शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

एका परिपूर्ण उद्यानाची प्रतीक्षा संपली

By admin | Updated: March 20, 2017 00:47 IST

हरीत वर्धा या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन स्थानिक नगर परिषदेच्यावतीने येथील महावीर उद्यानाचा कायापालट करण्यात आला आहे.

आजी-माजी खासदारांच्या उपस्थितीत नागरिकांसाठी महावीर उद्यान झाले खुले वर्धा : हरीत वर्धा या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन स्थानिक नगर परिषदेच्यावतीने येथील महावीर उद्यानाचा कायापालट करण्यात आला आहे. शनिवारी पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात आजी-माजी खासदारांच्या उपस्थितीत हे उद्यान लोकांसाठी खुले करण्यात आले. व्यासपीठावर खा. रामदास तडस, माजी खासदार दत्ता मेघे, नगराध्यक्ष अतुल तराळे, उपाध्यक्ष प्रदीपसिंह ठाकूर, न. प. मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे, रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय मगर, पालिकेच्या शिक्षण सभापती श्रेया देशमुख, पाणी पुरवठा सभापती सुमित्रा कोपरे, नगर सेविका शुभांगी कोलते, रंजना पट्टेवार, वंदना भुते यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. मार्गदर्शन करताना खा. तडस यांनी केंद्र व राज्य सरकार शहराच्या सौंदर्यीकरणासाठी कटीबद्ध आहे. वर्धा शहराला कोणत्याही परिस्थित निधी कमी पडू देणार नाही. शहरात आणखी अश्याच प्रकारे उद्यानाची निर्मिती करण्यात येईल आणि त्यासाठी आवश्यक ते प्रयत्नही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. महावीर उद्यानाचा विकास म्हणजे वर्धा नगर परिषदेचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. गत २५ वर्षांपासून आम्ही याचा पाठपुरावा करीत होतो. आज या उद्यानाचा नवीन चेहरा वर्धा शहरातील नागरिकांना अर्पण करण्यात येत आहे, असे नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी सांगितले. जनहित मंचाने महावीर उद्यानाच्या विकासासाठी भरपूर परिश्रम घेतल्याबद्दल त्यांनी जनहित मंचाचे आभार व्यक्त केले. महावीर उद्यानाचाच विकास करुन ते वर्धा नगरीला अर्पण करणे हे आमचे ध्येय होते. ते आज या ठिकाणी आम्ही साध्य केले आहे. असाच विकास शहरातील अनेक उद्यानाचा करायचा आहे. तेही आम्ही करणार असल्याचे यावेळी न. प. उपाध्यक्ष प्रदीपसिंह ठाकुर यांनी सांगितले. न.प.अंतर्गत हरित वर्धा साकारण्यासाठी नगर परिषदेने टाकलेलं हे एक पाऊल आहे. शहराच्या विकासासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन न.प. मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांनी केले. यावेळी माजी खासदार दत्ता मेघे यांनीही मार्गदर्शन केले. श्यााम टिबडा आणि अतुल टिबडा यांच्या परिश्रमातून साकरलेल्या या उद्यानात अ‍ॅम्युजमेंट पार्क, फूड झोन, फन झोन, विशाल इंद्रधनुषीय पाण्याचा कारंजा, मुलांसाठी फ्री प्ले-झोन, पिण्याचे थंड पाणी, शौचालय इत्यादी सोयी सुविधा आहेत. त्याच बरोबर बुल राईड, भूत बंगला, ७ डी अ‍ॅडव्हेंचर राईड, जम्पर, एटीव्ही बाईक राईड, मिनी बोटिंग, सेगवे राईड, मिनी फेरीस व्हील, गेम झोन या आणि इतर अनेक मजेदार व करमणूक प्रदान व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वर्धा न.प.च्या मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन उत्तम हापसे यांनी केले तर आभार लिखिता ठाकरे यांनी मानले. कार्यक्रमाला वर्धा नगर परिषदेचे सर्व नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते. वर्धा शहरातील महावीर उद्यानाचा चेहरामोहरा बदलल्याने वर्धेतील निसर्ग प्रेमींची एका परिपूर्ण उद्यानाची प्रतीक्षा थांबली आहे.(शहर प्रतिनिधी)