शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
2
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
3
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
5
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
6
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
7
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
8
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
9
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
10
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
11
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
12
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
13
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...
14
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक
15
Bhiwandi Crime: तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
16
सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेला शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% वधारला! दिला जातोय खरेदीचा सल्ला
17
Navi Mumbai Crime: इन्स्टाग्रावर ओळख, वाशीमध्ये भेटायला बोलावले; 16 वर्षाच्या मुलीवर कारमध्येच...
18
Kojagiri Purnima 2025:कोजागरी पौर्णिमेला चंद्र प्रकाश अंगावर घ्यावा असे म्हणतात; का ते माहितीय?
19
मुंबई-पुण्यात घरांच्या विक्रीत १७% घट; 'या' कारणांमुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; किमती कमी होणार का?
20
‘आयुष्मान भारत’ योजना बंद पडली? नागपूरच्या रुग्णालयांमध्ये उघडकीस आले धक्कादायक वास्तव; रुग्णांना सेवा नाकारल्या

वर्धा बाजार समितीत शेतकऱ्यांना पाच रुपयांत पोटभर जेवण

By admin | Updated: October 18, 2015 02:23 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत धान्य घेवून आलेल्या शेतकऱ्यावर मुक्कामाची वेळ आल्यास उपाशी पोटी झोपण्याशिवाय पर्याय नव्हता.

वर्धा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत धान्य घेवून आलेल्या शेतकऱ्यावर मुक्कामाची वेळ आल्यास उपाशी पोटी झोपण्याशिवाय पर्याय नव्हता. संचालक मंडळाने यावर तोडगा काढत मुक्कामी असलेल्या शेतकऱ्यांना पाच रुपयात पूर्ण जेवण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय संचालक मंडळाच्या शनिवारी झालेल्या सभेत घेण्यात आला आहे.वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीत रक्कम व जागा उपलब्ध असताना केवळ इच्छाशक्तीच्या अभावामुळे शेतकऱ्यांना असुविधेचा सामना करावा लागत होता. आता नव्याने आलेल्या संचालक मंडळाने बाजार समितीचाविकास करण्यासंदर्भात निर्णय घेणे सुरू केल्याचे दिसू आहे. शनिवारी समितीत उपाध्यक्ष पांडूरंग देशमुख यांच्या उपस्थितीत कापूस व धान्य व्यापारी, अडते तथा संचालक मंडळ यांची संयुक्त सभा घेण्यात आली. सदर संयुक्त सभेत समितीतर्फे जे शेतकरी समितीच्या यार्डवर धान्य व कापूस विक्रीस घेवून येईल त्या शेतकऱ्यांना ५ रुपयात पोटभर जेवण देण्याचा निर्णय घेण्यात आला. सदर निर्णय शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून घेतला असून मालविक्रीस रात्र झाल्यास झोपण्याची सुद्धा व्यवस्था करण्यात आल्याचे बाजार समितीकडून कळविण्यात आले आहे. समितीच्या सन २०१४-१५ च्या आमसभेत उपाध्यक्ष पांडूरंग देशमुख यांनी कास्तकारास स्वस्त भावात लवकरात लवकर जेवण देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी आपला संकल्प पूर्णत्वास नेला आहे. सदर योजनेस समितीचे सभापती शरद देशमुख आणि समितीचे सर्व सदस्य तसेच अडते व व्यापारी यांचे सहकार्य लाभत आहे. शेतकरी बंधूनी आपला कापूस व धान्य माल समितीच्या यार्डवर विक्रीस आणावा व या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपसभापती पांडूरग देशमुख यांनी या प्रसंगी केले.(प्रतिनिधी)