शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्ह्यात कृषी साहित्यावरील जीएसटीने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 14:49 IST

भारनियमनामुळेही ऊसाकरिता ठिबक सिंचनाची सोय करणे क्रमप्राप्त ठरते; पण तीन लाखांच्या ठिबक संचावरही १८ टक्के जीएसटी लावल्याने संच घ्यायचा की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देतीन लाखाच्या ठिबक सिंचन संचावर आकारला ६० हजार जीएसटी

हर्षल तोटे।आॅनलाईन लोकमतपवनार : बोंडअळीमुळे कपाशीवर नांगर फिरवून ऊस लागवड करण्याच्या मानसिकतेत असलेल्या शेतकऱ्यांना जीएसटीमुळे फटका बसत आहे. ऊस लागवड करायची असेल तर ठिबक सिंचनचा वापर करावा, असा शासन निर्णय आहे. भारनियमनामुळेही ऊसाकरिता ठिबक सिंचनाची सोय करणे क्रमप्राप्त ठरते; पण तीन लाखांच्या ठिबक संचावरही १८ टक्के जीएसटी लावल्याने संच घ्यायचा की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.ऊस हे जास्त पाणी घेणारे पीक आहे. वेळी-अवेळी भारनियमनाने होत असल्याने सर्व क्षेत्राला एकाच वेळी पाणी देणे शक्य होत नाही. शिवाय सरीने पाणी दिल्यास पाण्याचा अपव्यय होते. हे टाळण्यासाठी पवनार येथील विश्वेश्वर आंबटकर यांनी अडीच एकर क्षेत्रासाठी ठिबक सिंचन साहित्याचे अंदाजपत्रक घेतले. यात त्यांना ३ लाख ३६ हजार ५० रुपये २० पैसे साहित्याची किंमत आणि १८ टक्के जीएसटीचे ६० हजार ४०० रुपये २४ पैसे, असे एकूण ३ लाख ९६ हजार ५८६ रुपये ४४ पैसे कोटेशन देण्यात आले.ठिबक सिंचनाचा वापर वाढावा म्हणून शासन एकीकडे ४५ टक्के सबसीडी देते; पण दुसरीकडे जीएसटीच्या माध्यमातून १८ टक्के वसूलही करते. शेती करताना शेतकऱ्यांना अनेक अस्मानी व सुल्तानी संकटांना तोंड द्यावे लागते. कधी शेतकरी दुष्काळात होरपळला जातो तर कधी अतिवृष्टीचा सामना करावा लागतो. यासोबतच शेतकऱ्यांना खर्चाच्या तुलनेत उत्पादनावर आधारित भाव मिळत नसल्याने त्यांचे कंबरडेच मोडले आहे. शेतमालाचे भाव ठरविण्याचा अधिकार शासनाला आहे; पण विद्यमान परिस्थितीचा विचार न करता ते भाव ठरविले जातात. सोबतच साहित्यावर १८ टक्के जीएसटीचा अधिभार लावून त्याला संपविण्याचा खेळ तर शासन खेळत नाही ना, अशी शंका निर्माण होत आहे. शेतीपूरक साहित्यावरील जीएसटीमुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. हा अधिभार बंद करावा वा तो नाममात्र ठेवावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.मी ठिबक सिंचन संचाचे कोटेशन काढले. यात तीन लाखांवर ६० हजार रुपये जीएसटी लावला गेला. यामुळे ठिबक संच घ्यावा की नाही, असा प्रश्न पडला. योग्य भाव दिले जात नसताना कृषी साहित्यावर कर आकारला जातो, हे योग्य नाही. शासनाने ठिबक संचावरील जीएसटी रद्द वा नाममात्र करणे गरजेचे आहे.- विश्वेश्वर आंबटकर, शेतकरी, पवनार.

टॅग्स :GSTजीएसटी