शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
4
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
5
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
6
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
7
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
8
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
9
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
10
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान
11
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
12
पाकिस्ताने भारतातील १५ ठिकाणी क्षेपणास्त्रे डागली; एस-४०० 'सुदर्शन चक्र'ने हवेतच केली उद्ध्वस्त
13
Operation Sindoor: पाकिस्तानसोबतच चीनलाही दणका! भारतानं उद्ध्वस्त केलेली लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम काय आहे?
14
'आम्ही तुमच्यासोबत आहोत', ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा
15
फिरोझ खान यांनी पाकिस्तानात जाऊन केलं होतं भारताचं कौतुक, मुशर्रफ भडकले आणि घातली प्रवेश बंदी!
16
जालना: घरासमोर खेळणाऱ्या सात वर्षाच्या मुलीचे श्वानांनी तोडले लचके, हल्ल्यात मुलीचा मृत्यू
17
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”
18
Raigad Accident: रायगडमध्ये भीषण अपघात! डंपर आणि एसटीच्या धडकेत चौघांचा मृत्यू, २० जण गंभीर जखमी
19
आधी सिंदूर आता आणणार पूर! भारताने उघडले बगलिहारचे दरवाजे, पाकिस्तानात पाणीच पाणी
20
"डॉक्टरांच्या चुकीमुळे गर्भपात झाला", प्रसिद्ध अभिनेत्रीची दुःखद कहाणी, म्हणाली- "तिसऱ्या महिन्यातच मला..."

खचलेल्या विहिरींना दुरूस्तीची प्रतीक्षा कायमच

By admin | Updated: December 4, 2014 23:13 IST

गतवर्षी अतिवृष्टीमुळे तालुक्यातील अनेक गावातील विहिरी खचल्या. त्या दुरूस्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला. याकरिता एका विहिरीमागे दीड लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.

विजय माहुरे - घोराडगतवर्षी अतिवृष्टीमुळे तालुक्यातील अनेक गावातील विहिरी खचल्या. त्या दुरूस्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला. याकरिता एका विहिरीमागे दीड लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. या विहिरी दुरूस्त करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर आहे. असे असताना तालुक्यातच नव्हे संपूर्ण जिल्ह्यात या दृष्टीने कामे होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. एका सेलू तालुक्यात जवळपास ८६ लाभार्थी विहीर दुरूस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. मुदत संपत असल्याने त्यांच्या विहिरीची दुरूस्ती होईल अथवा नाही, असा प्रश्न त्यांना आता भेडसावत आहे. २०१३ मध्ये जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. यात शेतातील अनेक विहिरी खचल्या. त्यांच्या पुरात आलेला गाळही साचला. यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्या निर्माण झाल्या. अतिवृष्टीमुळे खचलेल्या व गाळांनी भरलेल्या विहिरींची दुरूस्ती करण्यासाठी शासनाने २३ मे २०१४ रोजी शासन निर्णय निर्गमित केला. या निर्णयानुसार कृषी विभाग व महसूल विभागाला सर्वेक्षण करून तसे पंचनामे करण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार कृषी सहाय्यक व तलाठी यांनी संयुक्त पंचनामा करून लाभार्थ्यांची यादी तयार केली अन् संबंधीत विभागाला ती सादरही केली. ही योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राबविली जाणार असून यात १ लाख ५० हजार रुपयांपर्यंतची मदत मिळणार आहे.ही कामे ग्रामपंचायत व गटस्तरावर करण्यात येणार असून अनुदानाचे विभागाजन ६० व ४० असे करण्यात आले आहे. यात मजुरी व साहित्यावर खर्च होणार आहे. सध्या ही यादी जिल्हा परिषद स्तरावर असल्याचे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक मग्रारो-२०१४ प्र.क्र.२५/ मग्रारो-१ दि. २३ मे २०१४ च्या निर्णयानुसार खचलेल्या विहिरींच्या दुरूस्तीची कामे ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत पूर्ण करणे बंधनकारक केले आहे. पण ही मुदत संपण्यास अवघे काही दिवस उरले आहे. अजूनही शासकीय स्तरावर या विहिरीच्या दुरूस्तीच्या कोणत्याही हालचाली सुरू नाही. यामुळे पात्र लाभार्थ्यांच्या विहिरीची दुरूस्ती कशी होणार, याकडे आता लक्ष लागले आहे. मुदतीनंतर दुरूस्ती होणार की नाही, असा नवा प्रश्नही पात्र शेतकऱ्यांपुढे आहे. याकडे संबंधीत विभागाने लक्ष देवून विहिरींची दुरूस्ती करण्याची मागणी आहे.