शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
2
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
3
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
4
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
5
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
6
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
7
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
8
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
9
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
10
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
11
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
12
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
13
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
14
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
15
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
16
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
17
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
18
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
19
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
20
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले

वाळूघाटबंदीने तीनच दिवस मिळते काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 23:07 IST

लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी राजकीय पक्ष गेल्या पाच वर्षांत शेकडो लोकांना रोजगार उपलब्ध झाल्याचा दावा करीत आहे. तर विरोधक नोटबंदीमुळे रोजगार हिरावला, लहान धंदे बंद पडले, असा दावा करीत आहेत. या दाव्या-प्रतिदाव्याच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने सोमवारी वर्ध्याच्या सोशालिस्ट चौकात रोजगारासंदर्भात आढावा घेतला.

ठळक मुद्देसोशालिस्ट चौकात घेतला लोकमतने रोजगाराचा आढावाबांधकाम मजुरांना बसला जोरदार तडाखा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी राजकीय पक्ष गेल्या पाच वर्षांत शेकडो लोकांना रोजगार उपलब्ध झाल्याचा दावा करीत आहे. तर विरोधक नोटबंदीमुळे रोजगार हिरावला, लहान धंदे बंद पडले, असा दावा करीत आहेत. या दाव्या-प्रतिदाव्याच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने सोमवारी वर्ध्याच्या सोशालिस्ट चौकात रोजगारासंदर्भात आढावा घेतला. यावेळी या ठिकाणी उपस्थित बांधकाम क्षेत्रात कामावर जाणाऱ्या मजुरांनी आपली व्यथाच ‘लोकमत’समोर मांडलीमोदी सरकारच्या काळात करण्यात आलेल्या नोटबंदीने रिअल इस्टेटचा व्यवसाय संपूर्णपणे थंडावला. त्यानंतर मागील एक वर्षापासून वर्धा जिल्ह्यात वाळूघाट बंद राहिल्याने आमच्या जीवन मरणाचा प्रश्नच निर्माण झाला. सात दिवसांपैकी तीनच दिवस कसेबसे काम मिळते. सोशालिस्ट चौकातील ठिय्यावर दररोज आम्ही ५०० जण जमतो. यातील ५० लोकांना काम मिळते. दयालनगरात छत्तीसगडी मजुरांचा ठिय्या आहे. तेथेही हीच परिस्थिती आहे. वाळूघाटावर बंदी, त्यातच आता पाणीटंचाई यामुळे आमच्या रोजीरोटीचाच प्रश्न निर्माण झाला आहे.भाड्याचे घर करून आम्ही खेड्यातून शहरात राहायला आलो. घराचा किराया देण्याचेही पैसे आम्हाला मिळत नाही, अशी आमची परिस्थिती आहे, सांगा जगायचं कसं? असा सवालही या मजुरांनी राजकीय पक्षांना केला आहे. रोजगाराचे दावे केले जातात, आमचे नावही नोंदविल्या गेले. परंतु, आम्हाला काही पैसे अदले मिळाले नाही, अशी माहिती अनिल मेंढे, सुनील सुरपाम, सुरेश मून, सुभाष सुरपाम, मनीष चौहान, मनीष दाते, शेख बुरहान, बबन ठाकरे, चंद्रशेखर उईके यांनी दिली.कामगार क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणतात.....असंघटित कामगार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहेत. सोशालिस्ट चौकात दररोज ते उभे राहतात. बांधकामाच्या क्षेत्रातील इतर वस्तूंचे भाव (सिमेंट, लोहा, गिट्टी, रेती) भाव वाढले तर नागरिक ते सहजपणे खरेदी करतात. मात्र, मजुरांची रोजी देण्यास तयार होत नाही. आजही मजुरांना जुनीच रोजी दिली जाते. ३५० रूपये रोज देताना नागरिक का-कू करतात. इतर वस्तूंबाबत मात्र ते असे करीत नाही.- यशवंत झाडे, कामगार नेते (माकप), वर्धा.असंघटित कामगारांसाठी आरोग्य, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मदतीच्या विविध योजना आहेत. नैसर्गिक मृत्यू झाल्यास दोन लाख, तर अपघाती मृत्यूस पाच लाखांची मदत केली जाते. तसेच विवाहासाठीही मदत मिळते.- राजदीप धुर्वे, जिल्हा कामगार अधिकारी, वर्धा.