शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
2
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
3
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
4
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
5
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
6
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
7
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
8
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
9
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
10
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
11
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
12
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
13
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
14
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
15
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
16
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
17
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
18
नालासोपारा हादरलं! प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या; मृतदेह घरातच पुरला अन् वर...
19
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
20
केरळचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ माकप नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचं निधन, वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पाच वर्षांपासून वीज जोडणीची प्रतीक्षा

By admin | Updated: September 11, 2015 02:31 IST

सेवाग्राम येथे ३० जानेवारी २०१५ रोजी जिल्हा नियोजन व विकास समितीच्या पहिल्या सभेत ४ हजार ८०० शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची वीज जोडणी त्वरित देण्यात येईल,...

घोषणेनंतरही बदल नाही : समता परिषदेने करून दिले स्मरणवर्धा : सेवाग्राम येथे ३० जानेवारी २०१५ रोजी जिल्हा नियोजन व विकास समितीच्या पहिल्या सभेत ४ हजार ८०० शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची वीज जोडणी त्वरित देण्यात येईल, अशी घोषण केली होती; पण आठ महिने उलटले असतानाही जोडणी मिळाली नाही. आठ महिन्यांतही बदल न झाल्याने वीज जोडणी मिळणार की नाही, असा सवाल महात्मा फुले समता परिषदेने केला आहे. याबाबत जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांना निवेदनही देण्यात आले. शासनाने या पाच हजार शेतकऱ्यांच्या वीज जोडणीसाठी संपूर्ण सुमारे ४० कोटी रुपयांचा निधी वीज वितरण कंपनीकडे चार वर्षांपासून दिला आहे; पण शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळत नाही. शेतकरी विहिरींच्या कर्ज व व्याजाचा भुर्दंड भरताना बेजार झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्वरित वीज जोडणी देण्यासाठी जिल्हा नियोजन व विकास समितीच्या सभेत निर्देश देत नियोजनपूर्वक कार्यवाही करावी, अशी मागणी समता परिषदेने केली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन देण्यात आले. सद्यस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशी मागणीही परिषदेने केली आहे.जिह्यातील पाच हजार शेतकऱ्यांनी कर्ज काढून विहिरी बांधल्या. वीज वितरण कंपनीकडे रितसर अर्ज करून पाच वर्षापासून वीज जोडणी मिळावी म्हणून अनामत रक्कमही भरले. शासनानेही या शेतकऱ्यांना वीज मिळावी, शेतात खांब, वीज तार व ट्रान्सफार्मर या संपूर्ण खर्चासाठी ४० कोटी रुपयांची तरतूद करीत वीज कंपनीला निधी दिला; पण कंपनीच्या गलथान कारभारामुळे अद्याप शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळाली नाही. चार लाखांच्या कर्जापायी आत्महत्या केल्यावरच शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळणार काय, असा सवालही समता परिषदेने केला आहे.(कार्यालय प्रतिनिधी)