शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

झोपडपट्टीवासी स्थायी पट्ट्याच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: January 5, 2015 23:08 IST

जिल्ह्यातील हजारो कुटुंब स्वत:ची जागा नसल्यामुळे सरकारी जागेवर अतिक्रमण करून २५ ते ३० वर्षांपासून वास्तव्यास आहेत. ती जागा त्यांच्या मालकीची नसल्याने त्यांना घरकुल योजनेचा

वर्धा : जिल्ह्यातील हजारो कुटुंब स्वत:ची जागा नसल्यामुळे सरकारी जागेवर अतिक्रमण करून २५ ते ३० वर्षांपासून वास्तव्यास आहेत. ती जागा त्यांच्या मालकीची नसल्याने त्यांना घरकुल योजनेचा लाभ घेता येत नाही. शासकीय योजनेचा लाभ घेण्याकरिता स्थायी पट्टे देण्यात यावे, अशी मागणी सेवाग्राम येथील झोपडपट्टी वासीयांनी सोमवारी निर्दर्शने करीत जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. अतिक्रमण करून वास्तव्यास असलेले हे नागरिक दारिद्रय रेषेखालील असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यांना स्वत:ची जागा नाही. त्यांना राहत्या जागेचे पट्टे नसल्यामुळे शासकीय घरकुलाचा लाभ मिळत नाही. स्वत:चे घर चांगले बांधु शकत नाही. शासकीय अद्यादेशात १९९४ ते २००० पर्यंत अतिक्रमण करून राहणाऱ्यांना स्थायी पट्टे द्यावे, असे उल्लेखित आहे. वारंवार आंदोलन करून जिल्हाधिकारी यांना मागणी करूनही पट्टे देण्यात आले नाही. स्थायी पट्ट्यांकरिता अनेकांनी शासनाचा दंड सुद्धा भरलेला आहे. यामध्ये कानगाव, गाडेगाव, चानकी, रोनखेडा, वडर झोपडपट्टी येथील नागरिकांचा समावेश आहे. दंड भरणाऱ्यांना वेळेवर पट्टे दिले नाही तर आरपीआयच्यावतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी जिल्हा अध्यक्ष विजय आगलावे यांनी निवेदन सादर करताना दिला. सेवाग्राम मेडिकल चौकात सरकारी जागेवर अनेक दुकानदारांनी दुकाने लावून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित आहे. त्यांनी सुद्धा सरकारी जागा लिजवर देण्यात यावी, असे निवेदन सादर करण्यात आले. या आंदोलनात अजय मेहरा, प्रकाश पाटील, सुरेंद्र पुनवटकर, मोहन वनकर, संजय वर्मा, देवानंद तेलतुमडे, विनोद वानखेडे, देविदास भगत, संजय गवई, राजु वैद्य यांच्यासह आरपीआचे कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)