शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
3
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
4
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
5
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
6
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
7
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
8
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
9
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
10
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
11
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
12
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
13
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
14
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
15
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
16
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
17
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
18
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
19
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
20
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

झोपडपट्टीवासी स्थायी पट्ट्याच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: January 5, 2015 23:08 IST

जिल्ह्यातील हजारो कुटुंब स्वत:ची जागा नसल्यामुळे सरकारी जागेवर अतिक्रमण करून २५ ते ३० वर्षांपासून वास्तव्यास आहेत. ती जागा त्यांच्या मालकीची नसल्याने त्यांना घरकुल योजनेचा

वर्धा : जिल्ह्यातील हजारो कुटुंब स्वत:ची जागा नसल्यामुळे सरकारी जागेवर अतिक्रमण करून २५ ते ३० वर्षांपासून वास्तव्यास आहेत. ती जागा त्यांच्या मालकीची नसल्याने त्यांना घरकुल योजनेचा लाभ घेता येत नाही. शासकीय योजनेचा लाभ घेण्याकरिता स्थायी पट्टे देण्यात यावे, अशी मागणी सेवाग्राम येथील झोपडपट्टी वासीयांनी सोमवारी निर्दर्शने करीत जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. अतिक्रमण करून वास्तव्यास असलेले हे नागरिक दारिद्रय रेषेखालील असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यांना स्वत:ची जागा नाही. त्यांना राहत्या जागेचे पट्टे नसल्यामुळे शासकीय घरकुलाचा लाभ मिळत नाही. स्वत:चे घर चांगले बांधु शकत नाही. शासकीय अद्यादेशात १९९४ ते २००० पर्यंत अतिक्रमण करून राहणाऱ्यांना स्थायी पट्टे द्यावे, असे उल्लेखित आहे. वारंवार आंदोलन करून जिल्हाधिकारी यांना मागणी करूनही पट्टे देण्यात आले नाही. स्थायी पट्ट्यांकरिता अनेकांनी शासनाचा दंड सुद्धा भरलेला आहे. यामध्ये कानगाव, गाडेगाव, चानकी, रोनखेडा, वडर झोपडपट्टी येथील नागरिकांचा समावेश आहे. दंड भरणाऱ्यांना वेळेवर पट्टे दिले नाही तर आरपीआयच्यावतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी जिल्हा अध्यक्ष विजय आगलावे यांनी निवेदन सादर करताना दिला. सेवाग्राम मेडिकल चौकात सरकारी जागेवर अनेक दुकानदारांनी दुकाने लावून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित आहे. त्यांनी सुद्धा सरकारी जागा लिजवर देण्यात यावी, असे निवेदन सादर करण्यात आले. या आंदोलनात अजय मेहरा, प्रकाश पाटील, सुरेंद्र पुनवटकर, मोहन वनकर, संजय वर्मा, देवानंद तेलतुमडे, विनोद वानखेडे, देविदास भगत, संजय गवई, राजु वैद्य यांच्यासह आरपीआचे कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)