शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींना कायमस्वरुपी पट्टे देण्याची प्रतीक्षा

By admin | Updated: May 15, 2015 01:56 IST

आदिवासी बांधवांना जमिनीचे कायमस्वरुपी पट्टे देण्यात यावे याबाबत शासनाने वेळोवेळी आदेश पारीत केले.

वर्धा : आदिवासी बांधवांना जमिनीचे कायमस्वरुपी पट्टे देण्यात यावे याबाबत शासनाने वेळोवेळी आदेश पारीत केले. जिल्हा प्रशासनाला याबाबतचा आदेश प्राप्त होऊनही जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना अद्याप पट्टे मिळण्यास विलंब होत आहे. अतिक्रमित जमिनीचे पट्टे मिळविण्यासाठी आदिवासी बांधव कार्यालयात चकरा मारत असले तरी कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून टोलवाटोलवीचे उत्तर देण्यात येत असल्याने त्रस्त झालेल्या आदिवासींना न्याय देण्याची मागणी करण्यात आली. याबाबत बिरसा मुंडा आदिवासी अधिकार व शिक्षा परिषदच्यावतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले. या निवेदनाची प्रत आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अम्ब्रीश यांना देण्यात आली असून न्यायाची मागणी करण्यात आली.आदिवासी वनहक्क कायद्यानुसार मौजा जुनापाणी, सर्व्हे नं. ६२/२ व १, भोगवटदार-२ निम्न कालवा विभाग येथील परिसरात २० वर्षांपासून आदिवासी वसाहतीत आहे. यातील अनेकजण रोजमजुरी करुन उदरनिर्वाह करतात. मात्र स्थायी नागरिकत्व नसल्यामुळे येथील आदिवासी बांधवांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळत नाही. याकरिता येथील नागरिकांना वनहक्क कायद्यानुसार जमिनीचे पट्टे देण्याची मागणी आहे. याबाबत आदेश पारीत केला तरी याची अंमलबजावणी केली नसल्याने आदिवासींना योजनांच्या लाभापासून वंचित रहावे लागते. या मागणीचा पाठपुरावा करण्यात आला. मात्र अद्याप आदिवासी बांधव न्यायापासून वंचित आहे. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी बिरसा मुंंडा आदिवासी अधिकार परिषद यांच्यावतीने निवेदन सादर करण्यात आले. यावेळी निवेदनातून न्यायाची मागणी केली. यावेळी परिषदेचे पदाधिकारी व आदिवासी बांधव उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)