शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

वनविभागाच्या प्रयत्नाअंती वाघ एमपीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 23:41 IST

अमरावती जिल्ह्यात दोन शेतकरी व सुमारे एक डझन पाळीवप्राणी ठार करणाºया वाघाला मध्यप्रदेशाच्या जंगलात हाकलण्यात वन विभागाला यश आले आहे.

ठळक मुद्दे४५ वनकर्मचाऱ्यांचे परिश्रम : नागरिकांना सतर्कतेचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : अमरावती जिल्ह्यात दोन शेतकरी व सुमारे एक डझन पाळीवप्राणी ठार करणाºया वाघाला मध्यप्रदेशाच्या जंगलात हाकलण्यात वन विभागाला यश आले आहे. या वाघोबाकडून आष्टी तालुक्यात कुठेही मनुष्यावरील हल्ला टळावा यासाठी आष्टीचे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या. परिसरात वाघाची दहशत पसरली असून सीमावर्ती गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.वाघाचे तिवसा तालुक्यातील तळेगावला आगमन झाल्यावर आष्टी तालुक्याच्या सीमेवर वनविभागाने क्षेत्रसहाय्यक, वनरक्षक, वनमजूर यांच्यासह ४५ वनकर्मचारी तैनात केले होते. चिस्तुर, खडका, आनंदवाडी, भिष्णूर, भारसवाडा, खडकी, वाघोली, शिरसोली, किन्हाळा, चिंचोली, अंतोरा, खंबीत बेलोरा या वर्धा नदीच्या काठावरील १३ गावांंना सतर्कतेचा इशारा देत प्रतिबंधात्मक उपाययोजना येथे करण्यात आल्या. अमरावती जिल्ह्यातील चांदुर, तिवसा, मोर्शी, धामणगाव येथील वनपरिक्षेत्र अधिकाºयांनीही प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी पुढाकार घेतला होता. वर्धा जिल्ह्याची सीमा आष्टी तालुका असल्यामुळे वाघ आष्टी तालुक्यात शिरणार अशी शक्यता होती. त्यामुळे वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी यांनी उपाययोजना केल्या होत्या. पाच दिवस वाघाच्या लोकेशनचा अंदाज बांधत नागरिकांना मार्गदर्शनात्मक सुचना देण्यात आल्या. वाघाच्या पायाचे ठसे ओळखता यावे म्हणून काळी माती आणण्यात आली. मातीला ओले करून त्याचे सारवण करण्यात आले. अशा रितीने १५ ठिकाणी लोकेशन ठेवण्यात आले होते. वाघासाठी शिकार खाद्य म्हणून ४ बोकड बांधून ठेवले होते. काही ठिकाणी जाळ्या जावण्यात आल्या होत्या. वाघाच्या दहशतीमुळे परिसरातील शेतकरी व शेतमजुरांच्या अडचणीत भर पडली होती. आता तो मध्यप्रदेशातील जंगलात गेल्याने नागरिक दहशतमुक्त झाले असल्याचे बोलले जात आहे.आष्टी तालुक्यात वाघाला येण्यास प्रतिबंध करण्यासाठी वनपरिक्षत्रे अधिकारी अमोल चौधरी व त्यांच्या चमूने पाचदिवस अथक परिश्रम घेतले. त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे.सुनील शर्मा, उपवनसरंक्षक, वर्धा.

टॅग्स :Tigerवाघ