शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना वेतन वाढीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 15:04 IST

२००० पासून सुरू झालेल्या शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत अन्न शिजविण्यासाठी कार्यरत महिलांना केवळ १ हजार ५०० रुपये मानधन मिळते.

ठळक मुद्देवीस वर्षांपासून तुटपुंज्या मानधनावर गुजराण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : केंद्र सरकार व राज्य सरकारच्या वतीने संयुक्तरीत्या राबविण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहार योजनेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना केवळ १ हजार ५०० रुपये मानधन दिले जात आहे. गेल्या वीस वर्षांपासून त्यांच्या मानधनामध्ये वाढ झाली नसल्याने या तुटपुंजा मानधनावरच त्यांची गुजराण सुरू आहे. त्यामुळे शासनाने या महागाईच्या काळात त्यांच्या मानधन वाढीबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी होत आहे.

२००० पासून सुरू झालेल्या शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत अन्न शिजविण्यासाठी कार्यरत महिलांना केवळ १ हजार ५०० रुपये मानधन मिळते. २० वर्षांच्या काळात सर्वच वस्तूंचे भाव वधारले आहेत. त्यामुळे १ हजार ५०० रुपयांमध्ये कुटुंबाचा गाडा चालविणे अशक्य झाले आहे. अन्न शिजविण्यामागे शाळेत पाणी भरणे, खोल्या स्वच्छ करणे, भांडी घासणे ही सर्व कामे करावी लागत असल्याने सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजतापर्यंतचा वेळ जातो. परिणामी, त्यांना दुसरी मजुरी करता येत नसल्याचे महिला कर्मचाऱ्यांनी वारंवार शासनाच्या निदर्शनास आणून दिले. मानधनवाढीसाठी अनेकदा मोर्चा, निवेदन, प्रत्यक्ष शासन-प्रशासनातील व्यक्तींच्या भेटी घेण्यात आल्या. पण, शासनाने कायम दुर्लक्ष केल्याने या हयातीत तरी मानधनवाढीचा निर्णय होईल का? असा संतप्त सवाल कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे.

टॅग्स :foodअन्नSchoolशाळा