली आहे. त्यामध्ये केवळ २७ टक्के क्षेत्र सिंचनाखाली असून उर्वरित ७३ टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे. त्यामुळे पावसाची अनियमितता आणि शेतीची उत्पादकता यांचा थेट संबंध आपल्या जिल्ह्यात पहायला मिळतो. यावर्षी सुद्धा शेतकऱ्यांना हा अनुभव आलाच. ज्या गावांमध्ये जलयुक्त शिवारची कामे झालीत, तेथील शेतकऱ्यांना तिथे साचलेल्या पाण्याने तारले. आॅगस्ट महिन्यात पावसाने महिनाभर खंड दिला. पिके कोमेजायला लागतील तेव्हा सिमेंट बंधारा, शेततळे नाल्यातील पाण्यामुळे पिकांना नवसंजिवनी मिळाली.जलयुक्त शिवार अभियानात २०१५-१६ मध्ये २१४ गावांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी ११५ गावांमध्ये १०० टक्के काम पूर्ण झाले आहे तर ४४ गावांमध्ये ८० टक्के पेक्षा जास्त काम झाले आहे. या १५९ गावांमधील शेतकऱ्यांनी खंड काळात नाल्यामध्ये व सिमेंट बंधाऱ्यामुळे साठलेल्या पाण्याचा उपयोग ओलीत करून पिके वाचविण्यासाठी केला.यावर्षी जिल्ह्यातील किमान २५ हजार हेक्टरवरील शेतकऱ्यांना तरी पावसाच्या लहरीपणाचा फटका बसणार नाही. याशिवाय नाला खोलीकरण आणि सिमेंट नाला बांधमुळे विहिरीच्या पाणी पातळीत दीड ते दोन मिटरने वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. याचा थेट फायदा शेतकऱ्यांना पावसाच्या खंड काळात तसेच रब्बी पिकासाठी होणार आहे.(प्रतिनिधी)३,२०६ पैकी २,८९६ कामे पूर्ण गतवर्षी २१४ गावांमध्ये ३,२०६ कामे घेण्यात आली होती. यापैकी २,८९६ कामे पूर्ण झाली आहेत. या सर्व कामांमुळे जिल्ह्यात ३७ हजार ४५९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठी निर्माण झाला आहे. या पाण्याचा उपयोग कापूस पिकासाठी एकदा पाणी दिल्यास २४ हजार ९७२ हेक्टर क्षेत्रात सिंचन होवू शकते. तर दोनदा पाणी वापरल्यास १२ हजार ४८६ हेक्टर सिंचन होवू शकते.