शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

पाच वर्षांपासून वीज जोडणीची प्रतीक्षा

By admin | Updated: September 11, 2015 02:31 IST

सेवाग्राम येथे ३० जानेवारी २०१५ रोजी जिल्हा नियोजन व विकास समितीच्या पहिल्या सभेत ४ हजार ८०० शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची वीज जोडणी त्वरित देण्यात येईल,...

घोषणेनंतरही बदल नाही : समता परिषदेने करून दिले स्मरणवर्धा : सेवाग्राम येथे ३० जानेवारी २०१५ रोजी जिल्हा नियोजन व विकास समितीच्या पहिल्या सभेत ४ हजार ८०० शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची वीज जोडणी त्वरित देण्यात येईल, अशी घोषण केली होती; पण आठ महिने उलटले असतानाही जोडणी मिळाली नाही. आठ महिन्यांतही बदल न झाल्याने वीज जोडणी मिळणार की नाही, असा सवाल महात्मा फुले समता परिषदेने केला आहे. याबाबत जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांना निवेदनही देण्यात आले. शासनाने या पाच हजार शेतकऱ्यांच्या वीज जोडणीसाठी संपूर्ण सुमारे ४० कोटी रुपयांचा निधी वीज वितरण कंपनीकडे चार वर्षांपासून दिला आहे; पण शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळत नाही. शेतकरी विहिरींच्या कर्ज व व्याजाचा भुर्दंड भरताना बेजार झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्वरित वीज जोडणी देण्यासाठी जिल्हा नियोजन व विकास समितीच्या सभेत निर्देश देत नियोजनपूर्वक कार्यवाही करावी, अशी मागणी समता परिषदेने केली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन देण्यात आले. सद्यस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशी मागणीही परिषदेने केली आहे.जिह्यातील पाच हजार शेतकऱ्यांनी कर्ज काढून विहिरी बांधल्या. वीज वितरण कंपनीकडे रितसर अर्ज करून पाच वर्षापासून वीज जोडणी मिळावी म्हणून अनामत रक्कमही भरले. शासनानेही या शेतकऱ्यांना वीज मिळावी, शेतात खांब, वीज तार व ट्रान्सफार्मर या संपूर्ण खर्चासाठी ४० कोटी रुपयांची तरतूद करीत वीज कंपनीला निधी दिला; पण कंपनीच्या गलथान कारभारामुळे अद्याप शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळाली नाही. चार लाखांच्या कर्जापायी आत्महत्या केल्यावरच शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळणार काय, असा सवालही समता परिषदेने केला आहे.(कार्यालय प्रतिनिधी)