शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

वर्ध्यात भाजपपुढे गटबाजीचे तर काँग्रेसपुढे विजयाचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 22:32 IST

वर्धा विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षापुढे यावेळी गटबाजीचे, तर काँग्रेस पक्षापुढे आपला बालेकिल्ला परत मिळविण्याचे आव्हान आहे. गेल्यावेळी २०१४ मध्ये भाजपने पहिल्यांदा या मतदारसंघात विजय मिळविला होता. गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचा असलेला हा बालेकिल्ला उद्ध्वस्त झाला.

ठळक मुद्देभाजपात इच्छुकांची संख्या वाढली : काँग्रेस शेंडे कुटुंबावर पुन्हा प्रसन्न होणार काय ?

अभिनय खोपडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षापुढे यावेळी गटबाजीचे, तर काँग्रेस पक्षापुढे आपला बालेकिल्ला परत मिळविण्याचे आव्हान आहे. गेल्यावेळी २०१४ मध्ये भाजपने पहिल्यांदा या मतदारसंघात विजय मिळविला होता. गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचा असलेला हा बालेकिल्ला उद्ध्वस्त झाला. २००९ च्या निवडणुकीत प्रमोद शेंडे यांच्या हयातीतच त्यांचे सुपुत्र शेखर शेंडे काँग्रेसच्या तिकिटावर लढले व अपक्ष उमेदवार सुरेश देशमुख यांनी त्यांचा पराभव केला.त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत भाजपचे डॉ.पंकज भोयर विजयी झाले. त्यांनी सुरेश देशमुख यांच्यासह शेखर शेंडे यांचा दुसऱ्यांदा पराभव केला. २०१४ मध्ये आश्चर्यकारकरीत्या पंकज भोयर यांना दत्ताजी मेघे यांच्या पुढाकारातून ऐनवेळी वर्धा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे ते बाहेरचे व आपण पक्षाचे, अशी एक भावना भाजपमधील जुन्या लोकांची झाली. ती आजही कायम आहे. मागील ५ वर्षांत हीच बाब सातत्याने दिसत आली. २०१४ च्या निवडणुकीत जिल्हा परिषदेचे सदस्य राणा रणनवरे यांनीही भाजपच्या विरोधात निवडणूक लढविली होती.यावेळी डॉ. पंकज भोयर पुन्हा निवडणुकीसाठी सज्ज झाले आहे. मात्र, भाजपमधून काही नेते व गटांचा त्यांच्या उमेदवारीला विरोध आहे. भाजपकडून डॉ.भोयर यांच्या व्यतिरिक्त माजी खासदार सुरेश वाघमारे, वर्ध्याचे नगराध्यक्ष अतुल तराळे, जिल्हा परिषदेचे सदस्य राणा रणनवरे आदी विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार आहेत. तर काँग्रेसकडून प्रमोद शेंडे यांचे सुपुत्र शेखर शेंडे पुन्हा लढण्यासाठी तयार आहेत.तर आमदार रणजित कांबळे गटाकडून अमित गावंडे तर अ‍ॅड.चारूलता टोकस यांच्या गटाकडून शहर अध्यक्ष सुधीर पांगूळ यांचे नाव आघाडीवर आहे. याशिवाय माजी आमदार माणिकराव सबाने यांचे सुपुत्र पराग सबाने यांनीही थेट दिल्ली व प्रदेश दरबारी आपल्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला आहे. याशिवाय वैद्यकीय जनजागृती मंचच्या माध्यमातून सातत्याने काम करणारे डॉ. सचिन पावडे हे ही वर्धा विधानसभा मतदारसंघातून रिंगणात उतरण्यासाठी तयारीत असल्याचे त्यांच्या निकटवर्तींयाकडून सांगण्यात येत आहे. याशिवाय वर्धा विधानसभा मतदार संघात बहुजन समाज पक्ष, वंचित बहुजन आघाडी आदींचेही उमेदवार मैदानात उतरण्याची शक्यता आहे.पुनर्ररचनेनंतर वर्धा विधानसभा मतदारसंघ मोठ्या प्रमाणावर बदलला असून या मतदार संघात वर्धा शहरासह लगतची मोठी ५ ते ७ गावे व सेलू तालुक्याचा ७५ टक्के भाग समाविष्ट आहे. सेलू तालुक्याचा हा भाग तेलीबहुल असल्याने या मतदार संघात लोकसभा निवडणूकीत भाजपला ३७ हजारावर आघाडी मिळाली.त्यामुळे भाजप येथे भोयर यांनाच उमेदवारी देते काय किंवा उमेदवार बदलविते, हे पाहणे महत्त्वाचे राहणार आहे.वर्धा शहर राहणार निर्णायकंगेल्या विधानसभा निवडणुकीत पिपरी (मेघे) व सिंदी (मेघे) या दोन गावांच्या भरवशावर भाजपचे डॉ.पंकज भोयर यांनी या मतदारसंघात विजय मिळविला. गेल्या ५ वर्षांत सेलू तालुक्यासह वर्धा शहरात मोठ्या प्रमाणावर विकास कामे झालीत. या भागातील बहुतांश ग्रामपंचायतींवर भाजपची सत्ता आली आहे. मात्र, वर्धा शहराचे मतदान या निवडणुकीत निर्णायक राहणार आहे. या मतदार संघात तेली, कुणबी या दोन प्रमुख समाजाव्यतिरिक्त इतर समाजाचेही मोठ्या संख्येने मतदार आहे. शहरातील विकासकामांच्या अनागोंदीची झळ सर्व सामान्यांना बसली. रस्ते, भूमिगत गटार योजना यामुळे जनजीवन प्रभावित झाले. त्यामुळे मतदार भाजपवर नाराज आहेत. याचा फटका विधानसभा निवडणुकीत भाजपला बसण्याची शक्यता आहे. गेल्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढली होती. यावेळी मात्र सुरेश देशमुख काँग्रेसच्या उमेदवाराला मदत करण्याच्या भूमिकेत आहेत. मात्र, शेंडे कुटुंबातील उमेदवार असला तरच हे शक्य होईल, असे त्यांचे निकटवर्तीय सांगतात.