शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

वर्ध्यात भाजपपुढे गटबाजीचे तर काँग्रेसपुढे विजयाचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 22:32 IST

वर्धा विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षापुढे यावेळी गटबाजीचे, तर काँग्रेस पक्षापुढे आपला बालेकिल्ला परत मिळविण्याचे आव्हान आहे. गेल्यावेळी २०१४ मध्ये भाजपने पहिल्यांदा या मतदारसंघात विजय मिळविला होता. गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचा असलेला हा बालेकिल्ला उद्ध्वस्त झाला.

ठळक मुद्देभाजपात इच्छुकांची संख्या वाढली : काँग्रेस शेंडे कुटुंबावर पुन्हा प्रसन्न होणार काय ?

अभिनय खोपडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षापुढे यावेळी गटबाजीचे, तर काँग्रेस पक्षापुढे आपला बालेकिल्ला परत मिळविण्याचे आव्हान आहे. गेल्यावेळी २०१४ मध्ये भाजपने पहिल्यांदा या मतदारसंघात विजय मिळविला होता. गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचा असलेला हा बालेकिल्ला उद्ध्वस्त झाला. २००९ च्या निवडणुकीत प्रमोद शेंडे यांच्या हयातीतच त्यांचे सुपुत्र शेखर शेंडे काँग्रेसच्या तिकिटावर लढले व अपक्ष उमेदवार सुरेश देशमुख यांनी त्यांचा पराभव केला.त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत भाजपचे डॉ.पंकज भोयर विजयी झाले. त्यांनी सुरेश देशमुख यांच्यासह शेखर शेंडे यांचा दुसऱ्यांदा पराभव केला. २०१४ मध्ये आश्चर्यकारकरीत्या पंकज भोयर यांना दत्ताजी मेघे यांच्या पुढाकारातून ऐनवेळी वर्धा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे ते बाहेरचे व आपण पक्षाचे, अशी एक भावना भाजपमधील जुन्या लोकांची झाली. ती आजही कायम आहे. मागील ५ वर्षांत हीच बाब सातत्याने दिसत आली. २०१४ च्या निवडणुकीत जिल्हा परिषदेचे सदस्य राणा रणनवरे यांनीही भाजपच्या विरोधात निवडणूक लढविली होती.यावेळी डॉ. पंकज भोयर पुन्हा निवडणुकीसाठी सज्ज झाले आहे. मात्र, भाजपमधून काही नेते व गटांचा त्यांच्या उमेदवारीला विरोध आहे. भाजपकडून डॉ.भोयर यांच्या व्यतिरिक्त माजी खासदार सुरेश वाघमारे, वर्ध्याचे नगराध्यक्ष अतुल तराळे, जिल्हा परिषदेचे सदस्य राणा रणनवरे आदी विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार आहेत. तर काँग्रेसकडून प्रमोद शेंडे यांचे सुपुत्र शेखर शेंडे पुन्हा लढण्यासाठी तयार आहेत.तर आमदार रणजित कांबळे गटाकडून अमित गावंडे तर अ‍ॅड.चारूलता टोकस यांच्या गटाकडून शहर अध्यक्ष सुधीर पांगूळ यांचे नाव आघाडीवर आहे. याशिवाय माजी आमदार माणिकराव सबाने यांचे सुपुत्र पराग सबाने यांनीही थेट दिल्ली व प्रदेश दरबारी आपल्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला आहे. याशिवाय वैद्यकीय जनजागृती मंचच्या माध्यमातून सातत्याने काम करणारे डॉ. सचिन पावडे हे ही वर्धा विधानसभा मतदारसंघातून रिंगणात उतरण्यासाठी तयारीत असल्याचे त्यांच्या निकटवर्तींयाकडून सांगण्यात येत आहे. याशिवाय वर्धा विधानसभा मतदार संघात बहुजन समाज पक्ष, वंचित बहुजन आघाडी आदींचेही उमेदवार मैदानात उतरण्याची शक्यता आहे.पुनर्ररचनेनंतर वर्धा विधानसभा मतदारसंघ मोठ्या प्रमाणावर बदलला असून या मतदार संघात वर्धा शहरासह लगतची मोठी ५ ते ७ गावे व सेलू तालुक्याचा ७५ टक्के भाग समाविष्ट आहे. सेलू तालुक्याचा हा भाग तेलीबहुल असल्याने या मतदार संघात लोकसभा निवडणूकीत भाजपला ३७ हजारावर आघाडी मिळाली.त्यामुळे भाजप येथे भोयर यांनाच उमेदवारी देते काय किंवा उमेदवार बदलविते, हे पाहणे महत्त्वाचे राहणार आहे.वर्धा शहर राहणार निर्णायकंगेल्या विधानसभा निवडणुकीत पिपरी (मेघे) व सिंदी (मेघे) या दोन गावांच्या भरवशावर भाजपचे डॉ.पंकज भोयर यांनी या मतदारसंघात विजय मिळविला. गेल्या ५ वर्षांत सेलू तालुक्यासह वर्धा शहरात मोठ्या प्रमाणावर विकास कामे झालीत. या भागातील बहुतांश ग्रामपंचायतींवर भाजपची सत्ता आली आहे. मात्र, वर्धा शहराचे मतदान या निवडणुकीत निर्णायक राहणार आहे. या मतदार संघात तेली, कुणबी या दोन प्रमुख समाजाव्यतिरिक्त इतर समाजाचेही मोठ्या संख्येने मतदार आहे. शहरातील विकासकामांच्या अनागोंदीची झळ सर्व सामान्यांना बसली. रस्ते, भूमिगत गटार योजना यामुळे जनजीवन प्रभावित झाले. त्यामुळे मतदार भाजपवर नाराज आहेत. याचा फटका विधानसभा निवडणुकीत भाजपला बसण्याची शक्यता आहे. गेल्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढली होती. यावेळी मात्र सुरेश देशमुख काँग्रेसच्या उमेदवाराला मदत करण्याच्या भूमिकेत आहेत. मात्र, शेंडे कुटुंबातील उमेदवार असला तरच हे शक्य होईल, असे त्यांचे निकटवर्तीय सांगतात.