शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
2
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
3
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
4
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
5
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
6
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
7
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
8
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
9
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
10
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
11
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
12
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
13
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
14
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
15
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
16
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
17
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
18
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
19
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
20
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस

शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे वर्धा-नागपूर महामार्ग ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 05:00 IST

दुपारी १२ वाजताच्या सुमारास शेतकऱ्यांनी पवनार येथील मुख्य चौकात एकत्र येण्यास सुरुवात केली. ठीक १२.०५ वाजता आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत थेट महामार्गाच्या मधोमध ठिय्या दिला. या आंदोलनाची माहिती मिळताच सेवाग्राम पोलीस स्टेशनचे ठाणेदार कांचन पांडे हे त्यांच्या सहकाऱ्यांसह पवनार येथे पोहोचले. त्यानंतर, पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले, शिवाय खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली.

ठळक मुद्देकेंद्र शासनाने तिन्ही कायदे रद्द करण्याची रेटली मागणी : पवनारात दोन्ही बाजूने लागल्या होत्या वाहनांच्या लांबच लांब रांगा

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा/पवनार : दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या आंदोनाला पाठिंबा देत, विविध सामाजिक संघटनांसह राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी, तसेच शेतकऱ्यांनी एकत्र येत, शनिवारी दुपारी वर्धा-नागपूर महामार्गावरील पवनार येथे रास्तारोको आंदोलन केले. केंद्र शासनाने शेतकऱ्यांशी निगडित तिन्ही कृषी कायदे तातडीने मागे घ्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. सुमारे एक तास हे आंदोलन सुरू राहिल्याने वर्धा-नागपूर मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.दुपारी १२ वाजताच्या सुमारास शेतकऱ्यांनी पवनार येथील मुख्य चौकात एकत्र येण्यास सुरुवात केली. ठीक १२.०५ वाजता आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत थेट महामार्गाच्या मधोमध ठिय्या दिला. या आंदोलनाची माहिती मिळताच सेवाग्राम पोलीस स्टेशनचे ठाणेदार कांचन पांडे हे त्यांच्या सहकाऱ्यांसह पवनार येथे पोहोचले. त्यानंतर, पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले, शिवाय खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. आंदोलनात किसान अधिकार अभियानचे मुख्य प्रेरक अविनाश काकडे, जिल्हाध्यक्ष सुदाम पवार, गोपाल दुधाने, विठ्ठल झाडे, प्रफुल्ल कुकडे, माकपचे राज्य सचिव यशवंत झाडे, संजय भगत, समीर बोरकर, प्रभाकर धवने, भैय्या देशकर, दुर्गा काकडे, अर्चना घोघरे, आशा ईखार, रामभाऊ ठवरी, काँग्रेसचे मनोज चांदुरकर, सुधीर पांगुळ, अविनाश सेलुकर, पंकज इंगोले, मिलिंद मोहोड, अभिजीत चौधरी, आपचे प्रमोद भोमले, नितीन झाडे, मंगेश शेंडे, तुळशीराम वाघमारे, मनोज तायडे, महेंद्र मुनेश्वर, प्रभाकर चोंदे, निरज गुजर, मनोज कांबळे, पंकज सत्यकार, अस्लम पठाण, प्रसाद बागवे, राकाँचे ॲड.मिलिंद हिवलेकर, संजय काकडे, संदीप किटे, प्रवीण काटकर, योगेश घोगरे, पराग खंगार, ॲड.पूजा जाधव, श्रेया गोडे, जगदीश डोळसकर, गजेंद्र सुरकार, दिवाकर शंभरकर, सुरेश बोरकर, दिलीप मसराम, मधुकर भोयर, सुमेर ठाकूर, पवन दांडेकर यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.  

आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी केले स्थानबद्धआंदोलनस्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत सेवाग्राम पोलीस ठाण्यात नेले. तेथे आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले होते. नंतर त्यांची सुटका करण्यात आली.पोलिसांची दमछाकआंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्यावर खोळंबलेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांची चांगलीच दमछाक झाली होती.

खोळंबलेली वाहतूक पोलिसांनी केली सुरळीतपवनार येथील रास्तारोको आंदोलनामुळे पवनार ते वर्धा तर पवनार ते सेलू या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्यावर पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक सुरळीत केली. वाहतूक सुरळीत करण्यासाठी तब्बल अर्धातासांचा कालावधी लागला, हे विशेष.

आंदोलनाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसादशनिवारी जिल्ह्यातील तळेगाव (श्या.पंत.) हिंगणघाट, वायगाव, धोत्रा चौरस्ता आदी ठिकाणी शेतकरी व महाविकास आघाडीच्या घटक पक्षासह डाव्या पक्षांनी रस्ता राेको आंदोलन केले. याला शेतकरी व शेतमजूरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कृषी कायदे मागे घेण्याची मागणी केली.

 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संप