शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वर्धेकर घेताहेत ‘कोरोना’ विषाची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 05:00 IST

वर्धा जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या यवतमाळ, नागपूर तसेच अमरावती येथे कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे शेजारच्या जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून इतर जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात दुध, भाजीपाला, फळ व मांस या जीवनावश्यक वस्तूंच्या आयातीवर १४ एप्रिलपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर गर्दी टाळण्यासाठी नियोजित वेळेत विविध दुकाने उघडण्याची मुबा देण्यात आली आहे.

ठळक मुद्देविनाकारण रस्त्यांवर मुक्तसंचार : संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोविड-१९ (कोरोना) या विषाणूने देशात नव्हे तर जगात थैमान घातले आहे. असे असले तरी वर्धेत अद्यापही कोराना एकही रुग्ण आढळला नाही. शिवाय दक्षता म्हणून प्रत्येक नागरिकाने घरात थांबण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र, वर्धेतील अनेक नागरिक विनाकारण घराबाहेर पडून ‘कोरोना’ नामक विषाची परीक्षाच घेत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. त्यामुळे संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी संबंधित यंत्रणेने करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.वर्धा जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या यवतमाळ, नागपूर तसेच अमरावती येथे कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे शेजारच्या जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून इतर जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात दुध, भाजीपाला, फळ व मांस या जीवनावश्यक वस्तूंच्या आयातीवर १४ एप्रिलपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर गर्दी टाळण्यासाठी नियोजित वेळेत विविध दुकाने उघडण्याची मुबा देण्यात आली आहे. याच संधीचा फायदा संचारबंदीच्या काळात सध्या काही नागरिक घेताना दिसत आहेत. मॉर्निंग वॉक यासह विनाकारण काही तरुण तसेच व्यक्ती घराबाहेर पडत असल्याने ठिकठिकाणी गर्दी होत आहेत. कोरोनाला हरवायचे असल्यास सोशल डिस्टन्सिंग पाळणे तसेच घराबाहेर न पडणे हाच एकमेव प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय आहे. परंतु, विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांमुळे घरात स्वत:ला क्वारंटाईन करून घेतलेल्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होत आहे. संभाव्य धोका लक्षात घेता वर्धा जिल्ह्यात संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी सूजान नागरिकांकडून केली जात आहे.उन्ह वाढताच रस्ते निर्मनुष्यभाजीपाला, दुध, औषध आदी जीवनावश्यक वस्तूंच्या दुकांनाना लॉकडाऊनमधून वगळण्यात आले आहे. असे असले तरी तेथे सोशल डिस्टन्सिंग पाळणे तसेच ग्राहकांना हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. नियोजित कालावधीत सदर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडे राहत असून तेथे जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन केले जात आहे. असे असले तरी विनाकारण घराबाहेर पडणारे याच कालावधीत घराबाहेर पडतात. शिवाय ऊन वाढल्यावर ते घरचा रस्ता पकडत असल्याचे आणि सायंकाळी पुन्हा घराबाहेर पडत असल्याचे बघावयास मिळत आहे.कोरोनाला हरविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने घरात थांबणे गरजेचे आहे. विनाकारण घराबाहेर पडून गर्दी केल्यास कोरोनाचा प्रसार झपाट्याने होऊ शकत असल्याने वर्धा जिल्ह्यात संचारबंदीची प्रभावी अंमलबजाणी व्हावी.- डॉ. प्रवीण धाकटे, लॉयन्स मेडिकोज, वर्धा.वर्धा जिल्ह्यात अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण आढलेला नाही. त्यामुळे वर्धा सध्या सेफझोन आहे. परंतु, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळत घरीत थांबणे गरजेचे आहे. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांमुळे घरात थांबलेल्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने किमान १४ एप्रिलपर्यंत संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज आहे.- अवचित सयाम, अध्यक्ष, बॅक ऑफ इंडिया, एससी, एसटी, ओबीसी एम्प्लॉईज असोसिएशन, वर्धा.कोरोनाशी लढा देण्यासाठी न.प. व नगरपंचायतीतील स्वच्छता कर्मचाऱ्यांसह विविध विभागातील अधिकारी तसेच कर्मचारी जीवाचे रान करीत आहेत. परंतु, काही व्यक्ती विनाकारण घराबाहेर पडून कोरोना या विषाणूजन्य आजाराला आमंत्रणच देत आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाने संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी करावी.- दीपक रोडे, माजी प्रशासकीय अधिकारी, न.प. वर्धा.जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्यात कलम १४४ लागू केली आहे. त्यानंतर त्यांची प्रभावी अंमलबजावणी पोलीस प्रशासनाकडून केली जात आहे. तर विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांचे वाहन जप्त केली जात आहे. वर्धा जिल्ह्यातील नागरिकांचे कोरोनाशी लढा देणाऱ्या यंत्रणेला उत्तम सहकार्य राहिले आहे. परंतु, नागरिक विनाकारण रस्त्यांवर येत असेल तर खाकीलाही कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे. प्रत्येक नागरिकाने घरातच राहून कोरोनाशी लढा देणाऱ्यांना सहकार्य करावे.- नीलेश मोरे, अपर पोलीस अधिकारी, वर्धा.