शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवारच्या अंमलबजावणीत वर्धा जिल्हा विभागात अव्वल

By admin | Updated: September 21, 2016 01:06 IST

पावसाच्या पाण्यावरील शेतकऱ्यांचे अवलंबित्व कमी करून शेत-शिवारात जलसाठे निर्माण व्हावेत या उद्देशाने राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या

३७ हजार दशलक्ष घनमीटर पाणीसाठा निर्मितीवर्धा : पावसाच्या पाण्यावरील शेतकऱ्यांचे अवलंबित्व कमी करून शेत-शिवारात जलसाठे निर्माण व्हावेत या उद्देशाने राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवारच्या अंमलबजावणीत वर्धा जिल्हा आघाडीवर आहे. नागपूर विभागातील सहांपैकी सर्वाधिक पाणी साठवण क्षमता वर्धा जिल्ह्यात निर्माण झाली. जलयुक्त शिवार अभियानामुळे २५ हजार हेक्टर संरक्षित सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे.जिल्ह्यात ४ लाख ४८ हजार २८५ हेक्टर क्षेत्रावर यावर्षी खरीपाची लागवड झाली आहे. त्यामध्ये केवळ २७ टक्के क्षेत्र सिंचनाखाली असून उर्वरित ७३ टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे. त्यामुळे पावसाची अनियमितता आणि शेतीची उत्पादकता यांचा थेट संबंध आपल्या जिल्ह्यात पहायला मिळतो. यावर्षी सुद्धा शेतकऱ्यांना हा अनुभव आलाच. ज्या गावांमध्ये जलयुक्त शिवारची कामे झालीत, तेथील शेतकऱ्यांना तिथे साचलेल्या पाण्याने तारले. आॅगस्ट महिन्यात पावसाने महिनाभर खंड दिला. पिके कोमेजायला लागतील तेव्हा सिमेंट बंधारा, शेततळे नाल्यातील पाण्यामुळे पिकांना नवसंजिवनी मिळाली.जलयुक्त शिवार अभियानात २०१५-१६ मध्ये २१४ गावांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी ११५ गावांमध्ये १०० टक्के काम पूर्ण झाले आहे तर ४४ गावांमध्ये ८० टक्के पेक्षा जास्त काम झाले आहे. या १५९ गावांमधील शेतकऱ्यांनी खंड काळात नाल्यामध्ये व सिमेंट बंधाऱ्यामुळे साठलेल्या पाण्याचा उपयोग ओलीत करून पिके वाचविण्यासाठी केला.यावर्षी जिल्ह्यातील किमान २५ हजार हेक्टरवरील शेतकऱ्यांना तरी पावसाच्या लहरीपणाचा फटका बसणार नाही. याशिवाय नाला खोलीकरण आणि सिमेंट नाला बांधमुळे विहिरीच्या पाणी पातळीत दीड ते दोन मिटरने वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. याचा थेट फायदा शेतकऱ्यांना पावसाच्या खंड काळात तसेच रब्बी पिकासाठी होणार आहे.(प्रतिनिधी)३,२०६ पैकी २,८९६ कामे पूर्ण गतवर्षी २१४ गावांमध्ये ३,२०६ कामे घेण्यात आली होती. यापैकी २,८९६ कामे पूर्ण झाली आहेत. या सर्व कामांमुळे जिल्ह्यात ३७ हजार ४५९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठी निर्माण झाला आहे. या पाण्याचा उपयोग कापूस पिकासाठी एकदा पाणी दिल्यास २४ हजार ९७२ हेक्टर क्षेत्रात सिंचन होवू शकते. तर दोनदा पाणी वापरल्यास १२ हजार ४८६ हेक्टर सिंचन होवू शकते.