शहरं
Join us  
Trending Stories
1
मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, पण...; एकनाथ खडसेंची राजकारणातून निवृत्ती?
2
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
3
Exclusive: काँग्रेसचे शहजादे माओवाद्यांची भाषा बोलत आहेत; PM मोदींनी सांगितला NDA आणि इंडी आघाडीतला फरक
4
ना तेंडुलकर, ना जयसूर्या! वसीम अक्रमने सांगितला ९० च्या दशकातील सर्वोत्तम फलंदाज
5
अस्सी घाटावर पूजा, कालभैरवाचा आशीर्वाद...; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी PM मोदींचा वाराणसीत मेगा प्लॅन
6
"ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, राणेंना रोखण्याची..."; फडणवीसांचा गौप्यस्फोट
7
Ashok Gehlot : राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात...
8
"आम्ही या हंगामात...", पराभवानंतर Hardik Pandya भावूक, दिली प्रामाणिक कबुली
9
माधुरीचा साधेपणा! 'साजन'मधील ड्रेस परिधान करुन पोहोचली पुरस्कार सोहळ्याला; 33 वर्ष जुना video viral
10
राहुल गांधी पंतप्रधान मोदींसोबत चर्चेसाठी तयार, भाजपाने दिले प्रत्युत्तर; म्हणाले, ...
11
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
12
वीज आणि पिठाचे भाव गगनाला भिडले, PoK मध्ये संघर्ष; संतप्त जमाव रस्त्यावर, पोलिसाचा मृत्यू
13
Chandrashekhar Bawankule : "उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर..."; चंद्रशेखर बावनकुळे यांचं जाहीर आव्हान
14
तुम्ही औरंगजेबाचे फॅन आहात का?; संजय राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
15
'धारावी मॉडेल मी यशस्वी केलं, एसीमध्ये बसलेल्यांनी बोलू नये'; राहुल शेवाळेंची ठाकरेंवर टीका
16
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना शुभदायी, लाभाच्या संधी; थकीत येणी मिळतील, सौभाग्याचा काळ!
17
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
18
"बाबा लवकर गेला हे एकार्थी चांगलं झालं, कारण...", वडिलांविषयी असं का म्हणाली सखी गोखले?
19
ओला ईलेक्ट्रीक स्कूटरवर वीज कोसळली, रस्त्यावर मोठा खड्डा पडला, एकाचा मृत्यू, दोन गंभीर
20
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!

वारकऱ्यांना देव्हाऱ्यातच घ्यावे लागणार ‘माऊली’चे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 5:00 AM

वारकरी संप्रदायाचे हृदयस्थान असलेल्या विठ्ठलाच्या दर्शनाची दरवर्षी आषाढी एकादशीला चंद्रभागेच्या तीरावर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक येतात. ऊन्ह, वारा व पावसाची तमा न बाळगता शेकडो किलोमीटरचा पायदळ, सायकल किंवा वाहनाने प्रवास करुन पंढरपूर गाठतात. चंद्रभागेत स्नान करुन विठ्ू माऊलीचे ‘याची देही, याची डोळा’ दर्शन घेत नवी ऊर्जा घेवून परतात.

ठळक मुद्देपंढरपुरच्या वारीत खंड : जिल्ह्यातून जाणाऱ्या दिंड्या व वारी केल्या रद्द

विजय माहुरे।लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाच्या भेटीकरिता दरवर्षी आषाढी एकादशीला चंद्रभागेच्या तीरावर भक्तांचा मेळा जमतोय. गावागावातून विठ्ठल नामाचा गजर करीत दिंड्या-पताका, पायदळ वाऱ्या पंढरपुरला एकत्र येतात. या शतकानुशतकाच्या परंपरेला यावर्षी कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे खंड पडणार आहेत. सर्व दिंड्या व वारी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने वारकऱ्यांना यावर्षी आपल्या देव्हाऱ्यातीलच विठू माऊलीचे दर्शन घ्यावे लागणार आहे.वारकरी संप्रदायाचे हृदयस्थान असलेल्या विठ्ठलाच्या दर्शनाची दरवर्षी आषाढी एकादशीला चंद्रभागेच्या तीरावर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक येतात. ऊन्ह, वारा व पावसाची तमा न बाळगता शेकडो किलोमीटरचा पायदळ, सायकल किंवा वाहनाने प्रवास करुन पंढरपूर गाठतात. चंद्रभागेत स्नान करुन विठ्ू माऊलीचे ‘याची देही, याची डोळा’ दर्शन घेत नवी ऊर्जा घेवून परतात.याच दिवशी शेगाव येथून संत गजानन महाराजांची, आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, तर उत्तर भारतातून कबिराची पालखी तेथे येत असते. अशा या भव्यदिव्य सोहळ्यावर कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे पहिल्यांदाच विरजण पडले आहे. सर्वत्र कोरोनाचा हाहाकार असल्याने शासनाच्या सूचनांचे पालन करीत राज्यभरातील सर्व दिंड्या व वारी ही रद्द करण्यात आल्या. त्यात वर्धा जिल्ह्यातून जाणाऱ्या वारंकऱ्यांनीही आपला कार्यक्रम रद्द केला आहे. परिणामी यावर्षी आषाढी एकादशीला वारकऱ्यांच्या घरोघरीच विठू नामाचा गजर होणार आहे.विदर्भाच्या पंढरीतील वारकऱ्यांचे लॉकडाऊनविदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाºया घोराड येथून संत केजाजी महाराज व त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र नामदेव महाराज यांनी पंढरपुरची पायदळ वारी केली. सोबतच विठ्ठल भक्त असेलेले हरिभाऊ रामटेके यांनीही पायदळ वारी केली. दरम्यानच्या काळात पायदळ वारीत खंड पडला तरी घोराडसह पंचक्रोशितील भाविक वाहनांनी वारी करतात. २००४ मध्ये संत केजाजी महाराज यांच्याप्रती श्रद्धा असलेले यवतमाळ जिल्ह्यातील नरेश महाराज पाटील हे घोराडच्या विठ्ठल रुख्माई देवस्थानचे ट्रस्टी बबन महाराज माहूरे यांच्या नेतृत्वात घोराड ते आळंदी बस व रेल्वेचा प्रवास करुन तेथून निघणाऱ्या माऊलीच्या पालखी सोहळ्यात केजाजी महाराज दिंडी म्हणून सहभागी होतात. यामध्ये जवळपास १ हजार ५०० वारकऱ्यांची उपस्थिती असते. गेल्या पाच वर्षांपासून घोराड येथील हरिभाऊ महाकाळकर हे घोराड ते पंढरपूर पायदळ दिंडीचे आयोजन करतात पण, यावर्षी लॉकडाऊनमुळे या वारीमध्ये खंड पडणार आहे.वीस वर्षापासूनची पंरपरा खंडीतदेवळी तालुक्यातील गौळ येथील संत लोटांगण महाराज मंदिराच्यावतीने गेल्या वीस वर्षापासून आषाढी एकादशीला पालखी व दिंडी सोहळ्याचे आयोजन केले जाते. वर्ध्यातील आर्वीनाका परिसरातील ज्ञानेश्वर मंदिरातून निघणाºया दिंडी सोहळ्याला कोरोना आपत्तीमुळे यावर्षी रद्द करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष रामदास पवार यांनी दिली आहे.कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहे. वारीमध्ये मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांची गर्दी असते. आपण सुरक्षित राहून दुसऱ्यांना सुरक्षित ठेवण्यातच धन्यता आहे. त्यातही आषाढी एकादशीला विठू माऊलीचे मंदिर उघडे राहणार की नाही, धार्मिकस्थळे बंद असल्याने पालखी निघणार कशी, असे अनेक प्रश्न आहे. त्यामुळे आजची परिस्थिती पाहता शासनाला सहकार्य करणेच उचित ठरेल.- पुरुषोत्तम गुजरकर, वारकरी, घोराड.

टॅग्स :Pandharpurपंढरपूर