शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उद्योग येणार

By admin | Updated: February 14, 2017 01:25 IST

जिल्ह्यात रोजगाराच्या संदर्भात मोठ्या प्रमाणावर परिवर्तन करण्याचे चालले आहे. राष्ट्रीय महामार्गाचे जाळे तयार होत आहे.

देवेंद्र फडणवीस : सेवाग्राम जगात शांतीचे प्रतिक म्हणून दीपस्तंभासारखे काम करेल- मुनगंटीवारवर्धा : जिल्ह्यात रोजगाराच्या संदर्भात मोठ्या प्रमाणावर परिवर्तन करण्याचे चालले आहे. राष्ट्रीय महामार्गाचे जाळे तयार होत आहे. दुसरीकडे ड्रायफूटचे काम होणार आहे. या माध्यमातून रेल्वेचे मोठे जाळेही तयार करीत आहे. वर्धा-नांदेड रेल्वेची कनेक्टीव्हिटी असेल. आर्वी ते पुलगाव ब्रॉडगेजचे काम असेल, या प्रकल्पांना मान्यता दिली असून मोठ्या प्रमाणावर येथे उद्योग येणार आहे. कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी आंजी(मोठी) येथील प्रचार सभेत केले. नगर पालिकांच्या निवडणुकीत काँगेसचा सुपडा साफ केला. आता जिल्हा परिषदेतही हे होणार आहे, असा दावाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केला. व्यासपीठावर राज्याचे अर्थ व वित्त मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, खा. रामदास तडस, आ. डॉ. पंकज भोयर, जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, माजी खासदार सुरेश वाघमारे व विजय मुडे यांच्यासह उमेदवार विराजमान होते. एकीकडे अन्न, वस्त्र, निवारा दुसरी कडे शिक्षण, आरोग्य रोजगार आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात राज्य शासनाने चांगले काम करण्याचा प्रयत्न सुरू केला. २०१४ रोजी जेव्हा भाजपचे सरकार आले तेव्हा महाराष्ट्र शिक्षणाच्या क्षेत्रात भारतात ५८ व्या क्रमांकावर होता. जिल्हा परिषदेमध्ये शिकणाऱ्या पाचवीच्या ६० टक्के मुलांना तिसरीचे पुस्तक देखील वाचता येत नव्हते. आता महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आणायचे आहे. शाळा डिजीटल करतो आहे. वर्षभरात १५ हजार पालिकांनी आपल्या पाल्यांचे खासगी शाळांतून जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतले आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. याप्रसंगी ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादीचा हिशेब चुकता करण्याची वेळ आली आहे. १५ वर्षे ज्यांची सत्ता होती. त्यांनी महाराष्ट्राची वाट लावली. त्यांनी महाराष्ट्राच्या पवित्र विकास कामांचे अमंगल केले. त्या या निवडणुकीत धडा शिकविण्याची गरज आहे. सिंचनाचे प्रकल्प व्हावे, सेवाग्रामच्या २६६ कोटींच्या आराखड्याला मंजुरी दिली. तो जेव्हा पूर्ण होईल. जगाच्या १९५ देशांच्या नकाशात सेवाग्राम एक शांतीचे प्रतिक म्हणून दीपस्तंभासारखे काम करेल, असेही ते म्हणाले. या सभेनंतर ना. मुनगंटीवार यांनी नालवाडी(म्हसाळा), पिपरी(मेघे), तळेगाव(श्या.), मांडगाव, वडनेर, नंदोरी व गिरड येथे प्रचार सभांना संबोधित करुन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा खरपूस समाचार घेत भाजप सरकारच्या योजनांवर प्रकाश टाकला.(जिल्हा प्रतिनिधी)