शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

वर्धा शहराचा स्मार्ट सिटीत अंतर्भाव करावा

By admin | Updated: October 27, 2014 22:43 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पात स्मार्ट सिटी प्रकल्प राबवण्यिाबाबत नियोजन केले आहे. देशातील निवडक शहरांचा या योजनेंतर्गत समावेश करुन कायापालट करण्यात येणार आहे.

निवेदनातून शासनाला साकडे : सामाजिक संघटनांची मागणीवर्धा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पात स्मार्ट सिटी प्रकल्प राबवण्यिाबाबत नियोजन केले आहे. देशातील निवडक शहरांचा या योजनेंतर्गत समावेश करुन कायापालट करण्यात येणार आहे. या शहरांच्या यादीत वर्धा शहराचा समावेश करण्यात यावा. शहराचा स्मार्ट सिटीत समावेश केल्यास सर्वांगीण विकास होईल, अशी मागणी येथील विविध संघटनांनी प्रशासनाला निवेदनातून केली आहे. या निवेदनाची प्रत पंतप्रधान नरेंद्र मोदी, जिल्ह्याचे खासदार रामदास तडस, वर्धा विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. पंकज भोयर यांना देण्यात आली आहे. या निवेदनानुसार, वर्धा जिल्ह्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांचे वास्तव्य होते. देशात जिल्ह्याची ओळख गांधी जिल्हा म्हणून आहे. स्वातंत्र्य समरातील अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांचा येथील सेवाग्राम आश्रम साक्षी आहे. शिवाय जिल्ह्यात वनसंपदा आणि व्याघ्र प्रकल्प असल्याने येथे भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक आहे. मात्र येथील पर्यटन स्थळांचा अद्याप पुरेसा विकास झालेला नाही. शहराचा स्मार्ट सिटीत समावेश केल्यास जागतिक वारशाचे जतन करता येईल. भौगोलिकदृष्ट्या जिल्ह्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशभरात चारही दिशेला जाण्याकरिता येथून रेल्वेगाडी उपलब्ध आहे. शिवाय शहराच्या परिसरात असलेले शैक्षणिक संस्थाचे जाळे, अद्यावत रुग्णालय यामुळे येथे दुरवरुन लोक उपचार घ्यायला येतात. लगतच्या जिल्ह्याचे विद्यार्थी शिक्षणाकरिता येतात. नागपूरसह वर्धा शहराचा स्मार्ट सिटीत समावेशाची शिष्टमंडळाने मागणी केली.(स्थानिक प्रतिनिधी)