शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

लम्पी आजारामुळे नागपूर विभागात सर्वाधिक जनावरांचा मृत्यू वर्धा जिल्ह्यात

By आनंद इंगोले | Updated: November 24, 2022 11:05 IST

गोपालकांची वाढली अडचण; पशुसंवर्धन विभागातील अधिकारी हाकतात उंटावरून शेळ्या

वर्धा : जिल्ह्याच्या सीमेवरील इतर जिल्ह्यांत लम्पी आजाराचा प्रकोप वाढत असल्याचे निदर्शनास येताच तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्याने जिल्ह्यात उशिराने या आजाराचा शिरकाव झाला. मात्र, त्यानंतर पशुसंवर्धन विभागाने ‘ऑल इज वेल’ असल्याचे चित्र वरिष्ठांसमोर उभे केल्याने वर्धा जिल्ह्यात लम्पीचा विस्फोट झाल्याचे वास्तव खुद्द पशुसंवर्धनच्या आकडेवारीवरूनच दिसून येत आहे. नागपूर विभागात सर्वाधिक जनावरांचा मृत्यू वर्धा जिल्ह्यात झाल्याने पशुपालकांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.

वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे आधीच कंबरडे मोडले आहे. त्यात आता लम्पीने भर घातली आहे. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे व जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी हा आजार जिल्ह्याच्या सीमेवर येताच गावोगावी उपाययोजना सुरू केल्या. परिणामी जिल्ह्यात उशिराने आर्वी व आष्टी तालुक्यातून लम्पीची एन्ट्री झाली. लम्पीबाधित जनावरे आढळून आल्याबरोबर दोन्ही अधिकाऱ्यांनी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन बाधित गावाला भेट देऊन तातडीने उपचार सुरू केले. दरम्यानच्या काळात डॉ. सचिन ओम्बासे यांची बदली झाल्यानंतर पशुसंवर्धन विभागाने या आजाराबाबत फारसे गांभीर्याने घेतले नाही. कागदोपत्री कार्यवाही करून वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्याचाच प्रकार चालविला. परिणामी जिल्ह्यातील तब्बल १२८ गोवंश या आजाराला बळी पडले. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे. आष्टी तालुक्यासह एकंदरीतच पशुसंवर्धन विभागात सुरू असलेला सावळागोंधळ ‘लोकमत’ने सातत्याने निदर्शनास आणून दिला; परंतु या विभागातील उंटावरून शेळ्या हाकण्याच्या प्रकाराबाबत वरिष्ठांनी ना दखल घेतली ना नोटीस बजावली.

नागपूर विभागातील आकडेवारी (२१ नोव्हेंबरपर्यंत)

जिल्हा - तालुके - बाधित - आजारमुक्त - ॲक्टिव्ह - मृत्यू

  • नागपूर - १३ - २८०७ - २०२२  - ७८५ - ११९
  • चंद्रपूर - १५ - ४५१ - ३३१ - १२० - ०६
  • वर्धा - ०८ - १६६५ - ११३७ - ५२८ - १२८
  • गोंदिया - ०८ - १९८ - १४२ - ५६ - ०७
  • भंडारा - ०७ - ७९४ - ३२९ - ४६५ - ६७
  • गडचिरोली - १२ - ०५ - ०० - ०४ - ०१

 

जिल्ह्यातील जनावरांची मृत्यूसंख्या

तालुका - मृत्यू

आर्वी - १९

आष्टी - ४७

कारंजा - २०

हिंगणघाट - ०९

समुद्रपूर - ०३

देवळी - ०६

वर्धा - १८

सेलू - ०७

वीस दिवसांत मृत्यूचा आकडा तिप्पट

जिल्हा पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहण्याचा आदेश काढून स्वत:च या आदेशाचे पालन केले नाही. परिणामी तालुका पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनीही त्यांचाच कित्ता गिरविल्याने जिल्ह्यात लम्पी आजार झपाट्याने वाढला. कागदोपत्री घोडे नाचविण्यात आणि जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्यातच धन्यता मानल्याने लसीकरणानंतही अवघ्या वीस दिवसांत जनावरांच्या मृत्यूचा आकडा तिप्पट झाला. १ नोव्हेंबर २०२२ रोजी जिल्ह्यातील १०४ बाधित गावांमध्ये ३३ जनावरे दगावली होती. आता मृत्यूची संख्या १२८ झाली असून, याची नोंदही पशुसंवर्धन विभागाकडे आहे.

सहा अधिकारी पाठविले परजिल्ह्यात

जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाकडे आधीच मनुष्यबळाची कमतरता असल्याने तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांती कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्ह्यात लम्पीचा प्रकोप वाढत असताना, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची आवश्यकता असताना, सहा अधिकारी परजिल्ह्यात सेवा देण्याकरिता पाठविले. परिणामी वर्धा जिल्ह्यातील डोलारा ढासळला आणि जनावरांच्या मृत्यूचा आकडा फुगला. यामुळे आता पशुपालकांना नुकसानभरपाई देण्यासाठी शासनाला तिजोरी खाली करावी लागणार आहे.

टॅग्स :Lumpy Skin Disease Virusलम्पी त्वचारोगVidarbhaविदर्भwardha-acवर्धा