शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

तोडलेला बंधारा दीड वर्र्षांपासून दुरूस्तीच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: June 10, 2016 02:17 IST

वायगाव ते सोनेगाव (बाई) मार्गावर भदाडी नदीवर काही वर्षांपूर्वी बंधारा बांधण्यात आला होता. हा बंधारा या भागातील एका धनिक...

कार्यवाही शून्य : स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांचेही दुर्लक्षवायगाव (नि.) : वायगाव ते सोनेगाव (बाई) मार्गावर भदाडी नदीवर काही वर्षांपूर्वी बंधारा बांधण्यात आला होता. हा बंधारा या भागातील एका धनिक शेतकऱ्याने एक ते दीड वर्षापूर्वी तोडला; पण लोकप्रतिनिधींनी त्या धनाढ्य शेतकऱ्यावर कुठलीही कार्यवाही केली नाही. शिवाय त्या बंधाऱ्याची साधी डागडुजीही करण्यात आली नाही. संबंधित अधिकारीही याकडे दुर्लक्ष करीत असल्याने तुटलेल्या बंधाऱ्याला दीड वर्षांपासून दुरूस्तीची प्रतीक्षा कायम आहे.बंधारा तोडल्या प्रकरणी त्या धनिक शेतकऱ्यावर कार्यवाही का केली नाही, हे एक कोडेच आहे. सदर शेतकऱ्याने एक-दोन वर्षांपूर्वीच शेत विकत घेतल्याची चर्चा आहे. या बंधाऱ्यामुळे त्याच्या शेतात पाणी जाण्याची भीती असल्याने त्याने तो तोडल्याची माहिती आहे. बंधारा तुटल्याने येथील शेतकऱ्यांच्या ओलिताची समस्या निर्माण झाली आहे. गत एक ते दीड वर्षापासून कुठलीही कार्यवाही न झाल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देत कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.वायगाव ते सोनेगाव मार्गावरील भदाडी नदीवर भूजल विभागाने २००५-०६ च्या सुमारास सिमेंटचा पक्का बंधारा बांधला होता. या बंधाऱ्यामुळे ग्रा.पं. नळयोजनेच्या विहिरीला पाणी वाढले होते. सोबतच शेतातील विहिरीची पातळी वाढण्यास मदत झाली होती. या भागातील शेतकऱ्यांना ओलिताचीही सोय झाली होती. हा बंधारा बांधल्यानंतर तो ग्रा.पं. कडे हस्तांतरीत करण्यात आला. शासन पाणी अडवा पाणी जिरवा, जलयुक्त शिवारावर कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे; पण एक शेतकरी कुठलीही परवानगी न घेता बंधारा फोडतो, त्याच्यावर एक-दीड वर्षे होऊनही कार्यवाही होत नाही, हे आश्चर्यच म्हणावे लागेल. ‘लोकमत’ ने वृत्त प्रकाशित करताच घटनास्थळावर अधिकारी, स्थानिक प्रतिनिधी पोहोचले होते; पण कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही. साधी डागडुजीही करण्यात आली नाही. वायगाव येथील ग्रामपंचायतीसह सर्व लोकप्रतिनिधी भारतीय जनता पार्टीचे आहेत. याच पक्षामार्फत जलयुक्त शिवार योजना जोमाने सुरू आहे; पण तोडलेला बंधारा दुरूस्त केला जात नसल्याने शेतकऱ्यांत असंतोष पसरला आहे. हा बंधारा दुरूस्त करावा, अशी मागणी अनेकदा येथील शेतकऱ्यांनी वायगाव ग्रा.पं. कडे केली; पण तो बंधारा ग्रा.पं. कडे नसल्याचेच सांगितले जात आहे. भूजल विभागाला विचारणा केली असता ग्रा.पं. ला हस्तांतरीत केल्याचे सांगण्यात येते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)