शहरं
Join us  
Trending Stories
1
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
2
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
3
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
4
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
5
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
6
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
7
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
8
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
9
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
10
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
11
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
12
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
13
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
14
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
15
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
16
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
17
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
18
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
19
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
20
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

पंतप्रधान आवास योजनेत वर्धा पिछाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 06:00 IST

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत किरायेदार, घरमालक, समाजातील आर्थिक दुर्बल घटक, बेघर, निराधारांना घरकुलाचा लाभ दिला जातो. असे असताना वर्धा शहरात केवळ ज्यांची घरे भाडेतत्त्वावर आहेत, केवळ त्यांचेच आवेदन स्वीकारण्यात आले आहे. ज्यांचे स्वत:चे झोपडे अथवा कुडाचे घर आहे, त्यांना अडीच लाखांचे अनुदान शासनाकडून दिले जाते.

ठळक मुद्देअनुदान देण्यास केंद्र सरकारच उदासीन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गरिबांचे घराचे स्वप्न पूर्ण व्हावे याकरिता शासनाच्या योजना आहेत. पंतप्रधानांच्या नावे असलेल्या आवास योजनेचे उद्दिष्ट गाठण्यात केंद्राच्या उदासीन धोरणामुळे यंत्रणा फेल ठरली आहे. या योजनेकरिता पालिकेअंतर्गत केवळ २५७ जणांनाच आवास योजनेचे अनुदान मिळाल्याने केवळ १० टक्केच उद्दिष्टपूर्ती होऊ शकली. परिणामी, वर्धा जिल्हा या योजनेत पिछाडीवर आहे.पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत किरायेदार, घरमालक, समाजातील आर्थिक दुर्बल घटक, बेघर, निराधारांना घरकुलाचा लाभ दिला जातो. असे असताना वर्धा शहरात केवळ ज्यांची घरे भाडेतत्त्वावर आहेत, केवळ त्यांचेच आवेदन स्वीकारण्यात आले आहे. ज्यांचे स्वत:चे झोपडे अथवा कुडाचे घर आहे, त्यांना अडीच लाखांचे अनुदान शासनाकडून दिले जाते. यात केंद्राचा ६० तर राज्य शासनाचा ४० टक्के सहभाग असतो. वर्धा नगरपालिकेअंतर्गत आजपावेतो केवळ २५७ लाभार्थ्यांनाच राज्य शासनाअंतर्गत घरकुलाच्या अनुदानाची रक्कम प्राप्त झालेली आहे. केंद्राच्या अखत्यारित ही योजना येत असताना अनुदान देण्यात हात आखुडता घेतला जात आहे. राज्य शासनाकडून पहिल्या टप्प्यात ४० हजार, दुसऱ्या ४० हजार आणि तिसऱ्या टप्प्यात २० हजार असे एकूण १ लाखाचे अनुदान दिले जात असून ही रक्कम पालिकेला प्राप्त झाली आहे. केंद्र सरकारकडून एकूण १ लाख ५० हजारांचे अनुदान दिले जाते. मात्र, ही रक्कम अद्याप पालिकांना प्राप्त न झाल्याने लाभार्थी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.आवास योजना पंतप्रधानांच्या नावाने असताना केंद्र सरकारकडून लाभार्थ्यांना आजपावेतो छदामही मिळाला नाही. मात्र, राज्य शासनाकडून लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम पूर्णत: दिली जात आहे. केंद्र सरकारकडून अनुदान देण्यात हात आखुडता घेतला जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. केंद्र सरकारने सहभागाची रक्कम उपलब्ध करून देण्याची गरज आहे.- सुरेश पट्टेवार, जिल्हाध्यक्ष,अ. भा. वीरशैव युवक संघटना, वर्धा

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना