शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

वर्धेकर घेताहेत ‘कोरोना’ विषाची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 05:00 IST

वर्धा जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या यवतमाळ, नागपूर तसेच अमरावती येथे कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे शेजारच्या जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून इतर जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात दुध, भाजीपाला, फळ व मांस या जीवनावश्यक वस्तूंच्या आयातीवर १४ एप्रिलपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर गर्दी टाळण्यासाठी नियोजित वेळेत विविध दुकाने उघडण्याची मुबा देण्यात आली आहे.

ठळक मुद्देविनाकारण रस्त्यांवर मुक्तसंचार : संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोविड-१९ (कोरोना) या विषाणूने देशात नव्हे तर जगात थैमान घातले आहे. असे असले तरी वर्धेत अद्यापही कोराना एकही रुग्ण आढळला नाही. शिवाय दक्षता म्हणून प्रत्येक नागरिकाने घरात थांबण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र, वर्धेतील अनेक नागरिक विनाकारण घराबाहेर पडून ‘कोरोना’ नामक विषाची परीक्षाच घेत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. त्यामुळे संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी संबंधित यंत्रणेने करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.वर्धा जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या यवतमाळ, नागपूर तसेच अमरावती येथे कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे शेजारच्या जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून इतर जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात दुध, भाजीपाला, फळ व मांस या जीवनावश्यक वस्तूंच्या आयातीवर १४ एप्रिलपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर गर्दी टाळण्यासाठी नियोजित वेळेत विविध दुकाने उघडण्याची मुबा देण्यात आली आहे. याच संधीचा फायदा संचारबंदीच्या काळात सध्या काही नागरिक घेताना दिसत आहेत. मॉर्निंग वॉक यासह विनाकारण काही तरुण तसेच व्यक्ती घराबाहेर पडत असल्याने ठिकठिकाणी गर्दी होत आहेत. कोरोनाला हरवायचे असल्यास सोशल डिस्टन्सिंग पाळणे तसेच घराबाहेर न पडणे हाच एकमेव प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय आहे. परंतु, विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांमुळे घरात स्वत:ला क्वारंटाईन करून घेतलेल्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होत आहे. संभाव्य धोका लक्षात घेता वर्धा जिल्ह्यात संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी सूजान नागरिकांकडून केली जात आहे.उन्ह वाढताच रस्ते निर्मनुष्यभाजीपाला, दुध, औषध आदी जीवनावश्यक वस्तूंच्या दुकांनाना लॉकडाऊनमधून वगळण्यात आले आहे. असे असले तरी तेथे सोशल डिस्टन्सिंग पाळणे तसेच ग्राहकांना हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. नियोजित कालावधीत सदर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडे राहत असून तेथे जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन केले जात आहे. असे असले तरी विनाकारण घराबाहेर पडणारे याच कालावधीत घराबाहेर पडतात. शिवाय ऊन वाढल्यावर ते घरचा रस्ता पकडत असल्याचे आणि सायंकाळी पुन्हा घराबाहेर पडत असल्याचे बघावयास मिळत आहे.कोरोनाला हरविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने घरात थांबणे गरजेचे आहे. विनाकारण घराबाहेर पडून गर्दी केल्यास कोरोनाचा प्रसार झपाट्याने होऊ शकत असल्याने वर्धा जिल्ह्यात संचारबंदीची प्रभावी अंमलबजाणी व्हावी.- डॉ. प्रवीण धाकटे, लॉयन्स मेडिकोज, वर्धा.वर्धा जिल्ह्यात अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण आढलेला नाही. त्यामुळे वर्धा सध्या सेफझोन आहे. परंतु, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळत घरीत थांबणे गरजेचे आहे. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांमुळे घरात थांबलेल्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने किमान १४ एप्रिलपर्यंत संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज आहे.- अवचित सयाम, अध्यक्ष, बॅक ऑफ इंडिया, एससी, एसटी, ओबीसी एम्प्लॉईज असोसिएशन, वर्धा.कोरोनाशी लढा देण्यासाठी न.प. व नगरपंचायतीतील स्वच्छता कर्मचाऱ्यांसह विविध विभागातील अधिकारी तसेच कर्मचारी जीवाचे रान करीत आहेत. परंतु, काही व्यक्ती विनाकारण घराबाहेर पडून कोरोना या विषाणूजन्य आजाराला आमंत्रणच देत आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाने संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी करावी.- दीपक रोडे, माजी प्रशासकीय अधिकारी, न.प. वर्धा.जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्यात कलम १४४ लागू केली आहे. त्यानंतर त्यांची प्रभावी अंमलबजावणी पोलीस प्रशासनाकडून केली जात आहे. तर विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांचे वाहन जप्त केली जात आहे. वर्धा जिल्ह्यातील नागरिकांचे कोरोनाशी लढा देणाऱ्या यंत्रणेला उत्तम सहकार्य राहिले आहे. परंतु, नागरिक विनाकारण रस्त्यांवर येत असेल तर खाकीलाही कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे. प्रत्येक नागरिकाने घरातच राहून कोरोनाशी लढा देणाऱ्यांना सहकार्य करावे.- नीलेश मोरे, अपर पोलीस अधिकारी, वर्धा.