शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

झोपडपट्टीवासी स्थायी पट्ट्याच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: January 5, 2015 23:08 IST

जिल्ह्यातील हजारो कुटुंब स्वत:ची जागा नसल्यामुळे सरकारी जागेवर अतिक्रमण करून २५ ते ३० वर्षांपासून वास्तव्यास आहेत. ती जागा त्यांच्या मालकीची नसल्याने त्यांना घरकुल योजनेचा

वर्धा : जिल्ह्यातील हजारो कुटुंब स्वत:ची जागा नसल्यामुळे सरकारी जागेवर अतिक्रमण करून २५ ते ३० वर्षांपासून वास्तव्यास आहेत. ती जागा त्यांच्या मालकीची नसल्याने त्यांना घरकुल योजनेचा लाभ घेता येत नाही. शासकीय योजनेचा लाभ घेण्याकरिता स्थायी पट्टे देण्यात यावे, अशी मागणी सेवाग्राम येथील झोपडपट्टी वासीयांनी सोमवारी निर्दर्शने करीत जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. अतिक्रमण करून वास्तव्यास असलेले हे नागरिक दारिद्रय रेषेखालील असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यांना स्वत:ची जागा नाही. त्यांना राहत्या जागेचे पट्टे नसल्यामुळे शासकीय घरकुलाचा लाभ मिळत नाही. स्वत:चे घर चांगले बांधु शकत नाही. शासकीय अद्यादेशात १९९४ ते २००० पर्यंत अतिक्रमण करून राहणाऱ्यांना स्थायी पट्टे द्यावे, असे उल्लेखित आहे. वारंवार आंदोलन करून जिल्हाधिकारी यांना मागणी करूनही पट्टे देण्यात आले नाही. स्थायी पट्ट्यांकरिता अनेकांनी शासनाचा दंड सुद्धा भरलेला आहे. यामध्ये कानगाव, गाडेगाव, चानकी, रोनखेडा, वडर झोपडपट्टी येथील नागरिकांचा समावेश आहे. दंड भरणाऱ्यांना वेळेवर पट्टे दिले नाही तर आरपीआयच्यावतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी जिल्हा अध्यक्ष विजय आगलावे यांनी निवेदन सादर करताना दिला. सेवाग्राम मेडिकल चौकात सरकारी जागेवर अनेक दुकानदारांनी दुकाने लावून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित आहे. त्यांनी सुद्धा सरकारी जागा लिजवर देण्यात यावी, असे निवेदन सादर करण्यात आले. या आंदोलनात अजय मेहरा, प्रकाश पाटील, सुरेंद्र पुनवटकर, मोहन वनकर, संजय वर्मा, देवानंद तेलतुमडे, विनोद वानखेडे, देविदास भगत, संजय गवई, राजु वैद्य यांच्यासह आरपीआचे कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)