शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
4
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
5
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
6
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
7
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
8
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
10
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
11
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
12
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
13
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
14
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
15
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
16
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
17
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
18
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
20
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम

वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उद्योग येणार

By admin | Updated: February 14, 2017 01:25 IST

जिल्ह्यात रोजगाराच्या संदर्भात मोठ्या प्रमाणावर परिवर्तन करण्याचे चालले आहे. राष्ट्रीय महामार्गाचे जाळे तयार होत आहे.

देवेंद्र फडणवीस : सेवाग्राम जगात शांतीचे प्रतिक म्हणून दीपस्तंभासारखे काम करेल- मुनगंटीवारवर्धा : जिल्ह्यात रोजगाराच्या संदर्भात मोठ्या प्रमाणावर परिवर्तन करण्याचे चालले आहे. राष्ट्रीय महामार्गाचे जाळे तयार होत आहे. दुसरीकडे ड्रायफूटचे काम होणार आहे. या माध्यमातून रेल्वेचे मोठे जाळेही तयार करीत आहे. वर्धा-नांदेड रेल्वेची कनेक्टीव्हिटी असेल. आर्वी ते पुलगाव ब्रॉडगेजचे काम असेल, या प्रकल्पांना मान्यता दिली असून मोठ्या प्रमाणावर येथे उद्योग येणार आहे. कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी आंजी(मोठी) येथील प्रचार सभेत केले. नगर पालिकांच्या निवडणुकीत काँगेसचा सुपडा साफ केला. आता जिल्हा परिषदेतही हे होणार आहे, असा दावाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केला. व्यासपीठावर राज्याचे अर्थ व वित्त मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, खा. रामदास तडस, आ. डॉ. पंकज भोयर, जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, माजी खासदार सुरेश वाघमारे व विजय मुडे यांच्यासह उमेदवार विराजमान होते. एकीकडे अन्न, वस्त्र, निवारा दुसरी कडे शिक्षण, आरोग्य रोजगार आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात राज्य शासनाने चांगले काम करण्याचा प्रयत्न सुरू केला. २०१४ रोजी जेव्हा भाजपचे सरकार आले तेव्हा महाराष्ट्र शिक्षणाच्या क्षेत्रात भारतात ५८ व्या क्रमांकावर होता. जिल्हा परिषदेमध्ये शिकणाऱ्या पाचवीच्या ६० टक्के मुलांना तिसरीचे पुस्तक देखील वाचता येत नव्हते. आता महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आणायचे आहे. शाळा डिजीटल करतो आहे. वर्षभरात १५ हजार पालिकांनी आपल्या पाल्यांचे खासगी शाळांतून जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतले आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. याप्रसंगी ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादीचा हिशेब चुकता करण्याची वेळ आली आहे. १५ वर्षे ज्यांची सत्ता होती. त्यांनी महाराष्ट्राची वाट लावली. त्यांनी महाराष्ट्राच्या पवित्र विकास कामांचे अमंगल केले. त्या या निवडणुकीत धडा शिकविण्याची गरज आहे. सिंचनाचे प्रकल्प व्हावे, सेवाग्रामच्या २६६ कोटींच्या आराखड्याला मंजुरी दिली. तो जेव्हा पूर्ण होईल. जगाच्या १९५ देशांच्या नकाशात सेवाग्राम एक शांतीचे प्रतिक म्हणून दीपस्तंभासारखे काम करेल, असेही ते म्हणाले. या सभेनंतर ना. मुनगंटीवार यांनी नालवाडी(म्हसाळा), पिपरी(मेघे), तळेगाव(श्या.), मांडगाव, वडनेर, नंदोरी व गिरड येथे प्रचार सभांना संबोधित करुन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा खरपूस समाचार घेत भाजप सरकारच्या योजनांवर प्रकाश टाकला.(जिल्हा प्रतिनिधी)